शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

राज्यात मध्यावधी निवडणुका? १०० मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची फिल्डिंग; ‘सुपर १००’ मोहिम हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 21:20 IST

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर शिवसेना-राष्ट्रवादी निवडणूक लढवतील असं सांगितलं आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे.

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे असं चित्र दिसत नाही. एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यात दौरा करून आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं महाविकास आघाडी म्हणून निवडणुकांना सामोरं जावं असं म्हटलं आहे. यातच आत शिवसेनेने काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणूक लढवेल असं सांगितले आहे.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर शिवसेना-राष्ट्रवादी निवडणूक लढवतील असं सांगितलं आहे. भाजपाही आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुपर १०० मोहिम हाती घेतली आहे.

काय आहे सुपर १०० मोहिम?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेने राज्यात सुपर १०० मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत ३४ विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे ३४ पदाधिकारी राज्यातील १०० मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रैस मजबूत करण्याचं काम करतील. राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडलेले हे १०० मतदारसंघ असे आहेत ज्याठिकाणी राष्ट्रवादी मागील निवडणुकांमध्ये नंबर दोन आणि तीन क्रमांकावर होती. त्यामुळे या मतदारसंघातील संघटनात्मक पातळीवर मजबुती आणण्याची जबाबदारी युवक कार्यकर्त्यांना सोपवली आहे.

कोरेगाव, पाटण, कुर्ला, कर्जत, जळगाव शहर, चाळीसगाव, एरंडोल, पाचोरा, बाळापूर, मुर्तीजापूर, कारंजा, मेळघाट, हिंगणघाट, हिंगणा, तिरोडा, डिग्रस, किनवट, लोहा, जिंतूर, गंगाखेड, बदनापूर, भोकरदन, कन्नड, औरंगाबाद(मध्य), पैठण, गंगापूर, वैजापूर, नांदगाव, बागलान, नाशिक(पश्चिम), भिवंडी ग्रामीण, मुरबाड, उल्हासगर, कल्याण पूर्व, ऐरोली, बेलापूर, मागाठणे, विक्रोळी, भोसरी, चिंचवड, चोपडा, जळगाव ग्रामीण, खडकवासला, पर्वती, शेगाव, श्रीगोंदा, गेवराई, केज, उस्मानाबाद, परंडा, बार्शी, सोलापूर शहर (उत्तर), माळशिरस, पंढरपूर, सिंदखेड, जामनेर, माण-खटाव, सातारा, दापोली, गुहागर, रत्नागिरी, सावंतवाडी, राधानगरी, करमाळा, दौंड आणि दिंडोशी या  मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत दर ३ महिन्यांनी या मतदारसंघाचा कार्य अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

जयंत पाटील काय म्हणाले?

महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने 'सामना' ने मत व्यक्त केले आहे मात्र महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सध्या पक्षवाढीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत असतील. प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे. हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. म्हणून तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे. निवडणूका जवळ आल्यावर कदाचित ते वेगळा विचार करु शकतील पण त्यांनी तसा विचार केला नाही तर मग जे समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस