शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"भाजपाचा आमच्यावर विश्वास नाही, तृणमूल सोडून आलेल्या अनेकांना इथे अस्वस्थ वाटतंय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2021 08:27 IST

MP Sunil Mandal And BJP : टीएमसी सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांशी मुकुल रॉय यांनी संपर्क साधणे सुरू केले आहे. या नेत्यांना पुन्हा टीएमसीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

कोलकाता - ज्येष्ठ नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे माजी सहकारी मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये (टीएमसी) प्रवेश केल्यानंतर आता राज्यातील राजकीय खेळ पुन्हा रंगू लागला आहे. टीएमसी सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या नेत्यांशी मुकुल रॉय यांनी संपर्क साधणे सुरू केले आहे. या नेत्यांना पुन्हा टीएमसीत घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याचसोबत भाजपाचे जुने नेते आणि कार्यकर्ते यांनाही आपल्या तंबूत ओढण्याचे काम टीएमसीने सुरू केले आहे. सूत्रांनुसार आतापर्यंत 25 जणांची प्राथमिक यादी बनवण्यात आली आहे, तर 100 पेक्षा अधिक भाजपा नेते असे आहेत जे त्यांच्या परिसरात वर्चस्व राखून आहेत. 

मुकुल रॉय यांच्या भरवशावर त्यांनी टीएमसी सोडून भाजपात प्रवेश केला होता. या नेत्यांना टीएमसीत पुन्हा घेण्याची रणनीती आखली जात आहे. याच दरम्यान आता तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले सुनिल मंडल (Sunil Mandal) यांनी पक्षाविरोधात आवाज उठवला आहे. भाजपाच्या पक्षांतर्गत कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तृणमूल काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेल्या लोकांवर पक्षाचा विश्वास नसल्याचा गंभीर दावा सुनिल मंडल यांनी केला आहे. तसेच मंडल यांनी सुवेंदू अधिकारी यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. "सुवेंदू अधिकारी यांनी मला दिलेलं एकही वचन पाळलेलं नाही" असं ही म्हटलं आहे. 

सुनिल मंडल यांनी भाजपामध्ये योग्य वागणूक मिळत नसल्याची देखील तक्रार केली. "तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अनेकांना इथे अस्वस्थ वाटत आहे. त्यांचा भाजपामध्ये मनापासून स्वीकार केला गेलेला नाही. भाजपामधल्या काही लोकांना असं वाटतं की पक्षात नव्याने आलेल्या लोकांवर विश्वास ठेवणं योग्य नाही" असं मंडल यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्येभाजपाचे अनेक कार्यकर्ते गावभर फिरुन जनतेची माफी मागत आहेत. विधानसभा निवडणुकांनंतर बंगालचं राजकारण ढवळून निघालं. तृणमूल काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या नेत्यांनी घरवापसी केली आणि आता काही भाजपा कार्यकर्ते भाजपा फ्रॉड पक्ष आहे म्हणत लाऊडस्पीकरवरुन ओरडत, गावभर फिरत जनतेची माफी मागत असल्याची घटना समोर आली आहे. 

"आम्ही चुकलो, भाजपा फ्रॉड पार्टी"; कार्यकर्ते गावभर फिरत मागताहेत जनतेची माफी; 'हे' आहे कारण

बीरभूम जिल्ह्यातील लाभपूर, बोलपूर, सैथिया तसंच हुगली जिल्ह्यातल्या धनियाकली या गावांमधून भाजपा कार्यकर्त्यांनी हा सार्वजनिक माफीनाम्याचा कार्यक्रम केला आहे. भाजपाने गोड बोलून गळ घातली होती पण तो पक्ष फ्रॉड आहे. आमच्याकडे ममता बॅनर्जी यांच्याशिवाय कोणताही पर्याय नाही आणि आम्ही त्यांच्या विकास कार्यक्रमाचा भाग व्हायलाच हवं. मुकूल मंडल नावाच्या एका भाजपा कार्यकर्त्याने सांगितलं की, मी भाजपाला ओळखायला चुकलो. मला तृणमूलमध्ये परत जायचं आहे. सैथियामध्ये तर भाजपाचे 300 कार्यकर्ते शपथ घेतल्यानंतर तृणमूलमध्ये परतले आहेत. 

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाPoliticsराजकारणMamata Banerjeeममता बॅनर्जी