शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

“शिवरायांच्या नावानं राजकारण जरूर करा, पण महाराजांचा ‘हा’ आदेश वाचून आत्मचिंतन करण्याची गरज”

By प्रविण मरगळे | Published: October 22, 2020 11:20 AM

MP Sambhajiraje News: सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोहचवावी अशी मागणी खासदार संभाजीराजेंनी केली आहे.

ठळक मुद्देकष्ट करून गावोगावी फिरा, शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलगाडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे घ्याशिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरूर करा, पण आदेश वाचून आत्मचिंतन करण्याची गरजकेंद्र व राज्य शासनाने एकमेकांकडे बोट न दाखविता सामुहिक जबाबदारी घेत संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक -संभाजीराजे

मुंबई  - परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांवर अतिवृष्टीचं संकट उभं राहिलंय, अतिवृष्टीमुळे अनेक भागातील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे नेते शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दौरे काढत आहेत, मात्र या दौऱ्यात दोघंही एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्यातही व्यस्त आहे. विरोधी पक्षाने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. परंतु सरकारने ठोस मदत देण्याची घोषणा अद्यापही केली नाही.

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुरु असलेल्या राजकीय संघर्षावर खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी भाष्य केले आहे. याबाबत त्यांनी एका पोस्टमधून सर्वच नेत्यांना आत्मचिंतनाची गरज आहे असं म्हटलं आहे. संभाजीराजेंनी पोस्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका आदेशाचा दाखलाही दिला आहे. संभाजीराजे म्हणाले की, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने राजकीय कलगीतुरा बंद करून शेतकऱ्यांना थेट मदत पोहचवावी. शिवरायांच्या नावाने समाजकारण, राजकारण जरूर करा, पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिलेला आदेश वाचून सर्वांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे असं म्हटलं आहे.

छत्रपती शिवरायांच्या या आदेशात म्हटलंय की, कष्ट करून गावोगावी फिरा, शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलगाडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे घ्या, खंडी, दोन खंडी धान्य द्या, दिलेल्या मदतीचा वसूल वाडीदिडीने करू नका, मुद्दलच जेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल अशा शब्दात शेतकऱ्यांना मदत करण्याचा आदेश छत्रपतींनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

दरम्यान खासदार संभाजीराजेंनी बुधवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली होती. राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा स्थितीत केंद्र व राज्य शासनाने एकमेकांकडे बोट न दाखविता सामुहिक जबाबदारी घेत संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना आधार देणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. राज्यभरात पावसाने कहर केला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत. नद्यांनी पात्र बदलले आहे. तर उभी पिके आणि माती सुद्धा वाहून गेली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची नितांत आवश्यकता आहे. राज्य सरकारने प्रतिहेक्टरी ५० हजार रुपयांची मदत तातडीने जाहीर करावी. यासोबतच तेलंगणा राज्याच्या धर्तीवर काही रक्कम त्वरीत शेतकऱ्यांना मिळेल असे पाहावे. मराठवाडा अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करुन आलेल्या छ. संभाजीराजे यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधला होता.

तसेच कोरोनामुळे राज्याच्या तिजोरीत खडखडाट असला तरी शेतकरी जगला पाहिजे. त्यासाठी प्रसंगी कर्ज घ्यावे लागले तरी हरकत नाही. केंद्राकडून मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने प्रस्ताव तयार करायला हवा. ओला दुष्काळ जाहीर केल्याशिवाय राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (एनडीआरएफ) पथक पाहणीला येऊ शकत नाही. त्यामुळे राज्याच्या कॅबिनेटमध्ये याबाबत त्वरीत निर्णय घ्यावा. रब्बीसाठी बँकासुद्धा आता कर्ज देणार नाहीत. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर केला तर कर्ज मिळू शकेल असंही संभाजीराजे म्हणाले होते.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजFarmerशेतकरीRainपाऊसSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीState Governmentराज्य सरकारCentral Governmentकेंद्र सरकार