शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

Narayan Rane: “आमची वर सत्ता आहे हे लक्षात ठेवा,” जनआशीर्वाद यात्रेवर गुन्हे दाखल करणाऱ्या ठाकरे सरकारला नारायण राणेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 11:16 IST

Narayan Rane News: काल नारायण राणेंच्या नेतृत्वात मुंबईत झालेल्या जनआशीर्वाद यात्रेवर कठोर कारवाई करताना या यात्रेत सहभागी झालेल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर सात ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई - राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबईसह राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. (Jana Aashirwad Yatra ) दरम्यान, काल नारायण राणेंच्या नेतृत्वात मुंबईत झालेल्या जनआशीर्वाद यात्रेवर कठोर कारवाई करताना या यात्रेत सहभागी झालेल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर सात ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Narayan Rane) दरम्यान, या कारवाईबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी शिवसेना आणि राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे. (Narayan Rane's warning to the Thackeray government who filed a case against Jana Aashirwad Yatra )

नारायण राणे यांनी आज जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, आमच्यावर जेवढे गुन्हे दाखल करायचे आहेत तेवढे करा. मात्र दिल्लीत आमची सत्ता आहे हे लक्षात असू द्या. तुमच्यापेक्षा आम्ही वर आहोत. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्माकराचे गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण करणाऱ्या शिवसैनिकांनाही नारायण राणे यांनी टोला लगावला. त्यांना गोमुत्र शिंपडायचं असेल तर शिंपडू द्या, गोमुत्र प्यायचं असेल तर पिऊ द्या, मात्र आधी मन तरी शुद्ध करा. माझ्यामुळे जर त्यांच्या वडिलांचं स्मारक अपवित्र होणार होतं तर उद्धव ठाकरेंनी मला अडवायला हवं होतं. मी असतो तर अडवलं असतं. पण काल तिथे कुणीचं नव्हते. नंतर पैसे देऊन हे नाटक करून घेतलं, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.

आज सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत सहभागी होणाऱ्या उद्धव ठाकरेंनाही नारायण राणे यांनी टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी हिंदुत्त्वाची होती. त्यांनी सत्तेसाठी कधी या हिंदुत्ववादी विचारसरणीशी तडजोड केली नाही. उलट आजची शिवसेना ही सत्तेसाठी लाचार झाली आहे आणि आज सोनिया गांधींसोबत होणारी बैठक म्हणजे लाचारीचा एक भाग असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होणं आवश्यक आहे आणि पुढील महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपाचीच सत्ता येईल, असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच मराठा आरक्षणाबाबत हे सरकार उदासिन आहे. त्यामुळेच ते आरक्षणाबाबत टाळाटाळ करत आहेत. तसेच आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

दरम्यान, भाजपने काल  आयोजित केलेल्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी मुंबईत ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी या पोलीस ठाण्यांत आयोजकांसह यात सहभागी झालेले नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा