शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

...तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही; आमदार रोहित पवारांनी चिराग पासवानला झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 09:43 IST

अभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करणे सोपे आहे. पण बिहारच्या बिकट परिस्थितीशी जबाबदारी घेत त्यात सुधारण करणे कठीण आहे असं रोहित पवार म्हणाले.

ठळक मुद्देअभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करणे सोपे आहे. राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर राज्यातील जनता कधीच सहन करणार नाहीभूमाफियांकडून मारहाण, घर जाळणे या घटना बिहारमध्ये सामान्य आहे

मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणावरुन बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. कंगनाला राज्य सरकार निशाणा बनवत आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या होत आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना चांगलीच चपराक लगावली आहे.

याबाबत रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना खुलं पत्र लिहिलं आहे. त्यात ते म्हटले आहेत की, तुम्ही महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असं ऐकलं. जर तुम्हाला कायद्याची एवढी चिंता असती तर २०१८ मध्ये मुजफ्फरपूर शेल्टर होममध्ये मुलींवर झालेल्या अत्याचार आठवत असेल. त्यावेळी तुम्ही स्वत: अशी अनेक प्रकरणे जिल्ह्यात समोर येत आहेत असं म्हटलं होतं. तेव्हा नितीश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. इतकचं नाही तर NCRB डेटानुसार बिहारची राजधानी पटणा हे हत्येच्या प्रमाणात देशातील १९ शहरात सर्वात वर आहे. पटणात हत्येचे प्रमाण ४.४. तर दुसऱ्या नंबरवर असलेल्या जयपूर ३.१ ने जास्त आहे. हुंड्यासाठी आमच्या बहिणींची हत्या करण्यात पटणा अव्वल आहे. त्याचसोबत २०१८ मध्ये राजेंद्र सिंहसारख्या ५ ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्त्यांची उघडपणे हत्या केली होती. अनेक पत्रकारांचे खून झाले आहेत. भूमाफियांकडून मारहाण, घर जाळणे या घटना बिहारमध्ये सामान्य आहे असं ते म्हणाले.

तसेच सामान्य जनतेचे काय हाल असतील ते सगळ्या घटनांवरुन दिसून येते. गेल्या १५ वर्षात ६ पेक्षा जास्त अधिकाऱ्यांची गुन्हेगारांनी हत्या केली. आश्चर्य आहे की, तेव्हा तुमचा पक्ष सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा वापर स्वत:च्या राजकीय लॉन्चिंगसाठी करत अभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करणे सोपे आहे. पण बिहारच्या बिकट परिस्थितीशी जबाबदारी घेत त्यात सुधारण करणे कठीण आहे. तुम्ही राजकारणासाठी सोपा मार्ग निवडत आहात याचे दु:ख आहे. फक्त राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर राज्यातील जनता कधीच सहन करणार नाही असा इशारा आमदार रोहित पवारांनी चिराग पासवान यांना दिला आहे.

काय म्हणाले होते चिराग पासवान?

 चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिकट झाली आहे. केवळ बदला घेण्यासाठीच कंगना राणौतच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली. महाराष्ट्रात राहणाऱ्या बिहारींबद्दल मला चिंता आहे. महाराष्ट्र हा कंगनासह सर्व लोकांनी मिळून बनवला आहे. जर लोकांना अशाप्रकारे निशाणा बनवत असतील तर राज्यात राष्ट्रपती राजवटीशिवाय इतर कोणताही पर्याय नाही, कारण लोक सरकारला घाबरत आहेत असा आरोप चिराग पासवान यांनी केला होता.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारKangana Ranautकंगना राणौतMaharashtraमहाराष्ट्र