शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

“सरकारमध्ये कोणी ऐकत नाही, फोन उचलत नाहीत”; महाविकास आघाडीतला घटक पक्ष नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 18:10 IST

Abu Azami: आम्हाला भेटा, आमचे प्रश्न जाणून घ्या त्याशिवाय आम्ही काही मागत नाही असं अबु आझमी म्हणाले.

ठळक मुद्देभिवंडी महापालिकेच्या आयुक्तांची बदली केली. जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या बोलण्यावरून आयुक्तांची बदली करण्यात आली. गणेशोत्सवाबद्दल नियमावली आली आहे परंतु बकरी ईद जवळ आली तरी नियमावली नाही पुरोगामी विचारांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे.

मुंबई – राज्यातील महाविकास आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यासोबत इतर छोटे पक्षही सहभागी आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांमध्ये अनेकदा विसंवाद दिसून येतो. आगामी निवडणुका काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल अशी भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले वारंवार मांडत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना-राष्ट्रवादीही सावध भूमिका घेत आहेत. राज्यातील या महाविकास आघाडीत सहभागी असणारा समाजवादी पक्ष नाराज असल्याचं बोललं जात आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी म्हणाले की, आमची गरज असेल तेव्हाच बोलवू नका, महाराष्ट्रात भाजपाचं सरकार नको म्हणून आम्ही महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. परंतु या सरकारमध्ये कोणीही ऐकत नाही. फोन उचलत नाही. बकरी ईदबाबत अद्याप नियमावली काढली नाही. १-२ दिवसांत नियमावली काढू असं म्हणतात. परंतु समाजातील लोकांना बोलावून चर्चा करा आणि नंतर नियमावली काढा असं मी मागणी केली आहे अशी माहिती त्यांनी दिली.  

त्याचसोबत भिवंडी महापालिकेच्या आयुक्तांची बदली केली. जे भ्रष्टाचार करतात त्यांच्या बोलण्यावरून आयुक्तांची बदली करण्यात आली. याबाबतही मंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही आलो आहोत. पुरोगामी विचारांना आम्ही बांधील आहोत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला आहे. आता विधानसभा अध्यक्षपदाची निवडूक होणार असेल तेव्हा आमची आठवण होईल. आम्हाला भेटा, आमचे प्रश्न जाणून घ्या त्याशिवाय आम्ही काही मागत नाही असं अबु आझमी म्हणाले.

महाविकास आघाडी सरकार पाच वर्षे टिकेल यात शंका नाही

‘सरकार चालवताना काही प्रश्न जरूर निर्माण होतात. महाविकास आघाडीची निर्मिती होतानाच असे प्रश्न सोडविण्यासाठी एक यंत्रणा असावी, असा निर्णय झाला होता. त्याची जबाबदारी देखील तिन्ही पक्षांच्या काही सहकाऱ्यांकडे सोपवली आहे. कोणत्याही महत्त्वाच्या धोरणात्मक प्रश्नासाठी हे सहकारी एकत्र बसतात आणि त्यावर निर्णय घेत असतात. त्यामुळं हे सरकार अत्यंत व्यवस्थित चाललं आहे. हे सरकार पाच वर्षे टिकेल याबद्दल शंका नाही असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अलीकडेच केले होते.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAbu Azmiअबू आझमी