शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

"मोदी, शहा ‘निपटा दो’ मानसिकतेचे; केंद्राची भूमिका सहकार्याची असावी"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 02:06 IST

खा. संजय राऊत :महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुढे करून कितीही डावपेच खेळले तरी ‘ते’ उद्ध्वस्त होतील. भाजप शासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही?

विकास झाडे नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यात गुजरातची ‘निपटा दो’ मानसिकता भिनली आहे. त्यामुळे ते देशाचे नेते कधीच होऊ शकत नाहीत. केंद्राची भूमिका राज्यांना सहकार्य करण्याची असावी; परंतु दुर्दैवाने मोदींकडून तसे होत नसल्याची प्रतिक्रिया खा. संजय राऊत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

खा. राऊत म्हणाले, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग हे खऱ्या अर्थाने देशाचे नेते ठरले.राज्यात कोणाचे सरकार आहे, या बाबी न पाहता त्यांनी देशाचा नेता म्हणून सहकार्य केले. माजी पंतप्रधानांकडून मोदींना हे शिकता आले असते; परंतु त्यांची मानसिकताच ‘निपटा दो’ची असल्याने जिथे भाजपचे राज्य नाही त्या राज्यात केंद्र सरकार कसे वागते, हे देश बघतो आहे.

महाराष्ट्रात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पुढे करून कितीही डावपेच खेळले तरी ‘ते’ उद्ध्वस्त होतील. भाजप शासित राज्यात राज्यपालांकडून अस्थिरता का निर्माण केली जात नाही? प. बंगाल, महाराष्ट्राचे राज्यपाल वेगळ्या भूमिकेत काम करीत आहेत.भाजप शासित राज्यात मंदिरे का उघडली नाहीत? असा सवाल खा. राऊत यांनी उपस्थित केला. खा. संजय राऊत म्हणाले, स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून मी खूप काही चांगले शिकलो. विरोधकांशी उत्तम संवाद ठेवायला पाहिजे हे त्यांनीच आम्हाला सांगितले.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहा