शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Gulabchand Kataria : 'जर अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर भगवान रामाचा आदर झाला नसता' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:29 IST

Gulabchand Kataria : काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनावेळी ते म्हणाले होते की, जर भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते.

जयपूर : भाजपा नेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand kataria) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी खूप चर्चेत आहेत. गुलाबचंद कटारिया पुन्हा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी म्हटले होते की, भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते. या वक्तव्यावर काँग्रेसने (Congress) गोंधळ घातल्यानंतर गुलाबचंद कटारिया यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. मात्र, या स्पष्टीकरणावेळी सुद्धा गुलाबचंद कटारिया म्हणाले की, 'जर लालकृष्ण अडवाणींनी (Lal Krishan Advani) रथयात्रा काढली नसती तर आज भगवान रामाचा आदर झाला नसता. राम मंदिर बांधता आले नसते.' (now gulabchand kataria said ram would not have been respected if advani rath yatra had not happened)

काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनावेळी ते म्हणाले होते की, जर भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते. रस्ते नाले बनतील, जर देश वाचला नाही तर देव तुम्हाला शाप देतील. या वक्तव्यावरून काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्यावर निशाणा साधला. गुलाबचंद कटारिया भाजपाला भगवान रामपेक्षा मोठे सांगत आहेत, असे म्हणत गुलाबचंद कटारिया यांच्या वक्तव्याशी भाजपा सहमत आहे का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

दरम्यान, गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. गुलाबचंद कटारिया म्हणाले की, जर लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर आज भगवान रामाचा आदर झाला नसता आणि मंदिर बांधण्यात आले नसते. तसेच, भगवान रामावरून करण्यात आलेले विधान त्यांचे दुखणे होते की जर भाजपाने आंदोलन केले नसते तर रामाला आदर मिळाला नसता. यामागे प्रभू रामाचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र, यावर राजकीय चर्चा सुरूच आहेत, असे गुलाबचंद कटारिया म्हणाले.

'लस काय झाडाला लागल्यात का? हव्या तितक्या तोडून द्यायला!'दोन आठवड्यांपूर्वी राजस्थानात कोरोना लसींची कमतरता आणि राज्य सरकारकडून केंद्राकडे केलेल्या लसींच्या मागणीवर गुलाबचंद कटारिया यांनी वादग्रस्त विधान केले होते. कोरोना विरोधी लस काही झाडाला लागलेल्या नाहीत की केंद्र सरकार हव्या तितक्या तोडून देऊ शकेल, असे वक्तव्य गुलाबचंद कटारिया यांनी केले. यावरुन राजस्थानात मोठा वाद निर्माण झाला होता. 

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थानRam Mandirराम मंदिर