शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पायाखाली कधीही घेऊ, म्हणणाऱ्या संजय जाधवांविरोधात पुरावाच शोधला; शिवसेना-राष्ट्रवादीत जुंपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 18:18 IST

जर कुठे चुकीचे वागलो असेल, तर पुरावा द्या, राजकारणातून संन्यास घेईल, असे एका वृत्तवाहिनीला बोलताना शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी सांगितले होते.

परभणी: चुकीचे वागलो असेल तर पुरावा द्या, राजकारणातून संन्यास घेईल, असं शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी घनसावंगीतील भाषणातून सांगितल्यानंतर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी जमिनीच्या एका फेरफार प्रकरणात महसूल कर्मचाऱ्यांवर खासदार जाधव यांनी दबाव टाकल्याचा संबंधित कर्मचाऱ्यांनी लेखी जबाब वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्याची कागदपत्रे मंगळवारी प्रसारमाध्यांना दिली. त्यानुसार त्यांनी खासदार जाधव चुकीचे वागले आहेत. त्यामुळे ते राजकारणातून संन्यास घेणार का?, असा सवाल उपस्थित केला आहे. 

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या बदलीवरुन शिवसेना- राष्ट्रवादीत वाद सुरु झाला आहे. घनसावंगी येथील शिवसेनेच्या मेळाव्यात खासदार जाधव यांनी आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या बदलीबाबत शिफारस केल्याचे सांगितले होते. त्यावेळी राष्ट्रवादीने या प्रश्नावरुन रान उठविले, असे सांगून त्यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली होती. तसेच राष्ट्रवादीला कधीही पायाखाली घेऊ, असे ते म्हणाले होते. 

सदर प्रकरण सोमवारी दिवसभर चर्चेत आल्यानंतर त्यांनी रात्री स्पष्टीकरण दिले होते. त्यात आपल्या म्हणण्याचा विपर्यास केला गेला. मी माझ्या आयुष्यात कधीही चुकीचे काम केले नाही. जर कुठे चुकीचे वागलो असेल, तर पुरावा द्या, राजकारणातून संन्यास घेईल, असे एका वृत्तवाहिनीला बोलताना संजय जाधव यांनी सांगितले होते. त्यांच्या या आवाहनानूसार, राष्ट्रवादीचे परभणी तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांना पत्र दिले असून, त्यात परभणी शहरातील सर्व्हे नं.४० व ५२ येथील जमीन प्रकरणात खासदार जाधव यांनी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यावर दबाव टाकून कमी क्षेत्र असताना जास्तीच्या क्षेत्राची रजिस्ट्री करुन घेतली. त्यावर आपण आक्षेप नोंदिवला. संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर यांच्याकडे १५ मार्च २०२१ रोजी केली. परंतु कुंडेटकर यांनी कारवाई केली नाही.

चुकीचा फेरफार केला- 

जिल्हाधिकारीपदी आंचल गोयल या रुजू होताच कारवाई भीतीने कुंडेटकर यांनी ९ ऑगस्ट रोजी तो फेरफार रद्द केला. या प्रकरणात संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात खासदार जाधव यांनी दबाव टाकल्याचे म्हटले आहे, असेही देशमुख म्हणाले. आता शासकीय कर्मचाऱ्यांनीच खासदार जाधल यांच्या दबावामुळे चुतीचा फेरफार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ते आता राजकीय संन्यास घेणार का?, असा सवाल राष्ट्रवीदीचे तालुकाध्यक्ष देशमुख यांनी उपस्थित केला आहे. 

संजय जाधव नेमकं काय म्हणाले होते?-

भावना अनावर होत आहे. शेवटी काही मर्यादा असतात. कुठपर्यंत शांत बसायचं आणि सहन करायचं. जेव्हा माकडीन बुडायला येते तेव्हा ती लेकरालाही पायाखाली घेते, मग आम्हीही कधीही राष्ट्रवादीला पायाखाली घेऊ शकतो', असं स्फोटक विधान शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी जालनातील पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केलं होतं. त्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीची चांगलीच जुंपल्याचं दिसून येत आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसparabhaniपरभणी