शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाचा तपास आता रामभरोसे; घोषणा करूनही SIT ची स्थापनाच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 03:41 IST

गृहमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा केल्याने गुन्हा नोंदवल्यानंतरचा पुढील तपास करावा की नाही याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एसआयटी स्थापना होईल म्हणून स्थानिक पोलिसांनी तपास थांबवला अशी माहिती समजते आहे.

मनीषा म्हात्रे मुंबई : दादरा-दादरा-नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास आता रामभरोसे असल्याचे चित्र पाहावयास मिळते आहे. डेलकर आत्महत्या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानसभेत केली होती. मात्र शासनाने एसआयटीची स्थापन न केल्याने तपास ना इथे ना तिथे अशा स्थितीत लटकला आहे.

मरीन ड्राइव्ह येथील सी ग्रीन साऊथ हॉटेलच्या खोलीत २२ फेब्रुवारीला डेलकर यांनी गळफास घेत आयुष्य संपविले. मृत्यूपूर्वी त्यांनी दादरा नगरचे प्रशासक प्रफुल्ल पटेल, जिल्हाधिकारी संदीप सिंग, तत्कालीन पोलीस अधीक्षक शरद दराडे, उपजिल्हाधिकारी अपूर्व शर्मा यांच्यासह नऊ जणांची नावे, या व्यक्तींकडून सातत्याने होणाऱ्या मानसिक छळाचा लेखाजोखा मांडणारी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. पोलीस तपास सुरू होत नाही तोच यावरून राजकारण सुरू झाले. याचे तीव्र पडसाद विधिमंडळाच्या अर्थ संकल्पीय अधिवेशनात उमटले. डेलकर यांचा मुलगा अभिनव यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरुद्ध १० मार्च रोजी मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यावेळी अभिनव यांनी संबंधित व्यक्तीविरुद्ध काही पुरावेही पोलिसांकडे सादर केली होती. पोलीस पुढील तपास करणार तोच अधिवेशनात देशमुख यांनी या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एसआयटी नियुक्तीची घोषणा केली.

गृहमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा केल्याने गुन्हा नोंदवल्यानंतरचा पुढील तपास करावा की नाही याबाबत पोलिसांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. एसआयटी स्थापना होईल म्हणून स्थानिक पोलिसांनी तपास थांबवला अशी माहिती समजते आहे. अशातच डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणात विधी सल्लागाराने मुंबईत गुन्हा दाखल होऊ शकत नसल्याचे सांगितले होते. मात्र गृहमंत्र्यांनी दबाव टाकून हा गुन्हा दाखल करायला भाग पाडल्याचा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे.

एसआयटी स्थापनेबाबत...एसआयटी स्थापनेबाबत अतिरिक्त गृहसचिव मनुकुमार श्रीवास्तव आणि उपसचिव यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. तसेच पोलीस उपायुक्त शशीकुमार मीना आणि तपास अधिकारी एसीपी पांडुरंग शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडूनही याबाबत काहीही प्रतिसाद मिळालेला नाही.

‘साक्षीदारांवर आरोपी दबाव आणू शकतात’डेलकर यांचा मुलगा अभिनवने दिलेल्या माहितीनुसार, गृहमंत्र्यांनी एसआयटीची घोषणा केल्याचे समजले. मात्र अद्याप मुंबई पोलीस किंवा महाराष्ट्र शासनाने एसआयटीबाबत काहीच कळवले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, तपास लांबल्याने या प्रकरणातील साक्षीदारांवर आरोपी दबाव आणू शकतात, अशी भीतीही डेलकर कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखPoliceपोलिस