शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
2
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
3
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
4
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
5
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
6
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
7
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
8
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
9
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
10
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
11
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
12
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
13
इंडिगोला आणखी एक धक्का; रांचीत लँडिंग दरम्यान 'टेल स्ट्राइक'; थोडक्यात वाचले ७० प्रवासी
14
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
15
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
16
"आम्ही थांबणार नाही..", दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच भारती सिंग करतेय तिसऱ्या बाळाचं प्लानिंग? पती हर्ष म्हणाला...
17
Stock Market Holidays: पुढच्या वर्षी १५ दिवस बंद राहणार शेअर बाजार, पाहा NSE मध्ये सुट्ट्या कधी, पाहा लिस्ट
18
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी उपस्थित केलं भाजपाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह, म्हणाले, येथे सर्व निर्णय... 
19
जिथं वक्फचा वाद उफाळला, तिथे भाजपाला मिळाला 'ऐतिहासिक' विजय; केरळमध्ये हैराण करणारा निकाल
20
Gold-Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; १८ कॅरेट सोनंही १ लाखांच्या पार, मुंबई ते दिल्ली नवे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

कुंथत कुंथत सरकार चालत नाही; ठाकरे सरकारला राज ठाकरेंचा टोला

By कुणाल गवाणकर | Updated: October 29, 2020 16:19 IST

Raj Thackeray meets governor bhagat singh koshyari: मनसे प्रमुख राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल कोश्यारींची भेट

मुंबई: कुंथत कुंथत सरकार चालत नाही. हे कशासाठी इतके कुंथत आहेत, तेच मला कळत नाही, अशा शब्दांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाविकास आघाडी सरकारला टोला लगावला आहे. रस्त्यावर वाहतूक कोंडी आहे. पण रेल्वे सेवा सुरू नाही. रेस्टॉरंट, हॉटेल सुरू आहेत. पण मंदिरं खुली करण्यास परवानगी नाही. हा नेमका काय प्रकार सुरू आहे, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतल्यानंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला.राज्यात प्रश्नांची कमतरता नाही. पण निर्णयांची कमतरता आहे, अशी टीका राज ठाकरेंनी केली. 'राज्यात अनेक प्रश्न आहेत. अकरावीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रखडले आहेत. रेल्वे महिलांसाठी सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र इतरांसाठी त्या बंदच आहेत. रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असताना रेल्वे सर्वसामान्यांसाठी बंद आहे. हॉटेल्स सुरू करण्यास मुभा आहे. पण मंदिरं खुली करण्यास अद्याप परवानगी नाही. या धरसोड वृत्तीमागचं कारण अद्याप मला समजलेलं नाही. सरकारनं एकदा नीट विचार करून काय सुरू काय बंद याची माहिती लोकांना द्यावी,' असं राज ठाकरे म्हणाले. “प्रश्न खूप पण निर्णयांचा अभाव”; राज ठाकरेंनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेटराज ठाकरेंनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडे वाढलेल्या वीज बिलांचा प्रश्न मांडला. 'वीजबिलाचा विषय मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. वीजबिल कमी करू शकतो असं कंपन्यांचं म्हणणं आहे पण राज्य सरकारकडून यावर निर्णय होत नाही. राज्य सरकारनं तात्काळ वीजबिलासंदर्भात निर्णय घ्यायला हवा. कोणतीही गोष्ट सांगितली तर त्यावर काम सुरु आहे असं उत्तर मिळतं. पण निर्णय होत नाही, लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यात भरमसाठ वीजबिल येत आहेत, लोक बिल कुठून भरणार? बिल नाही भरलं तर वीज कापणार त्यामुळे सरकारने यावर लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी राज ठाकरेंनी केली.चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना टोला; "शरद पवार घराबाहेर पडतात, पण..."लोकांना जिथे २ हजार बिल येत होतं तिथे १० हजार बिले येतंय. लोकांना वीजबिलाचा मोठा फटका बसतोय, राज्य सरकारला या विषयाशी कल्पना आहे. लवकरात लवकर या समस्येवर तोडगा निघावा, याबाबत लवकरच शरद पवार यांच्याशी बोलणार आहे, गरज पडल्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही भेटणार आहे असं त्यांनी सांगितलं.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSharad Pawarशरद पवारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी