शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा उल्लेख करत प्रियंका गांधी यांचा अमित शाहांवर थेट हल्लाबोल, म्हणाल्या...
2
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
3
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
4
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
5
३ वर्षांपासूनची निष्क्रिय पोस्ट ऑफिस खाती होणार बंद; पाहा पुन्हा अकाऊंट अ‍ॅक्टिव्हेट करता येणार का?
6
पहलगाममध्ये पर्यटकांच्या हत्या, अमरनाथ यात्रेवर मोठ्या हल्ल्याचा सुरू होता कट; धक्कादायक माहिती आली समोर
7
एकीकडे महापूर अन् दुसरीकडे भीषण पाणीटंचाई! भारताने 'सिंधू पाणी करार' रद्द केल्याने पाकिस्तानची कोंडी
8
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
9
IND vs ENG: "हे मला अजिबात आवडणार नाही..." रवी शास्त्री जसप्रीत बुमराहचं नाव घेत काय म्हणाले?
10
मॅकडोनाल्ड्सवर बंदीची मागणी! जगातील सर्वात मोठ्या फूड चेनचा 'अफाट' व्यवसाय माहीतेय का? कधी झाली सुरुवात?
11
"आई दुसऱ्यांच्या घरात भांडी घासायची", महिन्याला ५ हजार कमावणाऱ्या मुलाला ४६ लाखांची नोकरी
12
ऑपरेशन महादेव: पहलगाम हल्ल्यातील तीनही दहशतवाद्यांची 'कुंडली' समोर!
13
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
14
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
15
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
16
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
17
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
18
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
19
आठवा वेतन आयोग कधी लागू होणार, पगार किती वाढणार? अहवालातून झाला मोठा खुलासा
20
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?

Narayan Rane: “आमची वर सत्ता आहे हे लक्षात ठेवा,” जनआशीर्वाद यात्रेवर गुन्हे दाखल करणाऱ्या ठाकरे सरकारला नारायण राणेंचा सूचक इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 11:16 IST

Narayan Rane News: काल नारायण राणेंच्या नेतृत्वात मुंबईत झालेल्या जनआशीर्वाद यात्रेवर कठोर कारवाई करताना या यात्रेत सहभागी झालेल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर सात ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मुंबई - राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबईसह राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. (Jana Aashirwad Yatra ) दरम्यान, काल नारायण राणेंच्या नेतृत्वात मुंबईत झालेल्या जनआशीर्वाद यात्रेवर कठोर कारवाई करताना या यात्रेत सहभागी झालेल्या नेते आणि कार्यकर्त्यांवर सात ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Narayan Rane) दरम्यान, या कारवाईबाबत संतप्त प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी शिवसेना आणि राज्य सरकारला सूचक इशारा दिला आहे. (Narayan Rane's warning to the Thackeray government who filed a case against Jana Aashirwad Yatra )

नारायण राणे यांनी आज जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी जनआशीर्वाद यात्रेत सहभागी झालेल्या नेत्यांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत विचारले असता नारायण राणे म्हणाले की, आमच्यावर जेवढे गुन्हे दाखल करायचे आहेत तेवढे करा. मात्र दिल्लीत आमची सत्ता आहे हे लक्षात असू द्या. तुमच्यापेक्षा आम्ही वर आहोत. यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्माकराचे गोमुत्र शिंपडून शुद्धिकरण करणाऱ्या शिवसैनिकांनाही नारायण राणे यांनी टोला लगावला. त्यांना गोमुत्र शिंपडायचं असेल तर शिंपडू द्या, गोमुत्र प्यायचं असेल तर पिऊ द्या, मात्र आधी मन तरी शुद्ध करा. माझ्यामुळे जर त्यांच्या वडिलांचं स्मारक अपवित्र होणार होतं तर उद्धव ठाकरेंनी मला अडवायला हवं होतं. मी असतो तर अडवलं असतं. पण काल तिथे कुणीचं नव्हते. नंतर पैसे देऊन हे नाटक करून घेतलं, असा टोलाही राणेंनी यावेळी लगावला.

आज सोनिया गांधींसोबतच्या बैठकीत सहभागी होणाऱ्या उद्धव ठाकरेंनाही नारायण राणे यांनी टीकेचे लक्ष्य केले. ते म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंची विचारसरणी हिंदुत्त्वाची होती. त्यांनी सत्तेसाठी कधी या हिंदुत्ववादी विचारसरणीशी तडजोड केली नाही. उलट आजची शिवसेना ही सत्तेसाठी लाचार झाली आहे आणि आज सोनिया गांधींसोबत होणारी बैठक म्हणजे लाचारीचा एक भाग असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.

मुंबई महानगरपालिकेत सत्ता परिवर्तन होणं आवश्यक आहे आणि पुढील महानगरपालिका निवडणुकीमध्ये मुंबईत भाजपाचीच सत्ता येईल, असा विश्वासही नारायण राणे यांनी व्यक्त केला. त्याबरोबरच मराठा आरक्षणाबाबत हे सरकार उदासिन आहे. त्यामुळेच ते आरक्षणाबाबत टाळाटाळ करत आहेत. तसेच आपले अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहेत, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

दरम्यान, भाजपने काल  आयोजित केलेल्या जनआशीर्वाद यात्रेप्रकरणी मुंबईत ७ ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विलेपार्ले, खेरवाडी, माहीम, शिवाजी पार्क, दादर, चेंबूर आणि गोवंडी या पोलीस ठाण्यांत आयोजकांसह यात सहभागी झालेले नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादंवि कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51 आणि मुंबई पोलीस कायद्याच्या कलम 135 अन्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले. याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा