शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाकडे लक्ष देण्याची गरज नाही, जिंकणार आम्हीच; जयंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2020 14:26 IST

Jayant Patil News : सहकारी पक्षाला वाइट वागवण्याची पद्धत त्यांची आहे, आमची नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. 

पुणे - शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणूका आम्हीच जिंकणार आहोत, भारतीय जनता पार्टीकडे लक्ष देण्याची गरज नाही, सहकारी पक्षाला वाइट वागवण्याची पद्धत त्यांची आहे, आमची नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली. शिक्षक व पदवीधर मतदार संघातील महाविकास आघाडीच्या ऊमेदवारांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस भवनमध्ये शुक्रवारी सकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अशी संयुक्त बैठक झाली. जयंत पाटील, सतेज पाटील, विश्वजीत कदम हे मंत्री, खासदार, वंदना चव्हाण, डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे यावेळी उपस्थित होते. काँग्रेसकडे ऊर्जा खाते असल्यानेच राष्ट्रवादी वाढीव वीज बिले माफ करायला तयार नाही अशी टीका करणार्या भाजपाचा पाटील यांनी यावेळी समाचार घेतला. ते म्हणाले, सहकारी पक्षाला भाजपा कसा वागवतो ते मागील ५ वर्षात शिवसेनेला त्यांनी दिलेल्या वागणूकीवरूनच दिसले. आमची तशी पद्धत नाही. मुख्यमंत्री ठाकरे सर्वसहमतीनेच प्रत्येक निर्णय घेतात. फडणविसांच्या सत्ताकाळातच महावितरणची थकबाकी ६७ हजार कोटी झाली. आम्ही त्यातून मार्ग काढतो आहोत. महावितरण वाचले पाहिजे व ग्राहकांनाही दिलासा मिळावा असा ऊपाय काढण्यासाठी महाआघाडी खंबीर आहे.पाचही मतदार संघात महाआघाडीचे प्रचाराचे नियोजन झाले आहे, पदवीधरांचे, शिक्षकांचे प्रश्न आहेतच. मागील ५वर्षात धोरणात्मक निर्णय केंद्र, राज्य सरकारने घेतले नाहीत. त्यामुळे आर्थिक संकट कोविडच्या आधीच आले होते असे पाटील म्हणाले.  मुंबई महापालिका तसेच अन्य निवडणूकांना अजून बराच मोठा कालावधी आहे, त्यावेळी काय करायचे, कसे करायचे याचा निर्णय आता घेणे योग्य नाही असे त्यांनी स्पष्ट केले. कोरोनाची दुसरी लाट येण्याची दाट शक्यता लक्षात घेऊनच मुंबई इतर भागात काळजी घ्यायला हवी.  प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी स्थिती आहे, त्यामुळेच तिथे स्थानिक प्रशासनाला निर्णय घ्यायला सरकारने मुभा दिली आहे. मुंबईत बसून यवतमाळचा निर्णय कसा घेणार इतकी साधी गोष्ट आहे. त्यामुळे सरकारमध्ये एकवाक्यता नाही या टिकेला काही अर्थ नाही असे पाटील म्हणाले. 

पराभव होणार हे पक्के माहिती असणारेच "आम्ही त्यांना चितपट करू" वगैरे बोलतात. देवेंद्र फडणवीस यांचे तेच सुरू आहे, प्रयत्न करत असतील तर करू द्या, ते फार गंभीरपणे घ्यायची गरज नाही अशा शब्दात पाटील यांनी फडणवीस यांची खिल्ली उडवली.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलPuneपुणे