शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते हे वेगळं सांगण्याची गरज नाही...'; अनिल गोटेंचा सरकारला घरचा आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 17:25 IST

Anil Gote on Mahavikas Aghadi government: 'सत्तारुढ पक्षातील काही नेते प्रसार माध्यमांना स्वतःहून खाद्य पुरवत आहेत'

ठळक मुद्दे'आताचे काही नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पूरवत आहेत''आताच्या नेत्यांना कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे.'

धुळे: 'सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करत आहेत, असे म्हणत राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष अनिल गोटे(Anil Gote) यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर पाळत ठेवत असल्याचे आरोप केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. त्यांच्या आरोपानंतर राष्ट्रवादी-शिवसेनेकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले. या वादात भाजपने उडी घेत सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी सोडली नाही. या सर्व गोष्टीची माध्यमांमध्ये होणारी चर्चा पाहून अनिल गोटेंनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे महाविकास आघाडीच्या नेत्यांना घरचा आहेर दिलाय. 

'...तेव्हा एकही बेडी-वाकडी बातमी आली नाही'

आपल्या प्रसिद्धी पत्रकार गोटे म्हणतात की, 'सत्तारुढ पक्षातील काही नेते विरोधकांना आवडतील अशी वक्तव्य करत आहेत. आघाडीत सहभागी असलेले तीनही पक्ष स्वखुशीने सत्तेत आले आहेत. कुणीही कुणाला बळजबरी केलेली नाही. ती जबाबदारी आपण स्वेच्छेने स्विकारली आहे. 1978 मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुलोदचे सरकार आले. त्या सरकारमध्ये जनसंघ, समाजवादी, प्रजासमाजवादी, शेतकरी कामगार पक्ष तसेच काँग्रेस पक्षातील असंतुष्ट नेते आणि शरद पवारांचा एस. काँग्रेस वगैरे सहभागी होते. मतभेद तेंव्हाही होते. पण चुकूनही वृत्तपत्रात एकही वेडी-वाकडी बातमी आली नाही.

'सत्ता गेल्यावर काय अवस्था होते...'

गोटे पुढे म्हणतात, याउलट आताचे अनेक नेते प्रसिध्दी माध्यमांना स्वतःहून खाद्य पूरवत आहेत. आपले हसू होते हे कोणीतरी खडसावून सांगण्याची गरज आहे. हे कटू सत्य सांगण्याचे धाडस कुणीतरी करणे आवश्यक आहे. हा वाईटपणा घेण्याची जबाबदारी मी स्वतःहून स्वीकारली आहे. आज आपण आपला पक्ष सत्तेत आहे म्हणूनच आपण काय बोलतो? याला प्रसिध्दी माध्यमामध्ये वजन आहे किंवा किंमत आहे. सत्ता गेल्या नंतर आपली काय अवस्था होते हे आपण सर्वांनीच मागील पाच वर्षात अनुभवले आहे. आपण आत्मघात करुन पदरी काय पाडून घेणार आहोत? असा सवाल गोटेंनी विचारला.

भाजपला टोलागोटेंनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात भाजपवरही निशाणा साधला. भाजपचे अतिउत्साही आणि मुख्यमंत्री पदासाठी उतावीळ झालेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना असे काही वक्तव्य आले की, हर्षवायूच होतो. त्यांनी वृत्तपत्रांना लगेच सांगितले की, शिवसेनेचा व राष्ट्रवादी काँग्रेसचा थरकाप उडाला. त्याच दिवशी त्याच वर्तमान पत्रात भाजप नेते अशिष शेलार यांनी मात्र काँग्रेसचे वक्तव्य गांभिर्याने घेण्याची आवश्यकता नाही, असे जाहीर केले. भाजपा नेत्यांनी पक्षांतर्गत असलेल्या नेतृत्व स्पर्धेचे उगाच जाहिर प्रदर्शन करु नये, असाही टोलाही गोटेंनी भाजप नेत्यांना लगावला.

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्रAnil Goteअनिल गोटेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाDhuleधुळेSharad Pawarशरद पवारNana Patoleनाना पटोले