शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

...तर वाराणसीमधून निवडणूक लढवणार, प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोलेंचं थेट मोदींना आव्हान

By बाळकृष्ण परब | Updated: February 11, 2021 13:41 IST

Nana Patole Challenge to Narendra Modi : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत.

ठळक मुद्देभाजपा आणि मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना आता नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले आव्हानकाँग्रेस पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहेराज्यातील काँग्रेसचे एकमेव लोकसभा खासदार बाळू धानोरकर यांनीही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते

नागपूर - आक्रमक शेतकरी नेते म्हणून ओळख असलेल्या नाना पटोले यांची नुकतीच काँग्रेसच्या (Congress) महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच नाना पटोले भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. भाजपा (BJP) आणि मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करताना आता नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. (Nana Patole Challenge to Narendra Modi)काँग्रेस पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात वाराणसीमधून निवडणूक लढवण्याची आपली तयारी आहे, असे विधान करत नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले आहे. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच नागपूरमध्ये आलेल्या पटोले यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर पटोले यांनी हे विधान केले.दरम्यान, राज्यातील काँग्रेसचे एकमेव लोकसभा खासदार बाळू धानोरकर यांनीही काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान दिले होते. २०२४ च्या निवडणुकीमध्ये पक्षाने आदेश दिल्यास वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प करून दाखवेन अशी गर्जना राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी केली होती.  पक्षश्रेष्ठींनी आदेश द्यावा, बाळू धानोरकर तुम्ही निवडणूक लढवण्यासाठी वाराणसीला जावा. मग तिथे जाऊन निवडणूक नाही लडलो आणि नरेंद्र मोदींना नाही पराभूत केलं, तर मी बाळू धानोरकर नाही, असा इशाराच बाळू धानोरकर यांनी दिला होता.पंतप्रधानपदासाठी दावेदारी केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी निवडणूक लढवण्यासाठी उत्तर प्रदेशमधील वाराणसी मतदारसंघाची निवड केली होती. या मतदारसंघातून लोकसभेच्या दोन निवडणुकांमध्ये मोदी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. टिकैत यांचे अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत; नाना पटोले यांची टीकाराज्यसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. पण  शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या राकेश  टिकैत यांच्या डोळ्यातील अश्रू भाजप नेत्यांना दिसले नाहीत. मोदींना नटसम्राट व्हायचे असेल तर त्यांनी सिनेमात जावे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.  पटोले म्हणाले, अन्नदाता हा प्रमुख घटक अहे. पण मोदींनी शेतकऱ्यांच्या मार्गात खिळे ठोकले. एवढी क्रूरता दाखविली. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसह संपूर्ण जनतेला आम्ही हे तीन काळे कायदे समजावून सांगू. राष्ट्रप्रेम, राष्ट्रभक्ती हे भाजपने देशाला शिकवू नये. पंतप्रधान मोदी लोकसभेत उभे राहून आंदोलनजीवी अशी उपरोधिक टीका करतात. ही नवी परंपरा त्यांनी सुरू केली. हे त्यांचे नवे देशप्रेम लोकांनी ओळखले आहे, अशी टीका त्यांनी केली.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेसNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारण