शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांना देशात अस्थिर सरकार आणायचंय; बहुमताचा गैरवापर काँग्रेस काळात झालाय"
2
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
3
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
4
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; महिंद्रात तेजी, Adani Ports घसरला
6
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
7
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
8
'हीरामंडी'च्या रोमँटिक गाण्यावर गौतमी पाटीलहीनेही दाखवली अदा, एका नजरेतच चाहते घायाळ
9
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
10
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
11
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
12
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
13
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
14
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
15
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
16
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
17
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
18
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
19
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
20
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 

दोस्त दोस्त ना रहा! NDA ची अवस्था; केंद्रीय मंत्रिमंडळात बिगर भाजपाचा एकच मंत्री, तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 1:32 AM

BJP, Narendra Modi Cabinet, Ramdas Athwale News: मित्रपक्ष झाले कमी । रालोआमध्ये प्रथमच ही स्थिती; भाजपचे जुने सहकारी होऊ लागले दूर

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाल्यानंतर व त्याआधी काही मतभेदांमुळे अकाली दल रालोआमधून बाहेर पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ५१ जणांच्या मंत्रिमंडळात रिपब्लिकन पक्षाचे मंत्री रामदास आठवले वगळता बाकीचे सर्व मंत्री भाजपचेच आहेत.

देशात १९७७ साली पहिले आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. आठवले केंद्रीय सामाजिक कल्याण राज्यमंत्री आहेत. रालोआ २०१९ साली पुन्हा सत्तेत आल्यानंतर आपल्या घटक पक्षांना काही मंत्रीपदे देऊ केली होती. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांना अवजड उद्योग, अकाली दलाच्या हरसिमरत कौर बादल यांना अन्नप्रक्रिया खात्याचे व रामविलास पासवान यांना ग्राहक संरक्षण, अन्न व सार्वजनिक वितरण खात्याचे मंत्री केले होते.

गेल्या वर्षी महाराष्ट्रामध्ये भाजपची साथ सोडून शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडीचे सरकार स्थापन केले. केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी पदाचा राजीनामा दिला. कृषी विधेयकांवरून मतभेद झाल्याने हरसिमरत कौर यांनीही मंत्रिपद सोडले. आता प्रदीर्घ आजारामुळे रामविलास पासवान यांचे निधन झाले आहे.जनता दल (यु) बाहेरच2014 साली रालोआतून बाहेर पडलेले व कालांतराने पुन्हा परतलेल्या जनता दल (यु) या पक्षाने केंद्रीय मंत्रिमंडळात सामील न होण्याचा निर्णय घेतला.या पक्षाला दोन मंत्रिपदे हवी होती. ती मिळणार नसल्याने या पक्षाने हा पवित्रा घेतला. नितीशकुमार प्रमुख असलेल्या या पक्षाचे १५ खासदार आहेत.2019 च्या लोकसभा निवडणुकीत रालोआने ३४३ लोकसभेच्या जागा लढविल्या होत्या. त्यातील ३०३ जागा भाजप एकटा जिंकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या कारकीर्दीत रालोआतील पाच घटक पक्षांच्या खासदारांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाShiv SenaशिवसेनाRamdas Athawaleरामदास आठवले