शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

भाजप-मनसेचं सूत जुळणार का?; 'त्या' भूमिकांचा दाखला देत राज ठाकरे स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 13:32 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या विधानावर प्रतिक्रिया देत नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेची आणि कौतुकाचीही करून दिली आठवण

पुणे: महापालिका निवडणुकीच्या तयारीच्या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे पुण्यात आहेत. शिवसेनेनं भारतीय जनता पक्षाची साथ सोडल्यानं मनसे आणि भाजपचं सूत जुळणार का, याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी राज ठाकरे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची काही दिवसांपूर्वी भेट झाली. त्यानंतर भाजप आणि मनसे युतीच्या चर्चांना उधाण आलं. याबद्दल राज यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट भूमिका मांडली.

परप्रांतीयांबद्दलची भूमिका मनसे आणि भाजपमधील युतीत अडथळा ठरत असल्याची चर्चा आहे. त्याबद्दल राज आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीत चर्चा झाली. त्यावर राज यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केलं. 'चंद्रकांत पाटील यांनी परप्रांतीयांबद्दलच्या भूमिकेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केला. त्यावर मी याबद्दलची माझी भूमिका स्पष्ट करणारी एक लिंक पाठवेन, असं त्यांना सांगितलं होतं. मात्र अद्याप तरी मी त्यांना क्लिप पाठवलेली नाही. तुम्ही त्या क्लिपवरून सूत जुळवू नका,' असं राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या बाबतीतली त्यांची भूमिका स्पष्ट करायला हवी असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्यावर माझ्या भूमिका स्पष्टच आहेत, असं राज ठाकरेंनी म्हटलं. परप्रांतीयांनी भूमिपुत्रांवर अतिक्रमण करू नये आणि स्थानिकांनी परप्रांतीयांवर अतिक्रमण करू नये हीच माझी भूमिका आहे. मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जे निर्णय पटले, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन केलं. जे मला पटलं नाही, त्यावर मी टीका केली. स्पष्ट बोलण्यात चुकीचं काय आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

राज्य सरकारनं लागू केलेल्या लॉकडाऊनवरही राज यांनी भाष्य केलं. 'लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे हाल होतात. कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास करू देण्यास हरकत नाही. कारण लोकलशिवाय अनेकांना ऑफिसला जाता येत नाही. सरकारनं सतत लॉकडाऊन वाढवत न्यायचा आणि आम्ही प्रश्नच विचारायचे नाहीत, असं होऊ शकत नाही. पत्रकार पी. साईनाथ यांचं 'दुष्काळ आवडे सर्वांना' नावाचं पुस्तक आहे. तसं 'लॉकडाऊन आवडे सरकारला' अशी अवस्था आता झाली आहे', अशी टीका राज यांनी केली. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाchandrakant patilचंद्रकांत पाटीलNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस