शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

आता या राज्यात काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर, आठ आमदार राजीनामा देऊन भाजपात जाण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 10:39 IST

Congress Politics Update: जाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा प्नयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असतानाच आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहे.

इंफाळ - देशातील विविध राज्यांत काँग्रेसमध्ये सुरू असलेले पक्षांतर्गत वाद थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. नुकताच पंजाबमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि सिद्धू यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा प्नयत्न पक्षश्रेष्ठींनी केला असतानाच आता अजून एका राज्यात काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे दिसत आहे. (Manipur Congress Update) पूर्वोत्तर राज्यांमधील मणिपूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, एनएआयने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी पक्षामधील किमान आठ आमदार हे भाजपामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. एवढेच नाही तर काँग्रेसचे मणिपूरमधील प्रदेशाध्यक्ष गोविंदास कॉन्थोजम यांनीही राजीनामा दिला आहे. (Now, on the brink of a Congress split in the Manipur, eight MLAs are preparing to resign and join the BJP)

मणिपूरमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीपूर्वीच पक्षात मोठी फूट पडल्याने काँग्रेससमोरील आव्हान वाढले आहे. काँग्रेसचे मणिपूरमधील प्रदेशाध्यक्ष गोविंदास कॉन्थोजम यांनी पदाचा राजीनामा देत पक्षाच्या अडचणीत अधिकच भर घातली आहे. कॉन्थोजम हे विष्णूपूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आले होते. त्यांना डिसेंबर २०२० मध्ये मणिपूरचे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्यात आले होते. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणावर काँग्रेसचे आमदार भाजपात दाखल झाल्यास विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाचे पारडे जड होणार आहे.

दरम्यान, भाजपानेही मणिपूरमध्ये काही पक्षांतर्गत फेरबदल केले आहेत. भाजपाने शारदादेवी यांच्याकडे मणिपूरच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याला दुजोरा देताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडून शारदादेवी यांच्या नावाला मान्यता मिळाल्याचे सांगितले होते. त्यांच्या आधीचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सायखोम टीकेंद्र सिंह यांचे मे महिन्यात निधन झाले होते.

दरम्यान, विविध राज्यात सुरू असलेल्या पक्षांतर्गत मतभेदांमुळे काँग्रेसचे पक्ष संघटन अधिकाधिक कमकुवत होत चालले आहे. पक्षनेतृत्वाने पंजाबमधील वाद मिटवला असला तरी राजस्थानसह इतर राज्यांमध्ये अधूनमधून वाद उफाळून येत असल्याने काँग्रेस नेतृत्वाची डोकेदुखी वाढत आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणBJPभाजपाSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी