शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

मोदी यांनी प्रतिज्ञापत्रांत दिली उलटसुलट माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2019 05:52 IST

निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी आता काँग्रेस दबाव आणू लागला आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेविषयी सतत प्रश्न उपस्थित केले जात असतानाच पंतप्रधान मोदी व भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावरही कारवाई करण्यात यावी, यासाठी आता काँग्रेस दबाव आणू लागला आहे.मोदी व शहा यांच्या भाषणांविषयी काँग्रेसने आधीच आयोगाकडे तक्रार केली आहे. यांच्यावर कारवाई होत नसल्याबद्दल अन्य विरोधी पक्षांनीही नाराजी व्यक्त केली आहे. बसपच्या नेत्या मायावती यांनी तर या दोघांवर कारवाई का होत नाही, असा थेट सवालच केला आहे.त्यातच मोदी यांच्या संपत्ती व मालमत्तेविषयी काँग्रेसने प्रश्न उपस्थित केला. सुप्रीम कोर्टात दाखल साकेत गोखले यांच्या जनहित याचिकेच्या आधारे काँग्रेसने मोदी यांनी प्रतिज्ञापत्रात अर्धवट माहिती दिल्याची तक्रार केली. या आधी काँग्रेसने स्मृती इराणी यांच्या गेल्या व या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रांतील माहिती परस्परविरोधी असल्याची तक्रार करीत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी केली आहे.नरेंद्र मोदी यांनी २00७च्या प्रतिज्ञापत्रात गांधीनगरच्या सेक्टर १ मध्ये ४११ क्रमांकाचा भूखंड आपल्याकडे आहे व त्याचे क्षेत्रफळ ३२६.२२ चौरस मीटर असल्याचे म्हटले होते. त्यावरील बांधकामाची किंमत ३0 हजार ३६३ रुपये दाखविली होती, पण २0१२च्या निवडणुकीत याचा उल्लेखच प्रतिज्ञापत्रातून गायब झाला. तो विकला का, याचाही उल्लेख त्यात केला नाही. त्याऐवजी ४0१ ए या भूखंडाचा एक चतुर्थांश हिस्सा आपल्याकडे असल्याचे मोदी यांनी नमूद केले.त्यामुळे आधी दाखविलेला ४११ क्रमांकाचा भूखंड कुठे गेला व त्याऐवजी ४0१ ए भूखंड कसा आला, असा प्रश्न काँग्रेसने विचारला. गेल्या, २0१४च्या लोकसभा निवडणुकीतही मोदी यांनी ४११ क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेख केला नव्हता, तसेच ३१ मार्च, २0१८ रोजी मोदी यांनी मालमत्तेची जी माहिती वेबसाइटवर टाकली, त्यातही भूखंड क्रमांक ४0१ ए चा एक चतुर्थांश हिस्सा आपल्याकडे असल्याचे नमूद केले आहे. जमिनीचे रेकॉर्ड तपासले असता, त्यात ४0१ ए क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेखच नसल्याचे आढळल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. तिथे ४११ क्रमांकाच्या भूखंडाचा उल्लेखच आहे, तसेच ४0१ क्रमांकाचा भूखंड अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या नावे असून, त्यांनीही ४0१ क्रमांकाच्या भूखंडावर एकचतुर्थांश मालकी हक्क असल्याचे म्हटले आहे. या भूखंडावर जेटली व मोदी यांचा प्रत्येकी एक चतुर्थांश मालकी हक्क असेल, तर मग दोन्ही भूखंडांचे क्षेत्रफळ सारखे कसे काय, असा काँग्रेसचा सवाल आहे.त्यामुळे आयोगाने कारवाई करून या भूखंडाच्या मालकी हक्काचा गोंधळ उघड करावा आणि नरेंद्र मोदी यांनी कोणत्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती दिली आहे, हे सांगावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.>प्रसंगी कोर्टात जाण्याचा इशारापंतप्रधान मोदी यांच्याविरुद्ध एकापाठोपाठ एक पुरावे समोर आणून त्यांच्यावर कारवाईसाठी काँग्रेस आता निवडणूक आयोगावर दबाव आणण्याच्या तयारीत आहे. निवडणूक आयोगाने या पुराव्यांच्या आधारे कारवाई न केल्यास प्रसंगी आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असे काँग्रेसने म्हटले आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेस