शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

ठाणे जिल्ह्यात काँग्रेसचा शिवसेनेला धक्का; नेत्याने शिवबंधन सोडून काँग्रेसचा 'हात' धरला

By प्रविण मरगळे | Updated: January 4, 2021 12:44 IST

मीरा-भाईंदरमध्येही हा प्रकार पाहायला मिळाला आहे. येथे शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला आहे.

मीरा-भाईंदर – काही महिन्यांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात शिवसेनेच्या ५ नगरसेवकांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला होता, हा वाद इतका विकोपाला गेला की, खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मध्यस्थी करत पक्ष सोडून गेलेल्या ५ नगरसेवकांना शिवसेनेत पुन्हा पाठवण्याची विनंती राष्ट्रवादीला केली होती, राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, परंतु स्थानिक पातळीवर अद्यापही काही ठिकाणी तिन्ही पक्ष एकमेकांचे नेते फोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

मीरा-भाईंदरमध्येही हा प्रकार पाहायला मिळाला आहे. येथे शिवसेनेच्या स्थानिक नेत्याने समर्थकांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करत शिवसेनेला धक्का दिला आहे. शिवसेनेचे मेनेंजीस सातन यांनी कार्यकर्त्यांसह काँग्रेसचा हात हाती धरला आहे. काशीमिरा हायवे येथे शिवसेनेचे मेनेंजीस सातन यांचा दबदबा होता, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष मुझफ्फर हुसेन यांच्या उपस्थितीत सातन यांनी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

मीरारोडच्या काँग्रेस पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदावरून भाजपा आणि शिवसेनेचं बिनसलं, त्यानंतर एकमेकांचे कट्टर विरोधक राहिलेले काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेनेने हातमिळवणी करत राज्यात महाविकास आघाडी स्थापन करून सत्ता मिळवली, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यापूर्वी शिवसेना-काँग्रेसमधील नेते एकमेकांच्या पक्षात प्रवेश करत होते, परंतु राज्यात सत्तेत एकत्र असताना या पक्षांतराकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

औरंगाबाद नामांतरणावरूनही शिवसेना-काँग्रेसमध्ये मतभेद

राज्यात औरंगाबाद शहराच्या नामांतरणावरूनही राजकारण पेटलं आहे. विरोधक भाजपा आणि मनसे यांनी औरंगाबाद शहराच्या नामांतरण छत्रपती संभाजीनगर करण्यात यावं अशी मागणी लावून धरली आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्याने औरंगाबादचं संभाजीनगर होणार का? हे पाहणं गरजेचे आहे, पण तत्पूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी नामांतरणाचे विषय आणले जाणार नाहीत, शिवसेना असा प्रस्ताव आणेल वाटत नाही, नामांतरण करून काही होणार नाही अशी भूमिका घेतल्याने काँग्रेस-शिवसेना यांच्यात मतभेद असल्याचं पाहायला मिळत आहेत.

मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्धार

काँग्रेस हायकमांड फारसे उत्सुक नसतानाही केवळ भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या हेतूने राज्यातील काही नेत्यांच्या आग्रहाखातर हायकमांडने महाविकास आघाडीच्या प्रयोगाला मान्यता दिली आहे. मात्र, मुंबईतील काही नेत्यांचा व मुख्यत्वे राज्य सरकारमध्ये मंत्रिपदे न मिळालेल्या काहींचा या सरकारला विरोध आहे. त्या नेत्यांना लागलीच तोंड देणे टाळण्याकरिता मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे.

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस