शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

Gulabchand Kataria : 'जर अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर भगवान रामाचा आदर झाला नसता' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:29 IST

Gulabchand Kataria : काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनावेळी ते म्हणाले होते की, जर भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते.

जयपूर : भाजपा नेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand kataria) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी खूप चर्चेत आहेत. गुलाबचंद कटारिया पुन्हा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी म्हटले होते की, भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते. या वक्तव्यावर काँग्रेसने (Congress) गोंधळ घातल्यानंतर गुलाबचंद कटारिया यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. मात्र, या स्पष्टीकरणावेळी सुद्धा गुलाबचंद कटारिया म्हणाले की, 'जर लालकृष्ण अडवाणींनी (Lal Krishan Advani) रथयात्रा काढली नसती तर आज भगवान रामाचा आदर झाला नसता. राम मंदिर बांधता आले नसते.' (now gulabchand kataria said ram would not have been respected if advani rath yatra had not happened)

काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनावेळी ते म्हणाले होते की, जर भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते. रस्ते नाले बनतील, जर देश वाचला नाही तर देव तुम्हाला शाप देतील. या वक्तव्यावरून काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्यावर निशाणा साधला. गुलाबचंद कटारिया भाजपाला भगवान रामपेक्षा मोठे सांगत आहेत, असे म्हणत गुलाबचंद कटारिया यांच्या वक्तव्याशी भाजपा सहमत आहे का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

दरम्यान, गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. गुलाबचंद कटारिया म्हणाले की, जर लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर आज भगवान रामाचा आदर झाला नसता आणि मंदिर बांधण्यात आले नसते. तसेच, भगवान रामावरून करण्यात आलेले विधान त्यांचे दुखणे होते की जर भाजपाने आंदोलन केले नसते तर रामाला आदर मिळाला नसता. यामागे प्रभू रामाचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र, यावर राजकीय चर्चा सुरूच आहेत, असे गुलाबचंद कटारिया म्हणाले.

'लस काय झाडाला लागल्यात का? हव्या तितक्या तोडून द्यायला!'दोन आठवड्यांपूर्वी राजस्थानात कोरोना लसींची कमतरता आणि राज्य सरकारकडून केंद्राकडे केलेल्या लसींच्या मागणीवर गुलाबचंद कटारिया यांनी वादग्रस्त विधान केले होते. कोरोना विरोधी लस काही झाडाला लागलेल्या नाहीत की केंद्र सरकार हव्या तितक्या तोडून देऊ शकेल, असे वक्तव्य गुलाबचंद कटारिया यांनी केले. यावरुन राजस्थानात मोठा वाद निर्माण झाला होता. 

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थानRam Mandirराम मंदिर