शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगपतींच्या आर्थिक फायद्यासाठी मोदींनी आणले नवे कृषी कायदे; काँग्रेसची ‘शेतकरी बचाव’ रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 03:37 IST

एच. के. पाटील यांची टीका:कृषी कायदे करताना मोदी यांनी संसदीय मर्यादा पायदळी तुडविल्या. घटनेमध्ये कृषी हा विषय राज्याच्या सूचीमध्ये समाविष्ट असताना राज्यांशी चर्चा न करता हे कायदे आणले

संगमनेर : गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. विरोधी पक्षांचे सरकार पाडताना आमदार खरेदीसाठी ज्यांनी भाजपला मदत केली अशा उद्योगपतींच्या आर्थिक भल्यासाठी मोदींनी नवीन कृषी कायदे आणले आहेत, अशी टीका प्रदेश काँगे्रसचे प्रभारी हनुमंतगौडा कृष्णेगौडा उर्फ एच. के. पाटील यांनी केली.

काँग्रेसने गुरुवारी राज्यात एकाच वेळी दहा हजार गावांतील शेतकऱ्यांशी व्हर्च्युअल ‘शेतकरी बचाव’ रॅलीद्वारे संवाद साधला. यात संगमनेर (नगर), अमरावती, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, पालघर, कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेसच्या सभा झाल्या. ज्या आॅनलाईन पद्धतीने एकत्रितपणे जोडल्या होत्या. या सभांचे विविध गावांत प्रक्षेपण केले गेले. संगमनेर येथील मुख्य सभेला पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्रीअशोक चव्हाण, काँग्रेसचे महासचिव राजीव सातव यांची उपस्थिती होती.

कृषी कायदे करताना मोदी यांनी संसदीय मर्यादा पायदळी तुडविल्या. घटनेमध्ये कृषी हा विषय राज्याच्या सूचीमध्ये समाविष्ट असताना राज्यांशी चर्चा न करता हे कायदे आणले, अशी टीकाही पाटील यांनी केली. थोरात म्हणाले, काँग्रेस शेतकºयांसाठी तर भाजप धनदांडग्यांसाठी आहे. बाजार समित्या बंद पाडण्याचा केंद्राचा डाव असून त्याचे दूरगामी वाईट परिणाम शेतकºयांना भोगावे लागणार आहेत. नवीन कृषी कायद्यांविरुद्ध काँग्रेस राज्यात एक कोटी शेतकºयांच्या स्वाक्षºया जमा करुन सोनिया गांधी यांच्या माध्यमातून त्या राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविणार आहे. राजीव सातव म्हणाले, चीनने भारतीय भूभाग बळकावला असताना व कोरोनाचे संकट असताना केंद्राने घाईघाईने कृषी कायदे केले. चर्चा न करता हे कायदे मंजूर केल्याने संसदेच्या इतिहासात हा काळा दिवस मानला जाईल.रॅलीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री विश्वजित कदम, सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या सभेतून संबोधित केले. शेतकरी विरोधी कृषी कायदे निरस्त करण्यासाठी राज्य सरकारने पंजाबप्रमाणे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती, विजय वडेट्टीवार व नितीन राऊत नागपूरहून, औरंगाबाद येथून अमित देशमुख व बसवराव पाटील, पालघर येथून के.सी. पाडवी, ग्वालियर येथून मंत्री सुनील केदार यांनी रॅलीत मार्गदर्शन केले.

संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमास बामशी रेड्डी, बी.एम. संदीप, आशिष दुवा, आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार लहू कानडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे उपस्थित होते.बाजार समितीच्या कायद्यात बदलाचे संकेतमंत्री अशोक चव्हाण यांनी बाजार समितीच्या कायद्यांमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितले. समित्यांच्या कामकाजात काही त्रुटी आहेत, त्या दूर करू. मात्र, लोकशाही मार्गाने उभारलेल्या या संस्था मोडू देणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmerशेतकरीagricultureशेतीNarendra Modiनरेंद्र मोदी