शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

उद्योगपतींच्या आर्थिक फायद्यासाठी मोदींनी आणले नवे कृषी कायदे; काँग्रेसची ‘शेतकरी बचाव’ रॅली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2020 03:37 IST

एच. के. पाटील यांची टीका:कृषी कायदे करताना मोदी यांनी संसदीय मर्यादा पायदळी तुडविल्या. घटनेमध्ये कृषी हा विषय राज्याच्या सूचीमध्ये समाविष्ट असताना राज्यांशी चर्चा न करता हे कायदे आणले

संगमनेर : गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. विरोधी पक्षांचे सरकार पाडताना आमदार खरेदीसाठी ज्यांनी भाजपला मदत केली अशा उद्योगपतींच्या आर्थिक भल्यासाठी मोदींनी नवीन कृषी कायदे आणले आहेत, अशी टीका प्रदेश काँगे्रसचे प्रभारी हनुमंतगौडा कृष्णेगौडा उर्फ एच. के. पाटील यांनी केली.

काँग्रेसने गुरुवारी राज्यात एकाच वेळी दहा हजार गावांतील शेतकऱ्यांशी व्हर्च्युअल ‘शेतकरी बचाव’ रॅलीद्वारे संवाद साधला. यात संगमनेर (नगर), अमरावती, नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, पालघर, कोल्हापूर या ठिकाणी काँग्रेसच्या सभा झाल्या. ज्या आॅनलाईन पद्धतीने एकत्रितपणे जोडल्या होत्या. या सभांचे विविध गावांत प्रक्षेपण केले गेले. संगमनेर येथील मुख्य सभेला पाटील, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्रीअशोक चव्हाण, काँग्रेसचे महासचिव राजीव सातव यांची उपस्थिती होती.

कृषी कायदे करताना मोदी यांनी संसदीय मर्यादा पायदळी तुडविल्या. घटनेमध्ये कृषी हा विषय राज्याच्या सूचीमध्ये समाविष्ट असताना राज्यांशी चर्चा न करता हे कायदे आणले, अशी टीकाही पाटील यांनी केली. थोरात म्हणाले, काँग्रेस शेतकºयांसाठी तर भाजप धनदांडग्यांसाठी आहे. बाजार समित्या बंद पाडण्याचा केंद्राचा डाव असून त्याचे दूरगामी वाईट परिणाम शेतकºयांना भोगावे लागणार आहेत. नवीन कृषी कायद्यांविरुद्ध काँग्रेस राज्यात एक कोटी शेतकºयांच्या स्वाक्षºया जमा करुन सोनिया गांधी यांच्या माध्यमातून त्या राष्ट्रपतींपर्यंत पोहोचविणार आहे. राजीव सातव म्हणाले, चीनने भारतीय भूभाग बळकावला असताना व कोरोनाचे संकट असताना केंद्राने घाईघाईने कृषी कायदे केले. चर्चा न करता हे कायदे मंजूर केल्याने संसदेच्या इतिहासात हा काळा दिवस मानला जाईल.रॅलीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री विश्वजित कदम, सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या सभेतून संबोधित केले. शेतकरी विरोधी कृषी कायदे निरस्त करण्यासाठी राज्य सरकारने पंजाबप्रमाणे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी चव्हाण यांनी केली. मंत्री यशोमती ठाकूर यांनी अमरावती, विजय वडेट्टीवार व नितीन राऊत नागपूरहून, औरंगाबाद येथून अमित देशमुख व बसवराव पाटील, पालघर येथून के.सी. पाडवी, ग्वालियर येथून मंत्री सुनील केदार यांनी रॅलीत मार्गदर्शन केले.

संगमनेर येथील मुख्य कार्यक्रमास बामशी रेड्डी, बी.एम. संदीप, आशिष दुवा, आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेस नेते मोहन जोशी, आमदार लहू कानडे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे उपस्थित होते.बाजार समितीच्या कायद्यात बदलाचे संकेतमंत्री अशोक चव्हाण यांनी बाजार समितीच्या कायद्यांमध्ये काही बदल करणार असल्याचे सांगितले. समित्यांच्या कामकाजात काही त्रुटी आहेत, त्या दूर करू. मात्र, लोकशाही मार्गाने उभारलेल्या या संस्था मोडू देणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसFarmerशेतकरीagricultureशेतीNarendra Modiनरेंद्र मोदी