शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
2
आधी क्रूरपणे अत्याचार, नंतर ५ हजारांची ऑफर; पीडितेचे वडील म्हणाले, "बंगालमध्ये औरंगजेबाचं शासन"
3
लोकल लेट झाल्याने बदलापूर स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी; गर्दी आवरण्यासाठी रेल्वे सुरक्षा बल स्थानकात
4
Jammu And Kashmir : सैन्याला मोठं यश! जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये २ दहशतवाद्यांचा खात्मा, सर्च ऑपरेशन सुरू
5
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
6
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
7
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
8
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
9
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
10
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
11
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
12
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
13
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
14
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
15
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
16
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
17
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
18
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
19
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
20
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन

उद्योगपतींच्या आर्थिक फायद्यासाठी मोदींनी आणले नवे कृषी कायदे; काँग्रेसची ‘शेतकरी बचाव’ रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 03:37 IST

एच. के. पाटील यांची टीका:कृषी कायदे करताना मोदी यांनी संसदीय मर्यादा पायदळी तुडविल्या. घटनेमध्ये कृषी हा विषय राज्याच्या सूचीमध्ये समाविष्ट असताना राज्यांशी चर्चा न करता हे कायदे आणले

संगमनेर : गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. विरोधी पक्षांचे सरकार पाडताना आमदार खरेदीसाठी ज्यांनी भाजपला मदत केली अशा उद्योगपतींच्या आर्थिक भल्यासाठी मोदींनी नवीन कृषी कायदे आणले आहेत, अशी टीका प्रदेश काँगे्रसचे प्रभारी हनुमंतगौडा कृष्णेगौडा उर्फ एच. के. पाटील यांनी केली.

काँग्रेसने गुरुवारी राज्यात एकाच वेळी दहा हजार गावांतील शेतकऱ्यांशी व्हर्च्युअल ‘शेतकरी बचाव’ रॅलीद्वारे संवाद साधला. यात संगमनेर (नगर), अमरावती, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, पालघर, कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेसच्या सभा झाल्या. ज्या आॅनलाईन पद्धतीने एकत्रितपणे जोडल्या होत्या. या सभांचे विविध गावांत प्रक्षेपण केले गेले. संगमनेर येथील मुख्य सभेला पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्रीअशोक चव्हाण, काँग्रेसचे महासचिव राजीव सातव यांची उपस्थिती होती.

कृषी कायदे करताना मोदी यांनी संसदीय मर्यादा पायदळी तुडविल्या. घटनेमध्ये कृषी हा विषय राज्याच्या सूचीमध्ये समाविष्ट असताना राज्यांशी चर्चा न करता हे कायदे आणले, अशी टीकाही पाटील यांनी केली. थोरात म्हणाले, काँग्रेस शेतकºयांसाठी तर भाजप धनदांडग्यांसाठी आहे. बाजार समित्या बंद पाडण्याचा केंद्राचा डाव असून त्याचे दूरगामी वाईट परिणाम शेतकºयांना भोगावे लागणार आहेत. नवीन कृषी कायद्यांविरुद्ध काँग्रेस राज्यात एक कोटी शेतकºयांच्या स्वाक्षºया जमा करुन सोनिया गांधी यांच्या माध्यमातून त्या राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविणार आहे. राजीव सातव म्हणाले, चीनने भारतीय भूभाग बळकावला असताना व कोरोनाचे संकट असताना केंद्राने घाईघाईने कृषी कायदे केले. चर्चा न करता हे कायदे मंजूर केल्याने संसदेच्या इतिहासात हा काळा दिवस मानला जाईल.रॅलीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री विश्वजित कदम, सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या सभेतून संबोधित केले. शेतकरी विरोधी कृषी कायदे निरस्त करण्यासाठी राज्य सरकारने पंजाबप्रमाणे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती, विजय वडेट्टीवार व नितीन राऊत नागपूरहून, औरंगाबाद येथून अमित देशमुख व बसवराव पाटील, पालघर येथून के.सी. पाडवी, ग्वालियर येथून मंत्री सुनील केदार यांनी रॅलीत मार्गदर्शन केले.

संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमास बामशी रेड्डी, बी.एम. संदीप, आशिष दुवा, आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार लहू कानडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे उपस्थित होते.बाजार समितीच्या कायद्यात बदलाचे संकेतमंत्री अशोक चव्हाण यांनी बाजार समितीच्या कायद्यांमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितले. समित्यांच्या कामकाजात काही त्रुटी आहेत, त्या दूर करू. मात्र, लोकशाही मार्गाने उभारलेल्या या संस्था मोडू देणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmerशेतकरीagricultureशेतीNarendra Modiनरेंद्र मोदी