शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

Gulabchand Kataria : 'जर अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर भगवान रामाचा आदर झाला नसता' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2021 15:29 IST

Gulabchand Kataria : काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनावेळी ते म्हणाले होते की, जर भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते.

जयपूर : भाजपा नेते गुलाबचंद कटारिया (Gulabchand kataria) हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी खूप चर्चेत आहेत. गुलाबचंद कटारिया पुन्हा एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. अलीकडेच त्यांनी म्हटले होते की, भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते. या वक्तव्यावर काँग्रेसने (Congress) गोंधळ घातल्यानंतर गुलाबचंद कटारिया यांनी मंगळवारी स्पष्टीकरण दिले. मात्र, या स्पष्टीकरणावेळी सुद्धा गुलाबचंद कटारिया म्हणाले की, 'जर लालकृष्ण अडवाणींनी (Lal Krishan Advani) रथयात्रा काढली नसती तर आज भगवान रामाचा आदर झाला नसता. राम मंदिर बांधता आले नसते.' (now gulabchand kataria said ram would not have been respected if advani rath yatra had not happened)

काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेतला आहे. दोन दिवसांपूर्वी एका कम्युनिटी हॉलच्या उद्घाटनावेळी ते म्हणाले होते की, जर भाजपा नसता तर भगवान राम समुद्रात असते. रस्ते नाले बनतील, जर देश वाचला नाही तर देव तुम्हाला शाप देतील. या वक्तव्यावरून काँग्रेसने गुलाबचंद कटारिया यांच्यावर निशाणा साधला. गुलाबचंद कटारिया भाजपाला भगवान रामपेक्षा मोठे सांगत आहेत, असे म्हणत गुलाबचंद कटारिया यांच्या वक्तव्याशी भाजपा सहमत आहे का? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे.

दरम्यान, गुलाबचंद कटारिया यांच्या या वक्तव्यावर काँग्रेसने आक्षेप घेतल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण दिले. गुलाबचंद कटारिया म्हणाले की, जर लालकृष्ण अडवाणींनी रथयात्रा काढली नसती तर आज भगवान रामाचा आदर झाला नसता आणि मंदिर बांधण्यात आले नसते. तसेच, भगवान रामावरून करण्यात आलेले विधान त्यांचे दुखणे होते की जर भाजपाने आंदोलन केले नसते तर रामाला आदर मिळाला नसता. यामागे प्रभू रामाचा अपमान करण्याचा त्यांचा हेतू नव्हता. मात्र, यावर राजकीय चर्चा सुरूच आहेत, असे गुलाबचंद कटारिया म्हणाले.

'लस काय झाडाला लागल्यात का? हव्या तितक्या तोडून द्यायला!'दोन आठवड्यांपूर्वी राजस्थानात कोरोना लसींची कमतरता आणि राज्य सरकारकडून केंद्राकडे केलेल्या लसींच्या मागणीवर गुलाबचंद कटारिया यांनी वादग्रस्त विधान केले होते. कोरोना विरोधी लस काही झाडाला लागलेल्या नाहीत की केंद्र सरकार हव्या तितक्या तोडून देऊ शकेल, असे वक्तव्य गुलाबचंद कटारिया यांनी केले. यावरुन राजस्थानात मोठा वाद निर्माण झाला होता. 

टॅग्स :BJPभाजपाRajasthanराजस्थानRam Mandirराम मंदिर