शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

"भविष्यवाणी खरी ठरत नसल्यामुळे भाजपा नेते हताश, त्यामुळेच तारीख पे तारीख…", नवाब मलिकांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 13:01 IST

Nawab Malik : भाजपाचे नेते सत्ता येणार असे वारंवार सांगत असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांचा हाच एककलमी कार्यक्रम असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

ठळक मुद्देबुधवारी नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

मुंबई:  भाजपचे नेते सत्ता येणार असे वारंवार सांगत तारीख पे तारीख देत आहेत. पण एकही भविष्यवाणी सत्य होत नसल्याने ते हताश झाले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार विरोधात एक कलमी कार्यक्रम हे नेते राबवत असल्याची टीका राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. बुधवारी नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपावर हल्लाबोल केला. (NCP leader Nawab Malik slams BJP, said Maharashtra government stable and strong)

कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस या अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देवून राज्यातील जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली आहे. त्यामुळे जनता संतुष्ट आहे. मात्र भाजपाचे नेते सत्ता येणार असे वारंवार सांगत असे बोलून राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत. त्यांचा हाच एककलमी कार्यक्रम असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

याचबरोबर, इतर पक्षातून आलेले आमदार स्वगृही परत जावू नये, या भीतीने राज्यात लवकरच सत्ता येणार असे भाजपा नेणेत्यांकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. त्यामुळे आघाडीला कसलाही धोका नाही, असे नवाब मलिक यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट घेतल्यामुळे तर्कविर्तकांच्या चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. वेगवेगळ्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. तर दुसरीकडे लवकरच भाजपा सत्तेत येणार असल्याची विधाने भाजपा नेत्यांकडून वारंवार केली जात आहे. या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी हे भाष्य केले.

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काल जळगावच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी राज्यात सत्तांतर होण्याचे संकेत दिले होते. सध्या कोविडचा काळ आहे. आमचे सर्व लक्ष त्याकडे आहे. राजकीय सत्तांतर वगैरेकडे आमचे लक्ष नाही. देणार नाही. एकदा संकट गेले तर बघू, असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे राज्यात सत्तांतर होण्याच्या चर्चांनी पुन्हा एकदा खळबळ उडाली.

टॅग्स :nawab malikनवाब मलिकDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार