शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

"मनसूख हिरेन यांचा खून झाला असावा, तो सचिन वाझेंनी केला असावा", सभागृहात गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 12:57 IST

Mansukh Hiren Death Case : व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणावरून आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

मुंबई - व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणावरून (Mansukh Hiren Death Case) आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रार अर्जाचा हवाला देत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा, तसेच तो सचिन वाझे यांनी केला असावा. हिरेन यांना सचिन वाझे आधीपासून ओळखत होते. तसेच हिरेन यांची कार चार महिन्यांपासून सचिन वाझेंकडे होती, असा दावा देवेंद्र फडणवसी यांनी केला.   ("Mansukh Hiren must have been killed, it must have been Sachin Waze", Devendra Fadnavis made serious allegations in the House on the basis of a complaint lodged by Hiren's wife)

सभागृहामध्ये आज मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडीला धारेवर धरले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. मनसुख हिरेन यांच्या पत्नीचा तक्रार अर्ज वाचून दाखवत फडणवीस म्हणाले की, मनसुख हिरेन यांनी अंबानीच्या घरासमोर सापडलेल्या कार प्रकरणात त्रास दिला जात असल्याची तक्रार केली होती. ३ मार्च रोजी माझे पती रोजच्या प्रमाणे दुकानात गेले होते. त्यानंतर रात्री फोन आला. त्यात त्यांनी सांगितले की, सचिन वाझे या प्रकरणात मला अटक व्हायला सांगताहेत. तसेच दोन दिवसांत सोडतो असे म्हणताहेत, असे सांगितले. मात्र मी या प्रकरणात तुम्ही अटक होण्याची गरज नसल्याचे सांगितले. 

वरील एकंदरीत परिस्थितीवरून माझे पती मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा आणि त खून सचिन वाझेंनी केला असावा, अशी मला शंका आहे, अशी गंभीर शंका हिरेन यांच्या पत्नीने आपल्या तक्रारीतून केली आहे, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. दुसरी बाब म्हणजे मनसुख हिरेन यांची कार गेल्या काही महिन्यांपासून सचिन वाझेंकडे होती. त्यांनी फेब्रुवारीत ती परत केली होती. दरम्यान, एवढे पुरावे असताना सचिन वाझेंना अटक का करण्यात आली नाही, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. 

दरम्यान, मनसुख हिरेन प्रकरणात विरोधी पक्ष आक्रमक झाल्यानंतर दादरा नगर हवेलीमधील अपक्ष खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री अनिल परब यांनी केली. त्यानंतर सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाज काही वेळासाठी तहकूब करावे लागले. 

टॅग्स :Mansukh Hirenमनसुख हिरणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस