शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Gulabchand Kataria : 'जर अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर भगवान रामाचा आदर झाला नसता' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:29 IST

Gulabchand Kataria : काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनावेळी ते म्हणाले होते की, जर भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते.

जयपूर : भाजपा नेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand kataria) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी खूप चर्चेत आहेत. गुलाबचंद कटारिया पुन्हा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी म्हटले होते की, भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते. या वक्तव्यावर काँग्रेसने (Congress) गोंधळ घातल्यानंतर गुलाबचंद कटारिया यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. मात्र, या स्पष्टीकरणावेळी सुद्धा गुलाबचंद कटारिया म्हणाले की, 'जर लालकृष्ण अडवाणींनी (Lal Krishan Advani) रथयात्रा काढली नसती तर आज भगवान रामाचा आदर झाला नसता. राम मंदिर बांधता आले नसते.' (now gulabchand kataria said ram would not have been respected if advani rath yatra had not happened)

काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनावेळी ते म्हणाले होते की, जर भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते. रस्ते नाले बनतील, जर देश वाचला नाही तर देव तुम्हाला शाप देतील. या वक्तव्यावरून काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्यावर निशाणा साधला. गुलाबचंद कटारिया भाजपाला भगवान रामपेक्षा मोठे सांगत आहेत, असे म्हणत गुलाबचंद कटारिया यांच्या वक्तव्याशी भाजपा सहमत आहे का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

दरम्यान, गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. गुलाबचंद कटारिया म्हणाले की, जर लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर आज भगवान रामाचा आदर झाला नसता आणि मंदिर बांधण्यात आले नसते. तसेच, भगवान रामावरून करण्यात आलेले विधान त्यांचे दुखणे होते की जर भाजपाने आंदोलन केले नसते तर रामाला आदर मिळाला नसता. यामागे प्रभू रामाचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र, यावर राजकीय चर्चा सुरूच आहेत, असे गुलाबचंद कटारिया म्हणाले.

'लस काय झाडाला लागल्यात का? हव्या तितक्या तोडून द्यायला!'दोन आठवड्यांपूर्वी राजस्थानात कोरोना लसींची कमतरता आणि राज्य सरकारकडून केंद्राकडे केलेल्या लसींच्या मागणीवर गुलाबचंद कटारिया यांनी वादग्रस्त विधान केले होते. कोरोना विरोधी लस काही झाडाला लागलेल्या नाहीत की केंद्र सरकार हव्या तितक्या तोडून देऊ शकेल, असे वक्तव्य गुलाबचंद कटारिया यांनी केले. यावरुन राजस्थानात मोठा वाद निर्माण झाला होता. 

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थानRam Mandirराम मंदिर