शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

मोदींच्या 'त्या' दोन मंत्र्यांबद्दल सुप्रिया सुळे कौतुकानं बोलल्या; उपस्थितांच्या भुवया उंचावल्या

By कुणाल गवाणकर | Updated: September 21, 2020 22:25 IST

काँग्रेसकडून सातत्यानं टीका होत असलेल्या मंत्र्यांचं सुळेंकडून कौतुक

नवी दिल्ली: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, त्यानंतर करण्यात आलेला लॉकडाऊन, त्यामुळे सर्वसामान्यांना भोगावा लागलेला त्रास, अडचणीत सापडलेली अर्थव्यवस्था यावरून विरोधक सातत्यानं मोदी सरकारला लक्ष्य करत आहेत. कोरोनामुळे ठप्प झालेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २० लाख कोटींचं पॅकेज जाहीर केलं. यावरूनही विरोधकांनी सीतारामन यांच्यावर टीका केली. अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं २० लाख कोटींचं पॅकेज किती जणांपर्यंत पोहोचलं, असा सवाल काँग्रेसच्या नेत्यांनी वारंवार उपस्थित केला. मात्र काँग्रेसनं सातत्यानं टीका केलेल्या सीतारामन यांचं राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी आज संसदेत कौतुक केलं. त्यामुळे उपस्थित असलेल्या अनेकांच्या भुवया उंचावल्या.मार्शल आले नसते, तर उपसभापतींवर हल्ला झाला असता- रविशंकर प्रसाद'निर्मला सीतारामन यांचं मंत्रालय नेहमी इतर विभागांपेक्षा चांगली कामगिरी करतं. आमचे त्यांच्याशी मतभेद असू शकतात. पण मला अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांच्या कामाचं कौतुक करावंसं वाटतं. ते सातत्यानं विधेयकं सादर आणून परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत,' अशा शब्दांत सुळेंनी अर्थमंत्री सीतारामन आणि अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकूर यांचं कौतुक केलं. सुळेंच्या या स्तुतीसुमनांनी अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.विशेष म्हणजे लोकसभेत अर्थमंत्री आणि अर्थराज्यमंत्र्यांचं कौतुक करणाऱ्या सुप्रिया सुळे संसदेबाहेर सरकारविरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या. काल राज्यसभेत प्रचंड गदारोळात शेतीशी संबंधित दोन विधेयकं मंजूर झाली. सरकारनं आवश्यक प्रक्रिया पूर्ण न करता कामकाज रेटून नेलं आणि विधेयकं मंजूर केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. त्यामुळे विरोधी पक्षांचे खासदार संसदेबाहेर ठिय्या आंदोलन करत आहेत. त्यामध्ये सुप्रिया सुळे सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेNirmala Sitaramanनिर्मला सीतारामनNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस