शहरं
Join us  
Trending Stories
1
पडळकर-आव्हाड समर्थक राडा प्रकरणी अहवाल सादर; "'त्या' कार्यकर्त्यांना २ दिवस कारावास अन्..."
2
विनेश फोगाटचा यू-टर्न! पुन्हा कुस्तीच्या आखाड्यात परतणार, निवृत्तीचा निर्णय रद्द, कारण...
3
CBSE अभ्यासक्रमात छत्रपती शिवरायांचा इतिहास फक्त ६८ शब्दांत, सत्यजीत तांबेंचा विधानसभेत संताप
4
भारतात येत असताना...! विनफास्ट अमेरिकेत डीलरशीप बंद करू लागली; संख्या दोन डझनांखाली आली...
5
व्हेनेजुएला-अमेरिका वादात रशियाची उडी; मादुरोंच्या मदतीला पुतिन धावले, ट्रम्पना धक्का...
6
’सोयाबीन खरेदीचे केंद्र सुरू करण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी तीन लाख घेत आहेत’, विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप  
7
‘स्लीपर वंदे भारत’वर मोठी अपडेट! १ हजार किमी अंतर ८ तासात, १६० प्रति तास वेग; पहिली सेवा...
8
रिलेशिनशिप कन्फर्म केल्यानंतर पहिल्यांदा एकत्र दिसले गौरव कपूर-कृतिका कामरा, व्हिडीओ व्हायरल
9
इंस्टाग्रामच्या कंटाळवाण्या रील्सला म्हणा 'बाय बाय'! फक्त एका सेटिंगने बदला फीडचा अल्गोरिदम
10
Gujarat Flyover Collapse: गुजरातमध्ये निर्माणाधीन पूल कोसळला! ४ कामगार गंभीर जखमी, एक बेपत्ता
11
"माझ्या एका सिगारेटने दिल्लीच्या प्रदूषणात फरक पडणार नाही"; TMC खासदाराचं भाजपाला प्रत्युत्तर
12
Rahul Gandhi: "लाखो मुलांचे भविष्य उद्ध्वस्त होत आहे" लोकसभेत राहुल गांधींचं महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य!
13
मुंबईतील ७० टक्के मुस्लीम बहुल भागात एकनाथ शिंदेंना पसंती; भाजपाच्या सर्व्हेतून काय आलं समोर?
14
टेस्लाला मोठा झटका! जागतिक विक्री ४ वर्षांतील नीचांकी पातळीवर; भारतात तर डोकेही वर निघेना...
15
इंडिगोचं विमान ऐनवेळी रद्द, मुलाची परीक्षा चुकू नये म्हणून वडिलांनी रात्रभर चालवली कार, अखेरीस... 
16
"ज्येष्ठ नेते शिवराज पाटील यांच्या निधनाने अनुभवी, अभ्यासू व सुसंकृत नेतृत्व हरपले’’,  हर्षवर्धन सपकाळ यांनी वाहिली श्रद्धांजली
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार विवाह बाह्य संबंध ठेवणाऱ्यांना मिळते 'ही' भयानक शिक्षा!
18
या अभिनेत्रीचे वडील उरीमध्ये दहशतवाद्यांशी लढताना झाले होते शहीद, ८०० कोटींच्या सिनेमातून रातोरात झाली लोकप्रिय
19
नात्याला काळीमा! इस्रायलचं स्वप्न, विम्याच्या रकमेसाठी लेक झाला हैवान; वडिलांचा काढला काटा
20
मोठी बातमी! वेनेझुएलावर अमेरिकेने हल्ला केलाच, रशिया संरक्षण करणार; मादुरो यांना पुतीन यांचा फोन गेला...
Daily Top 2Weekly Top 5

आता या राज्यात काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, आठ आमदार राजीनामा देऊन भाजपात जाण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 10:39 IST

Congress Politics Update: जाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा प्नयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असतानाच आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहे.

इंफाळ - देशातील विविध राज्यांत काँग्रेसमध्ये सुरू असलेले पक्षांतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. नुकताच पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा प्नयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असतानाच आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहे. (Manipur Congress Update) पूर्वोत्तर राज्यांमधील मणिपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, एनएआयने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी पक्षामधील किमान आठ आमदार हे भाजपामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर काँग्रेसचे मणिपूरमधील प्रदेशाध्यक्ष गोविंदास कॉन्थोजम यांनीही राजीनामा दिला आहे. (Now, on the brink of a Congress split in the Manipur, eight MLAs are preparing to resign and join the BJP)

मणिपूरमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच पक्षात मोठी फूट पडल्याने काँग्रेससमोरील आव्हान वाढले आहे. काँग्रेसचे मणिपूरमधील प्रदेशाध्यक्ष गोविंदास कॉन्थोजम यांनी पदाचा राजीनामा देत पक्षाच्या अडचणीत अधिकच भर घातली आहे. कॉन्थोजम हे विष्णूपूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आले होते. त्यांना डिसेंबर २०२० मध्ये मणिपूरचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले होते. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आमदार भाजपात दाखल झाल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पारडे जड होणार आहे.

दरम्यान, भाजपानेही मणिपूरमध्ये काही पक्षांतर्गत फेरबदल केले आहेत. भाजपाने शारदादेवी यांच्याकडे मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याला दुजोरा देताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून शारदादेवी यांच्या नावाला मान्यता मिळाल्याचे सांगितले होते. त्यांच्या आधीचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सायखोम टीकेंद्र सिंह यांचे मे महिन्यात निधन झाले होते.

दरम्यान, विविध राज्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत मतभेदांमुळे काँग्रेसचे पक्ष संघटन अधिकाधिक कमकुवत होत चालले आहे. पक्षनेतृत्वाने पंजाबमधील वाद मिटवला असला तरी राजस्थानसह इतर राज्यांमध्ये अधूनमधून वाद उफाळून येत असल्याने काँग्रेस नेतृत्वाची डोकेदुखी वाढत आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपाSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी