शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"महाराष्ट्रात कुठल्याही गृहमंत्र्याने पोलिसांवर एवढा अविश्वास दाखवला नव्हता" त्या विधानावरून फडणवीसांचा अनिल देशमुखांना टोला

By बाळकृष्ण परब | Updated: September 21, 2020 16:27 IST

काही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कादायक गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता.

ठळक मुद्देआपण तसं विधान केलं नसल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता त्यांना संशयाचा फायदा देऊया पण गृहमंत्र्यांच्या बोलण्याचा असा अर्थ निघणे हे काही योग्य नाहीस्वत: पोलिसांवर अविश्वास दाखवायचा आणि दुसऱ्यांनं म्हटलं की महाराष्ट्राचा अवमान झाला म्हणून कांगावा करायचा, हे योग्य नाही

मुंबई - राज्यात सत्तेत असलेले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न काही आयपीएस अधिकाऱ्यांनी केला होता, असे विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतील केले होते. मात्र या विधानाबाबत नंतर त्यांनी स्पष्टीकरणही दिले. पण या विधानामुळे गृहमंत्र्यांसमोर निर्माण झालेल्या अडचणी काही थांबण्याचं नाव घेत नाही आहेत. आता विधानसभेतील विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधानावरून गृहमंत्री अनिल देशमुख यांना टीकेचे लक्ष्य केले आहे.अनिल देशमुख यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत केलेल्या विधानाबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राच्या कुठल्याही गृहमंत्र्याने पोलिसांवर असा अविश्वास दाखवला नव्हता. आम्ही सत्तेत आलो तेव्हाही आधीच्या काळातीलच पोलीस होते. मात्र आम्ही त्यांना सोबत घेत चांगल्या प्रकारचे काम केले. सरकार सांगते त्याप्रमाणे पोलिसांना काम करावे लागते.आता आपण तसं विधान केलं नसल्याचं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता त्यांना संशयाचा फायदा देऊया. पण गृहमंत्र्यांच्या बोलण्याचा असा अर्थ निघणे हे काही योग्य नाही. स्वत: पोलिसांवर अविश्वास दाखवायचा आणि दुसऱ्यांनं म्हटलं की महाराष्ट्राचा अवमान झाला म्हणून कांगावा करायचा, हे योग्य नाही, असा चिमटाही फडणवीस यांनी काढला.लोकमतला दिलेल्या मुलाखतीत नेमकं काय म्हणाले होते अनिल देशमुखकाही आयपीएस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातले महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला; परंतु तो वेळीच हाणून पाडला गेला, असा धक्कादायक गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. यावर आपण जाहीरपणे वक्तव्य करू इच्छित नाही, असे म्हणत त्या अधिकाऱ्यांविषयी नाराजीही त्यांनी व्यक्त केली होती. लोकमत ऑनलाइनच्या ह्यग्राउंड झीरोह्ण कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत गृहमंत्र्यांनी यावर भाष्य केले होते. सरकार पाडण्याचा पोलीस खात्यातर्फे जोरदार प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली. ते नेमके काय प्रकरण आहे? कोण कोण त्याच्यामध्ये सहभागी आहेत? कोणत्या अधिकाऱ्यांची नावे तुमच्या समोर आली आहेत आणि तुम्ही हे कसे थांबवले, असा थेट सवाल केला असता गृहमंत्री म्हणाले होते की, ठीक आहे, तसे काही मला एकदम सांगता येणार नाही. काही अधिकारी चांगले काम करीत आहेत. पोलीस खात्यात काही अधिकारी असेही असतात की त्यांचे नेत्यांशी जवळचे संबंध राहतात. पण याच्याबाबतीत मी जाहीर वक्तव्य करू इच्छित नाही. पण हे सांगताना गृहमंत्र्यांच्या चेहऱ्यावरील अस्वस्थता आणि नाराजी लपून राहिली नव्हती.नंतर या विधानाचा केला इन्कारपोलीस अधिकाऱ्यांनी केला होता ठाकरे सरकार पाडण्याचा प्रयत्नह्ण, या राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या खळबळजनक मुलाखतीचे पडसाद राज्यभर उमटले होते. नंतर मात्र, देशमुख यांनी ह्यत्याह्ण विधानाचा इन्कार केला असून आपल्या तोंडी ते वक्तव्य टाकले, असा खुलासाकेला होता. माझ्या तोंडी चुकीच्या पद्धतीने ते वक्तव्य टाकण्यात आले, असा खुलासा गृहमंत्री देशमुख यांनी पुण्यात श्रमिक पत्रकार संघात बोलताना केला होता.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAnil Deshmukhअनिल देशमुखMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिसPoliticsराजकारण