शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
4
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
5
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
6
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
7
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
10
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
11
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
12
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
13
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
14
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
15
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
16
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
17
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
18
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
19
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
20
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट

‘राज’दरबारी प्रश्न निकाली! राज ठाकरेंचा एकच फोन अन् टोलमाफ, मावळवासियांनी मानले आभार

By प्रविण मरगळे | Published: February 22, 2021 1:34 PM

MNS Raj Thackeray News: हे टोलनाके बंद करावेत यासाठी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,(CM Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचीही भेट घेतली होती

ठळक मुद्देराज ठाकरेंच्या भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली लागला आहेकृष्णकुंजच्या राजदरबारी येऊन समस्या तात्काळ सोडवल्या जातात, निर्णय झटपट लागतात मावळवासियांच्या शिष्टमंडळाने घेतली राज ठाकरेंची आभार भेट

मुंबई – काही दिवसांपूर्वी पुण्यातील सोमाटणे टोल स्थानिकांसाठी बंद करावा ही मागणी घेऊन मावळवासियांनी कृष्णकुंज गाठलं होतं, फक्त दीड किलोमीटर अंतर २ टोलनाके असल्याने स्थानिकांनी या टोलवसुलीविरोधात मोर्चा उघडला होता, याबाबत मावळवासियांसाठी सर्वपक्षीय नेते एकवटले होते, टोलवसुलीविरोधात नागरिकांकडून तीव्र आंदोलन होणार होते, मात्र तत्पूर्वी या लोकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली होती.(Maval Residents Thanks to MNS Raj Thackeray over Toll Exemption from Somatane & Varsoli Naka)  

हे टोलनाके बंद करावेत यासाठी शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,(CM Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांचीही भेट घेतली होती परंतु, राज ठाकरेंच्या भेटीनंतर मावळवासियांचा टोलमाफीचा प्रश्न निकाली लागला आहे, त्यामुळे या सर्वपक्षीय नेत्यांनी पुन्हा एकदा भेट घेऊन त्यांचे आभार मानले आहेत. अनेक दिवस प्रलंबित असलेला प्रश्न खुद्द राज ठाकरेंनी एकाच फोनवर सोडवल्याने मावळवासियांना आनंद झाला होता, त्यांनी पुण्याचे मनसे शहराध्यक्ष अजय शिंदे आणि नेते बाळा नांदगावकर यांनी सहकार्य केल्याबद्दल आभार मानले, त्याचसोबत कृष्णकुंजच्या राजदरबारी येऊन समस्या तात्काळ सोडवल्या जातात, निर्णय झटपट लागतात असं कौतुकही या शिष्टमंडळातील सदस्य मिलिंद अच्युत यांनी केले.

लोणावळ्यातील वर्सोली आणि सोमटणे-तळेगाव टोल नाक्यांवर मावळवासियांकडून टोल घेण्यात येणार नाही, त्याचा फायदा MH 14 नंबरच्या गाड्या असलेल्यांना होणार आहे. मागील भेटीवेळी या सर्वपक्षीय नेत्यांनी राज ठाकरेंकडे आपलं गाऱ्हाणं मांडले होते, त्यानंतर भेटीतच राज ठाकरेंनी IRB चे अधिकारी विरेंद्र म्हैसकर यांना फोन लावत त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली, म्हैसकर यांनी समस्या लवकरात लवकर सोडवतो असं राज ठाकरेंना सांगितले,  त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्याशी बोलतो असं आश्वासन राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला दिलं होतं, त्यानंतर काही दिवसांत हा प्रश्न मार्गी लागला.

कोरोनाकाळात अनेक नागरिकांनी कृष्णकुंजवर येऊन राज ठाकरेंकडे स्वत:च्या समस्या मांडल्या होत्या, यात कोळीबांधव, डबेवाले, वारकरी संप्रदाय, पुजाऱ्यांचे शिष्टमंडळ, डॉक्टर्स, बँड-बँन्जो असोसिएशन अशा विविध क्षेत्रातील लोकांनी कृष्णकुंजवर गर्दी केली होती, राज ठाकरेही अनेकांच्या समस्या जाणून घेऊन तात्काळ मार्गी लावत होते, त्यामुळे या कालावधीत समस्या मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ म्हणून कृष्णकुंजकडून लोकांनी अपेक्षा ठेवल्या होत्या.

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेtollplazaटोलनाका