शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

“सरकारमध्ये कोणी ऐकत नाही, फोन उचलत नाहीत”; महाविकास आघाडीतला घटक पक्ष नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 18:10 IST

Abu Azami: आम्हाला भेटा, आमचे प्रश्न जाणून घ्या त्याशिवाय आम्ही काही मागत नाही असं अबु आझमी म्हणाले.

ठळक मुद्देभिवंडी महापालिकेच्या आयुक्तांची बदली केली. जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या बोलण्यावरून आयुक्तांची बदली करण्यात आली. गणेशोत्सवाबद्दल नियमावली आली आहे परंतु बकरी ईद जवळ आली तरी नियमावली नाही पुरोगामी विचारांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबत इतर छोटे पक्षही सहभागी आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये अनेकदा विसंवाद दिसून येतो. आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार मांडत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीही सावध भूमिका घेत आहेत. राज्यातील या महाविकास आघाडीत सहभागी असणारा समाजवादी पक्ष नाराज असल्याचं बोललं जात आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी म्हणाले की, आमची गरज असेल तेव्हाच बोलवू नका, महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नको म्हणून आम्ही महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. परंतु या सरकारमध्ये कोणीही ऐकत नाही. फोन उचलत नाही. बकरी ईदबाबत अद्याप नियमावली काढली नाही. १-२ दिवसांत नियमावली काढू असं म्हणतात. परंतु समाजातील लोकांना बोलावून चर्चा करा आणि नंतर नियमावली काढा असं मी मागणी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.  

त्याचसोबत भिवंडी महापालिकेच्या आयुक्तांची बदली केली. जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या बोलण्यावरून आयुक्तांची बदली करण्यात आली. याबाबतही मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही आलो आहोत. पुरोगामी विचारांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडूक होणार असेल तेव्हा आमची आठवण होईल. आम्हाला भेटा, आमचे प्रश्न जाणून घ्या त्याशिवाय आम्ही काही मागत नाही असं अबु आझमी म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल यात शंका नाही

‘सरकार चालवताना काही प्रश्न जरूर निर्माण होतात. महाविकास आघाडीची निर्मिती होतानाच असे प्रश्न सोडविण्यासाठी एक यंत्रणा असावी, असा निर्णय झाला होता. त्याची जबाबदारी देखील तिन्ही पक्षांच्या काही सहकाऱ्यांकडे सोपवली आहे. कोणत्याही महत्त्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच केले होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAbu Azmiअबू आझमी