शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

Bihar Election Result : नितीशकुमार सातव्यांदा मुख्यमंत्री झाले खरे...; पुढ्यात 5 तगडी आव्हाने

By हेमंत बावकर | Updated: November 11, 2020 18:47 IST

Bihar Election Result 2020, Nitish Kumar : नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सातव्यांदा गळ्यात घातली खरी परंतू ती यावेळी काटेरी ठरणार आहे. बिहारमध्ये पाच नवीन आव्हाने त्यांना दिवसागणिक पेलावी लागणार आहेत.

ठळक मुद्देनितीशकुमारांनी 2015 मध्ये दारुबंदी केली होती. यामुळे त्यांना महिलांनी जोरदार पाठिंबा दिला होता.लालू प्रसाद यादव हे तुरुंग आणि हॉस्पिटलमध्ये असल्याने तेजस्वी यादव यांनी एकट्याच्या जिवावर ७५ आमदाप निवडून आणले आहेत. एनडीएला 125 आणि राजद आघाडीला 110 जागा मिळाल्या आहेत. काय असतील नितीशकुमार यांच्या समोरील ही आव्हाने?

नितीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची माळ सातव्यांदा गळ्यात घातली खरी परंतू ती यावेळी काटेरी ठरणार आहे. बिहारमध्ये पाच नवीन आव्हाने त्यांना दिवसागणिक पेलावी लागणार आहेत. रात्री उशिरा निकाल जाहीर झाले, यामध्ये एनडीएला 125 आणि राजद आघाडीला 110 जागा मिळाल्या आहेत. काय असतील नितीशकुमार यांच्या समोरील ही आव्हाने?

सरकारवर आधीसारखे नियंत्रण ठेवता येणार?नितीशकुमारांना या निवडणुकीत मोठा झटका बसला आहे. जदयूचे आमदार घटले असून भाजपाचे आमदार वाढले आहेत. जदयूचे 43 तर भाजपाचे 74 आमदार आहेत. यामुळे मुख्यमंत्री जरी नितीशकुमार झाले तरीही त्या प्रमाणात मंत्रिपदे भाजपाच्याच वाट्याला अधिक जातील. तहामध्ये मोठी मोठी खाती भाजपाकडेच जातील, यामुळे आधीसारखे नियंत्रण ठेवणे त्यांना कठीण जाण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी जेव्हा त्यांनी राजदसोबत निवडणूक जिंकली होती, तेव्हा काही महिन्यांतच ते त्रस्त झाले होते. 

विरोधकही ताकदवाननितीशकुमारांना यावेळी सहकाऱ्यांसोबत विरोधकही ताकदवान लाभले आहेत. 2005 मध्ये जेव्हा ते पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हापासून लालूप्रसाद यादव यांचे पतन होत गेले. मात्र, यंदा विरोधात 115 आमदार असणार आहेत. एमआयएमचे पाच आणि राजद आघाडीचे 110. लालू प्रसाद यादव हे तुरुंग आणि हॉस्पिटलमध्ये असल्याने तेजस्वी यादव यांनी एकट्याच्या जिवावर ७५ आमदाप निवडून आणले आहेत. यामुळे तेजस्वी अनुभवाने कमी असले तरीही नितीसकुमारांना नाकीनऊ आणण्याचा प्रयत्न जरूर करणार. 

उत्तराधिकारी कोण?निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात नितीशकुमारांनी ही माझी शेवटची निवडणूक म्हणून घोषणा केली होती. आता त्यांना वेळोवेळी तुमचा उत्तराधिकारी कोण म्हणून विचारले जाणार आहे. प्रादेशिक पक्ष असल्याने उत्तराधिकारी निवडावाच लागणार आहे. मात्र, गेल्या दीड दशकात ते उत्तराधिकारी निवडू शकलेले नाहीत किंवा आपल्यानंतरचा दुसरा नेता उभा करू शकलेले नाहीत. यामुळे ते यावेळी जिंकूनही हरल्यासारखे भासणार आहेत. पुढील पाच वर्षांत त्यांना पक्ष टिकविण्यासाठी चांगला चेहरा द्यावाच लागणार आहे. 

सुशासन परत आणणेनिवडणूक प्रचारावेळी झालेली हुल्लडबाजी, कांदा-दगडफेक आदी गोष्टी जनतेत रोष असल्याचे दाखवत होत्या. यामुळे कमजोर सीएम असल्याचा आरोप त्यांना खोडावा लागणार आहे. सध्याची राजकीय परिस्छिती पाहता हे कठीण दिसत आहे. भाजपाला आवरणे आणि विरोधकांना तोंड देणे या कसरतीत नितीशकुमारांनचा घाम निघण्याची शक्यता आहे. तसेच लोकांचा रागही शांत करावा लागणार आहे. 

दारुबंदी नितीशकुमारांनी 2015 मध्ये दारुबंदी केली होती. यामुळे त्यांना महिलांनी जोरदार पाठिंबा दिला होता. सुरुवातीला ही बंदी प्रभावीपणे अवलंबली गेली. आता हीच बंदी गळ्याचा फास बनली आहे. कारण बिहारमध्ये कुठेही खुलेआम दारू विक्री होत आहे. दुसरीकडे कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थित ताण आहे. यासाठी दारुबंदी उठवावी लागण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपाTejashwi Yadavतेजस्वी यादव