शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

Narayan Rane: “आमची वर सत्ता आहे हे लक्षात ठेवा,” जनआशीर्वाद यात्रेवर गुन्हे दाखल करणाऱ्या ठाकरे सरकारला नारायण राणेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 11:16 IST

Narayan Rane News: काल नारायण राणेंच्या नेतृत्वात मुंबईत झालेल्या जनआशीर्वाद यात्रेवर कठोर कारवाई करताना या यात्रेत सहभागी झालेल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर सात ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई - राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबईसह राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. (Jana Aashirwad Yatra ) दरम्यान, काल नारायण राणेंच्या नेतृत्वात मुंबईत झालेल्या जनआशीर्वाद यात्रेवर कठोर कारवाई करताना या यात्रेत सहभागी झालेल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर सात ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Narayan Rane) दरम्यान, या कारवाईबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी शिवसेना आणि राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे. (Narayan Rane's warning to the Thackeray government who filed a case against Jana Aashirwad Yatra )

नारायण राणे यांनी आज जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, आमच्यावर जेवढे गुन्हे दाखल करायचे आहेत तेवढे करा. मात्र दिल्लीत आमची सत्ता आहे हे लक्षात असू द्या. तुमच्यापेक्षा आम्ही वर आहोत. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्माकराचे गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण करणाऱ्या शिवसैनिकांनाही नारायण राणे यांनी टोला लगावला. त्यांना गोमुत्र शिंपडायचं असेल तर शिंपडू द्या, गोमुत्र प्यायचं असेल तर पिऊ द्या, मात्र आधी मन तरी शुद्ध करा. माझ्यामुळे जर त्यांच्या वडिलांचं स्मारक अपवित्र होणार होतं तर उद्धव ठाकरेंनी मला अडवायला हवं होतं. मी असतो तर अडवलं असतं. पण काल तिथे कुणीचं नव्हते. नंतर पैसे देऊन हे नाटक करून घेतलं, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.

आज सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत सहभागी होणाऱ्या उद्धव ठाकरेंनाही नारायण राणे यांनी टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी हिंदुत्त्वाची होती. त्यांनी सत्तेसाठी कधी या हिंदुत्ववादी विचारसरणीशी तडजोड केली नाही. उलट आजची शिवसेना ही सत्तेसाठी लाचार झाली आहे आणि आज सोनिया गांधींसोबत होणारी बैठक म्हणजे लाचारीचा एक भाग असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होणं आवश्यक आहे आणि पुढील महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपाचीच सत्ता येईल, असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच मराठा आरक्षणाबाबत हे सरकार उदासिन आहे. त्यामुळेच ते आरक्षणाबाबत टाळाटाळ करत आहेत. तसेच आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

दरम्यान, भाजपने काल  आयोजित केलेल्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी मुंबईत ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी या पोलीस ठाण्यांत आयोजकांसह यात सहभागी झालेले नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा