शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्या घरात तर कुत्रा देखील वाघ असतो"; भाजप खासदाराने राज ठाकरे, उद्धव ठाकरेंना दिले आव्हान
2
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
3
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
4
'गुगल' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या
5
"कोणालाही मारणं खूप सोपं पण...", मनसेच्या विरोधात हिंदुस्तानी भाऊ? राज ठाकरेंना म्हणाला- "ते लोक पैसे कमावायला येतात..."
6
शेवट जवळ आला? काबुलमध्ये २०३० पर्यंत पाण्याचा एकही थेंब मिळणार नाही, ६० लाख लोकसंख्येचे शहर...
7
देवभूमीत पावसाचा कोप; ढगफुटीने घातलेय थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला
8
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर तीन पट वाढणार कर्मचाऱ्यांची सॅलरी? केव्हापासून होणार लागू, जाणून घ्या अपडेट
9
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
10
सोन्यापेक्षाही तेजीनं पळतोय सोन्याच्या 'या' कंपनीचा शेअर, बाजार उघडताच १५% ची तेजी; तुमच्याकडे आहे का?
11
प्रेयसीचे लग्न होऊ देत नव्हता...; तिचा फोन बिझी लागला म्हणून रात्रीच चालत पोहोचला... पुढे जे झाले...
12
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
13
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
14
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
15
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
16
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
17
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
18
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
19
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
20
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!

राज्यात मध्यावधी निवडणुका? १०० मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची फिल्डिंग; ‘सुपर १००’ मोहिम हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 21:20 IST

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर शिवसेना-राष्ट्रवादी निवडणूक लढवतील असं सांगितलं आहे.

ठळक मुद्देमहाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही काँग्रेसला सूचक इशारा दिला आहे.

मुंबई – राज्यात महाविकास आघाडीत सगळं काही आलबेल आहे असं चित्र दिसत नाही. एकीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राज्यात दौरा करून आगामी निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीनं महाविकास आघाडी म्हणून निवडणुकांना सामोरं जावं असं म्हटलं आहे. यातच आत शिवसेनेने काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर राष्ट्रवादी-शिवसेना एकत्र निवडणूक लढवेल असं सांगितले आहे.

शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार असेल तर शिवसेना-राष्ट्रवादी निवडणूक लढवतील असं सांगितलं आहे. भाजपाही आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं म्हणत आहे. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका होणार का? अशी चर्चा जोर धरू लागली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुपर १०० मोहिम हाती घेतली आहे.

काय आहे सुपर १०० मोहिम?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवक संघटनेने राज्यात सुपर १०० मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत ३४ विधानसभा निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे ३४ पदाधिकारी राज्यातील १०० मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रैस मजबूत करण्याचं काम करतील. राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडलेले हे १०० मतदारसंघ असे आहेत ज्याठिकाणी राष्ट्रवादी मागील निवडणुकांमध्ये नंबर दोन आणि तीन क्रमांकावर होती. त्यामुळे या मतदारसंघातील संघटनात्मक पातळीवर मजबुती आणण्याची जबाबदारी युवक कार्यकर्त्यांना सोपवली आहे.

कोरेगाव, पाटण, कुर्ला, कर्जत, जळगाव शहर, चाळीसगाव, एरंडोल, पाचोरा, बाळापूर, मुर्तीजापूर, कारंजा, मेळघाट, हिंगणघाट, हिंगणा, तिरोडा, डिग्रस, किनवट, लोहा, जिंतूर, गंगाखेड, बदनापूर, भोकरदन, कन्नड, औरंगाबाद(मध्य), पैठण, गंगापूर, वैजापूर, नांदगाव, बागलान, नाशिक(पश्चिम), भिवंडी ग्रामीण, मुरबाड, उल्हासगर, कल्याण पूर्व, ऐरोली, बेलापूर, मागाठणे, विक्रोळी, भोसरी, चिंचवड, चोपडा, जळगाव ग्रामीण, खडकवासला, पर्वती, शेगाव, श्रीगोंदा, गेवराई, केज, उस्मानाबाद, परंडा, बार्शी, सोलापूर शहर (उत्तर), माळशिरस, पंढरपूर, सिंदखेड, जामनेर, माण-खटाव, सातारा, दापोली, गुहागर, रत्नागिरी, सावंतवाडी, राधानगरी, करमाळा, दौंड आणि दिंडोशी या  मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. त्याचसोबत दर ३ महिन्यांनी या मतदारसंघाचा कार्य अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

जयंत पाटील काय म्हणाले?

महाविकास आघाडी सरकारमध्ये तीन पक्ष आहेत. त्या तिघांनी एकत्रित राहावं याला सर्वांनीच प्राधान्य द्यावे. त्यातूनच एखाद्या पक्षाला स्वबळावर लढण्याची इच्छा असेल तर उरलेले दोन पक्ष नक्कीच एकत्रित राहतील त्यादृष्टीने 'सामना' ने मत व्यक्त केले आहे मात्र महाराष्ट्रातील जनतेचीही तशीच इच्छा दिसते कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष सध्या पक्षवाढीसाठी स्वबळावर लढण्याचा निर्धार व्यक्त करत असतील. प्रत्येक पक्षाचं बळ किती आहे. हे महाराष्ट्रात सर्वांनाच माहित आहे. म्हणून तिघांनी एकत्र येऊन अधिक संघटितपणाने काम करणे अपेक्षित आहे. निवडणूका जवळ आल्यावर कदाचित ते वेगळा विचार करु शकतील पण त्यांनी तसा विचार केला नाही तर मग जे समविचारी पक्ष आहेत ते एकत्रित राहतील असं त्यांनी सांगितले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस