शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"कोरोनाचं महाराष्ट्रावर प्रेम आहे की ठाकरे सरकारचं कोरोनावर प्रेम आहे?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 12:17 IST

mns slams thackeray government over restrictions imposed to curb coronavirus: मनसेचा ठाकरे सरकारला सवाल; प्रशासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांना विरोध

मुंबई: राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं वाढत आहे. त्यामुळे अनेक भागांत पुन्हा कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहेत. काही भागांमध्ये लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे. फक्त महाराष्ट्रातच कोरोना कसा वाढतोय, असा सवाल मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडेंनी उपस्थित केला आहे. (mns slams thackeray government over restrictions imposed to curb coronavirus)राज ठाकरेंचे 'मास्क नको', तर मनसेचे आमदार घालतायेत मास्क, पदाधिकारी म्हणतात...'महाराष्ट्राला लागून असलेली राज्य गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश इथे कोरोना वाढत नाही. कोरोनाच महाराष्ट्रावर प्रेम आहे की महाराष्ट्र सरकारचं कोरोनावर प्रेम आहे? की स्वतःच अपयश झाकण्यासाठी टाळेबंदी आणि कोरोनाचा वापर होतोय?', असे प्रश्न देशपांडेंनी ट्विट करून विचारले आहेत. राज्य सरकारकडून जनतेला कोरोनाची नाहक भीती दाखवली जात असल्याचा आरोप मनसेकडून अनेकदा करण्यात आला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी मास्क वापरणार नसल्याची भूमिका घेतली आहे. तुमची घाणेरडी प्रकरणं बाहेर येत आहेत, म्हणून कोरोना वाढतोय का? महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांमध्ये कोरोना नाही. मग महाराष्ट्रातच तो कसा वाढतोय? सरकारचं कोरोनावर प्रेम आहे की कोरोनाचं सरकारवर प्रेम आहे? अशी प्रश्नांची सरबत्ती मनसेनं राज्य सरकारवर केली आहे.  सरकार एवढे कडक निर्बंध लावत असेल, तर जनतेला काही सवलती देणार का? असाही प्रश्न मनसेकडून उपस्थित करण्यात आला आहे.मी तुम्हाला संधी द्यायला तयार आहे, 'या' व्यक्तींना राज ठाकरेंचं आवाहनरुग्ण संख्या कमी झाल्यावर आदित्य ठाकरेंचा वरळी पॅटर्न अन्...कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंच्या 'वरळी पॅटर्न'चं कौतुक करायचं आणि रुग्ण संख्या वाढल्यावर लोकांना बेजबाबदार म्हणायचं, अशा शब्दांत मनसेकडून ठाकरे सरकारवर निशाणा साधण्यात आला. सरकार कोरोनाच्या नावाखाली लोकांना घाबरवायचं काम करत आहे. लोकांनी कामं करायची नाहीत का?, असा प्रश्न मनसेनं सरकारला विचारला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSandeep Deshpandeसंदीप देशपांडेMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे