शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Narayan Rane: नारायण राणेंना सोनिया गांधींच्या सल्ल्यानुसार अटक? नाशिक पोलीस आयुक्तांच्या त्या विधानानंतर भाजपाने केला आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 08:45 IST

Narayan Rane News: नारायण राणेंची सुटका झाली असली तरी दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्याचदरम्यान, आता नारायण राणेंच्या अटकेवरून भाजपाने एक गंभीर आरोप केला आहे.

ठळक मुद्देहा देशपातळीवरचा गेम आहे, असे नाशिकचे पोलीस आयुक्त नक्की कशाला म्हणताहेतकेंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्याने झाली आहे का?राज्याच्या पोलीस संचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंविरोधात केलेल्या प्रक्षोभक विधानाप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर पोलिसांनी अटकेची कारवाई केली होती. त्यानंतर नारायण राणेंना लगेच जामिनही मंजूर झाला होता. (Narayan Rane) आता नारायण राणेंची सुटका झाली असली तरी दोन्हीकडून आरोप प्रत्यारोपांचे सत्र सुरू आहे. त्याचदरम्यान, आता नारायण राणेंच्या अटकेवरून भाजपाने एक गंभीर आरोप केला आहे. ( Narayan Rane arrested on Sonia Gandhi's advice? BJP made allegations after that statement of Nashik Police Commissioner)

नारायण राणेंवर झालेली अटकेची कारवाई काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्याने झाली आहे का? असा सवाल भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. नाशिकच्या पोलीस आयुक्तांच्या विधानाचा हवाला देत भातखळकर यांनी एक ट्विट केले आहे. त्यात ते म्हणाले की, हा देशपातळीवरचा गेम आहे, असे नाशिकचे पोलीस आयुक्त नक्की कशाला म्हणताहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरील अटकेची कारवाई काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सल्ल्याने झाली आहे का? राज्याच्या पोलीस संचालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी, अशी मागणीही भातखळकर यांनी यावेळी केली. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देशाच्या स्वातंत्र्य दिनाबद्दल बोलताना केलेल्या विधानाचा संदर्भ देत नारायण राणेंनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. रायगडमध्ये नारायण राणेंनी हे चिथावणीखोर विधान केल्यानंतर महाड, नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली होती. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री आहेत. ते घटनात्मक पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल केलेलं विधान हे संपूर्ण राज्याचा अपमान करणारं आहे, अशी तक्रार नाशिकचे शिवसेनेचे पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांनी दाखल केली होती.  त्यानंतर राणेंना अटक करून महाड येथील कोर्टात हजर करण्यात आले होते. अखेर रात्री उशिरा नारायण राणेंना जामीन मंजूर झाला होता.

दरम्यान, लक्षात ठेवा, तुम्ही माझे काहीही करू शकत नाही. मी तुम्हाला घाबरत नाही. दरवेळी तुम्हाला पुरून उरलो आहे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी बुधवारी शिवसेनेला डिवचले. आपली जन आशीर्वाद यात्रा २७ ऑगस्टपासून सिंधुदुर्गपासून पुन्हा सुरू होईल, असे त्यांनी पत्रपरिषदेत जाहीर केले. मुख्यमंत्र्यांविरोधात केलेल्या वक्तव्याप्रकरणी अटक झाल्यानंतर महाड कोर्टाने मंगळवारी रात्री राणे यांना जामीन मंजूर केला. सुटकेनंतर राणे नेमके काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने मी, माझी मुले मुंबईबाहेर असताना जुहूतील माझ्या घरासमोर जे लोक आले त्यांची माहिती तर मी घेतोच आहे. तुम्हालाही घर, मुलंबाळं नाहीत का? हे लक्षात ठेवा, असा गर्भित इशारा राणे यांनी दिला. राणेंच्या बंगल्यासमोर युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले होते. तुम्हाला सर्वांनाच मी पुरून उरलो आहे. शिवसेनेला निपटण्यासाठी आम्ही समर्थ आहोत. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Atul Bhatkalkarअतुल भातखळकरBJPभाजपाSonia Gandhiसोनिया गांधीPoliticsराजकारण