शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

"हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करून दाखवाच"; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

By प्रविण मरगळे | Updated: February 26, 2021 15:42 IST

MNS Sandeep Deshpande Warns to Thackeray Government: हे सरकार अमराठी आहे की काय? नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच असा अमेय खोपकरांनी ठणकावून सांगितलं आहे.

ठळक मुद्देसंजय राठोडासारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतातअशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो?सरकारने कोरोनाचं कारण देत परवानगी नाकरलीच पण कारवाईचा धाक दाखवला

मुंबई – मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला पोहचला आहे. मराठी भाषा दिनादिवशीमनसेकडून मराठी स्वाक्षरी मोहीमेचं आयोजन करण्यात येतं, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मनसेच्या या मोहिमेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असून आयोजक अमेय खोपकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे.(Arrest Ameya Khopkar and show it, MNS Sandeep Deshpande warned the Thackeray government over Controversy on Marathi Bhasha Din Programme)  

मात्र अमेय खोपकरांना नोटीस पाठवल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करून दाखवाच असं विधान केले आहे, त्यामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. कोविड नियमांचे पालन करूनच मनसेने मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित केला होता, तरीही सरकारने कोरोनाचं कारण देत परवानगी नाकरलीच पण कारवाईचा धाक दाखवला असल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केला.

काय म्हणाले अमेय खोपकर?

ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा संजय राठोडासारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात, अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो? महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही यावर शिक्कामोर्तबच झालंय, पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की, हे सरकार अमराठी आहे की काय? नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच असा अमेय खोपकरांनी ठणकावून सांगितलं आहे.

या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप

राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन

महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन साजरा करण्याच्या निमित्ताने आठवडाभर काही थोडेफार शासकीय कार्यक्रम होतील, काही एक घोषणा होतील, मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाईल आणि पुढचे ३५८ दिवस या सगळ्याचा विसर पडेल. मराठीचं काय होणार? यापेक्षा ती कशी अधिक समृद्ध होईल, ती रोजच्या वापरात कशी येईल आणि ती आपली ओळख कशी बनेल याचा विचार करणं आणि त्यासाठी कृती करणे हे जास्त महत्त्वाचे आहे.(Raj Thackeray Letter to Marathi People)

“राज ठाकरेंचं मराठी माणसांना पत्र; “आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही की...”

या भाषेने हिंदवी स्वराज्याचा हुंकार दिला, ह्या भाषेने स्वराज्याचा मंत्र दिला या भाषेने प्रबोधनाचा विचार दिला या भाषेने श्रमिक एकजुटीचा विचार दिला, ह्या भाषेने देशाला मार्गदर्शक विचार दिला अशा भाषेचं काय होईल याची चिंता करण्यापेक्षा, आपल्या भाषेचं संचित स्मरून इतके अफाट विचार पेलवण्याची आणि मुळात जन्माला घालण्याच्या ताकदीचा अभिमान बाळगत... ती ज्ञानभाषा आणि व्यापाराची भाषा बनावी म्हणून आग्रही राहिलो तरी पुरेसं आहे. मराठी राजभाषेच्या निमित्ताने एक सुरुवात केली तर आपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते ती मराठीत सुरू करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखा शाखांमध्ये फलक लावलेले असतील त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली मराठी भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा असं आवाहन राज ठाकरेंनी मराठी लोकांना केलं आहे.

टॅग्स :MNSमनसेMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिनShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडे