शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

आठवणी जिंदादिल विलासराव देशमुखांच्या... !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2019 17:15 IST

बाभुळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी प्रदीर्घ कारकीर्द असणाऱ्या विलासरावांचा आज स्मृतीदिन. काँग्रेसचे माजी आमदार आणि त्यांचे जवळचे स्नेही उल्हास पवार यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी खास लोकमतच्या वाचकांसाठी. 

पुणे : विलासराव देशमुख म्हटलं की डोळ्यासमोर एक रुबाबदार आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्व. बाभुळगावचे सरपंच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी प्रदीर्घ कारकीर्द असणाऱ्या विलासरावांचा आज स्मृतीदिन. काँग्रेसचे माजी आमदार आणि त्यांचे जवळचे स्नेही उल्हास पवार यांनी जागवलेल्या त्यांच्या आठवणी खास लोकमतच्या वाचकांसाठी. 

विलासरावांना मी पहिल्यांदा बघितलं ते १९७०साली.  पुण्यात ते आय एल एस कॉलेजमध्ये वकिलीचे शिक्षण घेत होते. त्यावेळी आम्हाला युवक काँग्रेसमध्ये चांगल्या युवकांची गरज होती. याच काळात विलासराव भेटले आणि काँग्रेसशी जोडले गेले. त्याही काळात त्यांचं ते निर्व्याज हसणं आणि नीटनेटकेपण लक्षात राहावं असं होत. त्यांना त्या काळात आम्ही बघितलं तसेच ते शेवटपर्यंत होते. कधीही दुर्मुखलेले, गबाळे त्यांना बघितले नाही. कायम साधे पण उत्तम रंगसंगती असलेले कपडे आणि चेहऱ्यावर हसू असेच विलासराव होते. त्यांना तेव्हाही कलेची आवड होती. अगदी एका दिवसात तीन सिनेमेही आम्ही बघितले होते. लॉ कॉलेजजवळ फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एफटीआय) असल्यामुळे त्यांना सुभाष घई, शत्रुघ्न सिन्हा असे मित्र होते. तेव्हापासून कला क्षेत्रातल्या मित्रांशी त्यांचे नाते होते. पण तेव्हाही आणि मुख्यमंत्री झाल्यावरपण त्यांनी कधीही कोणाला एकेरी हाक मारली नाही. व्यक्ती बरोबरीची असो किंवा लहान, अधिकारी असो किंवा साधा कार्यकर्ता पण त्यांनी कायम आदरार्थी हाक मारली. त्यांच्या एका हाकेनेच समोरचा अक्षरशः विरघळून जाई. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यात दोन वर्षे वकिली करून ते लातूरला गेले. तिथे सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा बँकेचे चेअरमन ते टप्प्याटप्प्याने मुख्यमंत्री अशी त्यांची कारकीर्द घडली. 

   विलासराव मुख्यमंत्री झाले तरी स्वतःमधील मिश्कील स्वभाव त्यांनी जपला होता. कोणत्याही ठिकाणी त्यांची मार्मिक टिप्पणी असायची. इतकेच नव्हे तर त्यांना नेते, कार्यकर्ते यांच्यासोबत सामान्य नागरिकांशी बोलायला आवडायचं.  अगदी कितीही घाई असली तरी. फोनवर तर ते कोणालाही उपलब्ध असायचे. शब्दशः कोणालाही. एक नाशिकची पाच वर्षांची मुलगी त्यांना फोन करायची आणि ते तिच्याशी आवर्जून बोलायचे. हा सिलसिला अनेक वर्ष सुरु होता. प्रशासकीय कामात त्यांचा हातखंडा होता. कोणत्या क्षणी काय करायला हवं याच नेमकं ज्ञान त्यांना होत. २६ जुलैच्या महापुरात मुंबई, रायगड, महाडची परिस्थिती त्यांनी एकहाती हाताळल्याचे सर्व महाराष्ट्राने बघितले आहे. दुसरीकडे कलेचीही साथ सोडली नाही. महाराष्ट्रात असो किंवा राज्याबाहेर पण नाट्य आणि साहित्य संमेलनाला ते हजर असत. मग आमंत्रण असो किंवा नसो. आपल्याला ते कायम हसताना दिसले तरी जवळचा कार्यकर्ता पक्षातून फुटला की त्यांनाही वाईट वाटायचं. एकांतात 'आपलं मीठ अळणी आहे का' अशी खंतही बोलून दाखवायचे. पण हे वाईट वाटणंही क्षणिक असायचे. बोलता बोलता पुन्हा विषय बदलायचे आणि नव्या उत्साहाने कामाला लागायचे. 

ते आज नाही हे अजूनही मला पटत नाही. त्यांचा शेवट शेवटचा संवाद तर कधीच विसरता येणार नाही. ३१ जुलैला माझा वाढदिवस आणि त्यांचा फोन हे एक समीकरण होत. २०१२साली मात्र त्यांचा फोन नाही तर ई-मेल आला. मलाही जरा आश्चर्य वाटलं ,पण कामात असतील असं वाटलं आणि मी मनावर घेतलं नाही. साधारण त्यानंतर दोन-चार दिवसांनी त्यांचा फोन आला. मेल बघितला का विचारलं. मी हो सांगितलं पण त्यांचा आवाज काहीतरी वेगळंच सांगत होता. तब्येत बरी नव्हती असं कानावर आलं होतं  पण आवाजात उत्साह नाही तर क्षीणपणा होता. मी त्यांना 'साहेब कुठे आहात' असं विचारलं पण त्यांनी उत्तर देण्याचं टाळलं. त्यांनी उत्तर टाळण्याची ही पहिलीच वेळ होती. थोड्या वेळाने न राहवून मी वैशाली वहिनींना फोन केला तर त्यांनी आम्ही ब्रीजकँडी रुग्णालयात आहोत सांगितलं आणि माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मी लगेचच त्या दिवशी रात्री मुंबईला गेलो पण दुर्दैवाने त्यांना एअर ऍम्ब्युलन्सने चेन्नईला नेले होते. मी चेन्नईलाही गेलो पण विलासराव भेटले नाहीतच. आम्ही परतलो ते त्यांचं पार्थिव घेऊनच. महाराष्ट्रात आलो एका हुशार, मनस्वी, माणसं जोडण्याची कला असलेल्या नेत्याला महाराष्ट्र मुकला होता. आणि माझ्या आयुष्यात पोकळी निर्माण झाली ती कायमचीच !

टॅग्स :Ulhas Pawarउल्हास पवारlaturलातूरcongressकाँग्रेसRitesh Deshmukhरितेश देशमुख