शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

"मनसूख हिरेन यांचा खून झाला असावा, तो सचिन वाझेंनी केला असावा", सभागृहात गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 12:57 IST

Mansukh Hiren Death Case : व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणावरून आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

मुंबई - व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणावरून (Mansukh Hiren Death Case) आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रार अर्जाचा हवाला देत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा, तसेच तो सचिन वाझे यांनी केला असावा. हिरेन यांना सचिन वाझे आधीपासून ओळखत होते. तसेच हिरेन यांची कार चार महिन्यांपासून सचिन वाझेंकडे होती, असा दावा देवेंद्र फडणवसी यांनी केला.   ("Mansukh Hiren must have been killed, it must have been Sachin Waze", Devendra Fadnavis made serious allegations in the House on the basis of a complaint lodged by Hiren's wife)

सभागृहामध्ये आज मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला धारेवर धरले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा तक्रार अर्ज वाचून दाखवत फडणवीस म्हणाले की, मनसुख हिरेन यांनी अंबानीच्या घरासमोर सापडलेल्या कार प्रकरणात त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. ३ मार्च रोजी माझे पती रोजच्या प्रमाणे दुकानात गेले होते. त्यानंतर रात्री फोन आला. त्यात त्यांनी सांगितले की, सचिन वाझे या प्रकरणात मला अटक व्हायला सांगताहेत. तसेच दोन दिवसांत सोडतो असे म्हणताहेत, असे सांगितले. मात्र मी या प्रकरणात तुम्ही अटक होण्याची गरज नसल्याचे सांगितले. 

वरील एकंदरीत परिस्थितीवरून माझे पती मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा आणि त खून सचिन वाझेंनी केला असावा, अशी मला शंका आहे, अशी गंभीर शंका हिरेन यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीतून केली आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. दुसरी बाब म्हणजे मनसुख हिरेन यांची कार गेल्या काही महिन्यांपासून सचिन वाझेंकडे होती. त्यांनी फेब्रुवारीत ती परत केली होती. दरम्यान, एवढे पुरावे असताना सचिन वाझेंना अटक का करण्यात आली नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक झाल्यानंतर दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस