शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

"हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करून दाखवाच"; मनसेचा ठाकरे सरकारला इशारा

By प्रविण मरगळे | Updated: February 26, 2021 15:42 IST

MNS Sandeep Deshpande Warns to Thackeray Government: हे सरकार अमराठी आहे की काय? नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच असा अमेय खोपकरांनी ठणकावून सांगितलं आहे.

ठळक मुद्देसंजय राठोडासारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतातअशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो?सरकारने कोरोनाचं कारण देत परवानगी नाकरलीच पण कारवाईचा धाक दाखवला

मुंबई – मराठी राजभाषा दिनाच्या पार्श्वभूमीवर मनसे-शिवसेना यांच्यातील वाद विकोपाला पोहचला आहे. मराठी भाषा दिनादिवशीमनसेकडून मराठी स्वाक्षरी मोहीमेचं आयोजन करण्यात येतं, मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मनसेच्या या मोहिमेला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली असून आयोजक अमेय खोपकर यांना नोटीस बजावण्यात आली आहे.(Arrest Ameya Khopkar and show it, MNS Sandeep Deshpande warned the Thackeray government over Controversy on Marathi Bhasha Din Programme)  

मात्र अमेय खोपकरांना नोटीस पाठवल्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे, मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. हिंमत असेल तर अमेय खोपकरांना अटक करून दाखवाच असं विधान केले आहे, त्यामुळे मनसे विरुद्ध शिवसेना असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. कोविड नियमांचे पालन करूनच मनसेने मराठी भाषा दिन कार्यक्रम आयोजित केला होता, तरीही सरकारने कोरोनाचं कारण देत परवानगी नाकरलीच पण कारवाईचा धाक दाखवला असल्याचा आरोप अमेय खोपकर यांनी केला.

काय म्हणाले अमेय खोपकर?

ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशा संजय राठोडासारख्या मंत्र्याचे समर्थक लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन शक्तीप्रदर्शन करतात, अशा गर्दीवर कारवाई करण्याची ज्यांच्यात धमक नाही, त्यांच्या डोळ्यात मराठी भाषा दिवस का खुपतो? महाबिघाडी सरकारचं डोकं ठिकाणावर नाही यावर शिक्कामोर्तबच झालंय, पण त्यापुढे जाऊन आता शंका यायला लागली आहे की, हे सरकार अमराठी आहे की काय? नियोजित कार्यक्रम आम्ही सर्व नियम पाळून करणार म्हणजे करणारच असा अमेय खोपकरांनी ठणकावून सांगितलं आहे.

या सरकारला अमराठी का म्हणू नये? मराठी स्वाक्षरी कार्यक्रमास परवानगी नाकारल्याने मनसेचा संताप

राज ठाकरेंचं मराठी माणसांना आवाहन

महाराष्ट्रात मराठी राजभाषा दिन साजरा करण्याच्या निमित्ताने आठवडाभर काही थोडेफार शासकीय कार्यक्रम होतील, काही एक घोषणा होतील, मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाईल आणि पुढचे ३५८ दिवस या सगळ्याचा विसर पडेल. मराठीचं काय होणार? यापेक्षा ती कशी अधिक समृद्ध होईल, ती रोजच्या वापरात कशी येईल आणि ती आपली ओळख कशी बनेल याचा विचार करणं आणि त्यासाठी कृती करणे हे जास्त महत्त्वाचे आहे.(Raj Thackeray Letter to Marathi People)

“राज ठाकरेंचं मराठी माणसांना पत्र; “आपली मराठी भाषा इतकी लेचीपेची अजिबात नाही की...”

या भाषेने हिंदवी स्वराज्याचा हुंकार दिला, ह्या भाषेने स्वराज्याचा मंत्र दिला या भाषेने प्रबोधनाचा विचार दिला या भाषेने श्रमिक एकजुटीचा विचार दिला, ह्या भाषेने देशाला मार्गदर्शक विचार दिला अशा भाषेचं काय होईल याची चिंता करण्यापेक्षा, आपल्या भाषेचं संचित स्मरून इतके अफाट विचार पेलवण्याची आणि मुळात जन्माला घालण्याच्या ताकदीचा अभिमान बाळगत... ती ज्ञानभाषा आणि व्यापाराची भाषा बनावी म्हणून आग्रही राहिलो तरी पुरेसं आहे. मराठी राजभाषेच्या निमित्ताने एक सुरुवात केली तर आपण एक मोठा पल्ला गाठू तो म्हणजे आपण आपली स्वाक्षरी जी आपली ओळख असते ती मराठीत सुरू करूया. त्याची सुरुवात करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्रातील शाखा शाखांमध्ये फलक लावलेले असतील त्या ठिकाणी सहकुटुंब जाऊन मराठीत स्वाक्षरी करा आणि त्याच वेळेला आपली मराठी भाषा अधिक मोठी करण्याची प्रतिज्ञा करा असं आवाहन राज ठाकरेंनी मराठी लोकांना केलं आहे.

टॅग्स :MNSमनसेMarathi Bhasha Dinमराठी भाषा दिनShiv SenaशिवसेनाRaj Thackerayराज ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडे