शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी समाजानं मन मोठं केलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळू शकतं: डॉ. अमोल कोल्हे

By प्रविण मरगळे | Updated: September 21, 2020 13:46 IST

केंद्राची आता पॉलिसी पाहिली तर अनेक गोष्टी खासगीकरणाकडे जात असताना आरक्षण महत्त्वाचं असताना युवकांनी गुणवत्ता वाढवण्यावरही भर दिला पाहिजे असं आवाहन अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

ठळक मुद्देओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर चांगले ओबीसी समाज काळीज मोठं करुन मराठा समाजातील वंचितांना आरक्षण देऊ शकतो. महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे

मुंबई – सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिनी दिल्याने राज्यात संतापाची भावना आहे. सुप्रीम कोर्टात राज्य सरकार मराठा समाजाची बाजू मांडण्यास कमी पडल्याचा आरोप केला जातो. त्यात राज्यात पोलीस भरतीचा निर्णय घेण्यात आल्याने मराठा समाजातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच जर वेळ पडली तर ओबीसी समाजानं मन मोठं करुन मराठा समाजातील वंचितांना सामावून घ्यावं असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

याबाबत डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, मराठा आरक्षण मिळालचं पाहिजे ही राज्य सरकारची भूमिका आहे, मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध आहेत. मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट केल्याने त्यात दुमत नाही, केंद्र सरकार या प्रश्नी हस्तक्षेप करु शकतं, महाराष्ट्राचे खासदार याबाबत संसदेत मुद्दा उपस्थित करत आहेत. कोणत्याही मार्गाने का होईना मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं असं त्यांनी सांगितले.

तसेच यात जे काही योग्य आहे ते करावं, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर चांगले आहे. पण २०११ च्या जगणनेनुसार ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण कमी आहे. पण जर वेळ आली तर ओबीसी समाज काळीज मोठं करुन मराठा समाजातील वंचितांना आरक्षण देऊ शकतो. आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे. त्याचसोबतच केंद्राची आता पॉलिसी पाहिली तर अनेक गोष्टी खासगीकरणाकडे जात असताना आरक्षण महत्त्वाचं असताना युवकांनी गुणवत्ता वाढवण्यावरही भर दिला पाहिजे असं आवाहन अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

शेतकरी नेत्यांशी चर्चा करुन विधेयक आणलं असतं तर बरं झालं असतं

कृषि विधेयकाचा अभ्यास केला की हे क्षेत्र कॉर्पोरेट कंपन्यांच्या हाती देण्याचा डाव तर नाही ना अशी शंका येते. स्पर्धा असावी, कृषी उत्पन्न बाजार समितीली सक्षम व्यवस्था दिली आहे का? शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय केंद्र सरकारने घ्यावा. शरद पवार हे १० वर्ष देशाचे कृषीमंत्री होते, त्यांच्या काळात अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले गेले, हे विधेयक आणताना शरद पवारांसह अनेक शेतकरी संघटनेच्या नेत्यांची चर्चा करुन आणलं असतं तर बरं झालं असतं. तसेच कांद्याची निर्यात बंदी हटलीच पाहिजे ही आमची भूमिका आहे असंही अमोल कोल्हे म्हणाले.

देशासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न  

केंद्र सरकारने १ सप्टेंबरपासून महाराष्ट्राला येणारी मदत थांबवली आहे. पीपीई किट्स, एन ९५ मास्क, इतर सुविधा थांबवल्या आहेत, महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत असताना कोविडमधून बाहेर पडताना केंद्राने महाराष्ट्राची मदत थांबवणे दुर्देवी आहे असा आरोप खासदार अमोल कोल्हेंनी केला आहे. तसेच बॉलिवूडमधील वादावर भाष्य करताना एखाद्या अभिनेत्रीला किती महत्त्व द्यायचं ते आपण ठरवावं, देशासमोर अनेक महत्त्वाचे प्रश्न आहे अशा शब्दात कंगना राणौतला फटकारलं आहे. झी २४ तासला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

दरम्यान, चित्रपटसृष्टीभोवती शंका उपस्थित केली जाते, ही इंडस्ट्री ५ लाख लोकांना रोजगार देते, ड्रग्स प्रकरणात जे काही समोर येत आहेत त्यांच्यावर नक्कीच कारवाई झालीच पाहिजे. असंघटित कामगारांसारखे इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत, त्याला कोणत्याही प्रकारचा दर्जा नाही, जेव्हा प्रसिद्धीच्या शिखरावर असता तेव्हा सगळे विचारतात, मराठी इंडस्ट्रीमध्ये ड्र्ग्सचा विळखा असेल हे वाटत नाही. ड्रग्सच्या आहारी जाणं दुर्देवी आहे. कारण अनेक युवक कलाकारांकडे आदर्श म्हणून बघत असतात असंही अमोल कोल्हे म्हणाले आहेत.       

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेNCPराष्ट्रवादी काँग्रेसOBCअन्य मागासवर्गीय जाती