शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

...तर महाराष्ट्रातील जनता सहन करणार नाही; आमदार रोहित पवारांनी चिराग पासवानला झापलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 09:43 IST

अभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करणे सोपे आहे. पण बिहारच्या बिकट परिस्थितीशी जबाबदारी घेत त्यात सुधारण करणे कठीण आहे असं रोहित पवार म्हणाले.

ठळक मुद्देअभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करणे सोपे आहे. राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर राज्यातील जनता कधीच सहन करणार नाहीभूमाफियांकडून मारहाण, घर जाळणे या घटना बिहारमध्ये सामान्य आहे

मुंबई – अभिनेत्री कंगना राणौत प्रकरणावरुन बिहारमधील लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. कंगनाला राज्य सरकार निशाणा बनवत आहे. महाराष्ट्रात लोकशाहीची हत्या होत आहे असं त्यांनी म्हटलं होतं. त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना चांगलीच चपराक लगावली आहे.

याबाबत रोहित पवार यांनी चिराग पासवान यांना खुलं पत्र लिहिलं आहे. त्यात ते म्हटले आहेत की, तुम्ही महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली असं ऐकलं. जर तुम्हाला कायद्याची एवढी चिंता असती तर २०१८ मध्ये मुजफ्फरपूर शेल्टर होममध्ये मुलींवर झालेल्या अत्याचार आठवत असेल. त्यावेळी तुम्ही स्वत: अशी अनेक प्रकरणे जिल्ह्यात समोर येत आहेत असं म्हटलं होतं. तेव्हा नितीश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी केली नाही. इतकचं नाही तर NCRB डेटानुसार बिहारची राजधानी पटणा हे हत्येच्या प्रमाणात देशातील १९ शहरात सर्वात वर आहे. पटणात हत्येचे प्रमाण ४.४. तर दुसऱ्या नंबरवर असलेल्या जयपूर ३.१ ने जास्त आहे. हुंड्यासाठी आमच्या बहिणींची हत्या करण्यात पटणा अव्वल आहे. त्याचसोबत २०१८ मध्ये राजेंद्र सिंहसारख्या ५ ज्येष्ठ आरटीआय कार्यकर्त्यांची उघडपणे हत्या केली होती. अनेक पत्रकारांचे खून झाले आहेत. भूमाफियांकडून मारहाण, घर जाळणे या घटना बिहारमध्ये सामान्य आहे असं ते म्हणाले.

तसेच सामान्य जनतेचे काय हाल असतील ते सगळ्या घटनांवरुन दिसून येते. गेल्या १५ वर्षात ६ पेक्षा जास्त अधिकाऱ्यांची गुन्हेगारांनी हत्या केली. आश्चर्य आहे की, तेव्हा तुमचा पक्ष सत्ताधारी पक्षासोबत आघाडीत होता. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा वापर स्वत:च्या राजकीय लॉन्चिंगसाठी करत अभिनेत्रीच्या सुरात सूर मिसळून महाराष्ट्राच्या विरोधात वक्तव्य करणे सोपे आहे. पण बिहारच्या बिकट परिस्थितीशी जबाबदारी घेत त्यात सुधारण करणे कठीण आहे. तुम्ही राजकारणासाठी सोपा मार्ग निवडत आहात याचे दु:ख आहे. फक्त राजकीय हेतूसाठी महाराष्ट्रावर चिखलफेक केली तर राज्यातील जनता कधीच सहन करणार नाही असा इशारा आमदार रोहित पवारांनी चिराग पासवान यांना दिला आहे.

काय म्हणाले होते चिराग पासवान?

 चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली होती. राज्यात कायदा-सुव्यवस्था बिकट झाली आहे. केवळ बदला घेण्यासाठीच कंगना राणौतच्या कार्यालयावर बीएमसीने कारवाई केली. महाराष्ट्रात राहणाऱ्या बिहारींबद्दल मला चिंता आहे. महाराष्ट्र हा कंगनासह सर्व लोकांनी मिळून बनवला आहे. जर लोकांना अशाप्रकारे निशाणा बनवत असतील तर राज्यात राष्ट्रपती राजवटीशिवाय इतर कोणताही पर्याय नाही, कारण लोक सरकारला घाबरत आहेत असा आरोप चिराग पासवान यांनी केला होता.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारKangana Ranautकंगना राणौतMaharashtraमहाराष्ट्र