शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

"मोदी, शहा ‘निपटा दो’ मानसिकतेचे; केंद्राची भूमिका सहकार्याची असावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 02:06 IST

खा. संजय राऊत :महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुढे करून कितीही डावपेच खेळले तरी ‘ते’ उद्ध्वस्त होतील. भाजप शासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही?

विकास झाडे नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात गुजरातची ‘निपटा दो’ मानसिकता भिनली आहे. त्यामुळे ते देशाचे नेते कधीच होऊ शकत नाहीत. केंद्राची भूमिका राज्यांना सहकार्य करण्याची असावी; परंतु दुर्दैवाने मोदींकडून तसे होत नसल्याची प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

खा. राऊत म्हणाले, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग हे खऱ्या अर्थाने देशाचे नेते ठरले.राज्यात कोणाचे सरकार आहे, या बाबी न पाहता त्यांनी देशाचा नेता म्हणून सहकार्य केले. माजी पंतप्रधानांकडून मोदींना हे शिकता आले असते; परंतु त्यांची मानसिकताच ‘निपटा दो’ची असल्याने जिथे भाजपचे राज्य नाही त्या राज्यात केंद्र सरकार कसे वागते, हे देश बघतो आहे.

महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुढे करून कितीही डावपेच खेळले तरी ‘ते’ उद्ध्वस्त होतील. भाजप शासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही? प. बंगाल, महाराष्ट्राचे राज्यपाल वेगळ्या भूमिकेत काम करीत आहेत.भाजप शासित राज्यात मंदिरे का उघडली नाहीत? असा सवाल खा. राऊत यांनी उपस्थित केला. खा. संजय राऊत म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मी खूप काही चांगले शिकलो. विरोधकांशी उत्तम संवाद ठेवायला पाहिजे हे त्यांनीच आम्हाला सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा