शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
3
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
4
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
5
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
6
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
7
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
8
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
9
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?
10
"चीन अमेरिकेला मागे टाकणार, तिसरं महायुद्ध, अन्...!"; 2026 साठी बाबा वेंगाची भविष्यवाणी, भारतासह जागात काय-काय घडणार?
11
बाजारात गेलेल्या सुनेचा २ वर्षांनी विहिरीत सापडला सांगाडा; राँग नंबरवरुन सुरू झालेली लव्हस्टोरी
12
जगात पहिल्यांदा 'ड्रोन वॉल' बनणार; रशियाला घाबरुन २७ देशांनी निर्णय घेतला, जाणून घ्या कसे करणार काम
13
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
14
Pune Viral Video: केस पकडले, कमरेत लाथा मारल्या; पुण्यात भररस्त्यात तरुणीला मारहाण; घटनेचा व्हिडीओ व्हायरल
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...
17
Viral Video: मुंबई लोकलमध्ये नवरात्रीचा जल्लोष! 'एक नंबर, तुझी कंबर' गाण्यावर महिलांचा जबरदस्त डान्स
18
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
19
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
20
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम

ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचा शिवसेनेला धक्का; नेत्याने शिवबंधन सोडून काँग्रेसचा 'हात' धरला

By प्रविण मरगळे | Updated: January 4, 2021 12:44 IST

मीरा-भाईंदरमध्येही हा प्रकार पाहायला मिळाला आहे. येथे शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला आहे.

मीरा-भाईंदर – काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या ५ नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला होता, हा वाद इतका विकोपाला गेला की, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करत पक्ष सोडून गेलेल्या ५ नगरसेवकांना शिवसेनेत पुन्हा पाठवण्याची विनंती राष्ट्रवादीला केली होती, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, परंतु स्थानिक पातळीवर अद्यापही काही ठिकाणी तिन्ही पक्ष एकमेकांचे नेते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

मीरा-भाईंदरमध्येही हा प्रकार पाहायला मिळाला आहे. येथे शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेचे मेनेंजीस सातन यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा हात हाती धरला आहे. काशीमिरा हायवे येथे शिवसेनेचे मेनेंजीस सातन यांचा दबदबा होता, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत सातन यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

मीरारोडच्या काँग्रेस पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं, त्यानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी शिवसेना-काँग्रेसमधील नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत होते, परंतु राज्यात सत्तेत एकत्र असताना या पक्षांतराकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

औरंगाबाद नामांतरणावरूनही शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद

राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरूनही राजकारण पेटलं आहे. विरोधक भाजपा आणि मनसे यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरण छत्रपती संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी लावून धरली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने औरंगाबादचं संभाजीनगर होणार का? हे पाहणं गरजेचे आहे, पण तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतरणाचे विषय आणले जाणार नाहीत, शिवसेना असा प्रस्ताव आणेल वाटत नाही, नामांतरण करून काही होणार नाही अशी भूमिका घेतल्याने काँग्रेस-शिवसेना यांच्यात मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहेत.

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्धार

काँग्रेस हायकमांड फारसे उत्सुक नसतानाही केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हेतूने राज्यातील काही नेत्यांच्या आग्रहाखातर हायकमांडने महाविकास आघाडीच्या प्रयोगाला मान्यता दिली आहे. मात्र, मुंबईतील काही नेत्यांचा व मुख्यत्वे राज्य सरकारमध्ये मंत्रिपदे न मिळालेल्या काहींचा या सरकारला विरोध आहे. त्या नेत्यांना लागलीच तोंड देणे टाळण्याकरिता मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस