शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze: “मुख्यमंत्री महोदय, सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?; चौकशी पूर्ण होऊ द्या, मग...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 14:51 IST

BJP Criticized CM Uddhav Thackeray over Statement on Sachin Vaze in Mansukh Hiren Death Case: वाझेंना मुख्यमंत्री झुकतं माप का देतात? हे प्रश्न जनतेला पडणारच असं त्यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देतोपर्यंत मुख्यमंत्र्यांना वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालणाऱ्या ठाकरे सरकारला भाजपाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच धडा शिकवलावाझेंना वाचवणारे खरे चेहरे कुणाचे, याचीच जनतेला प्रतिक्षा आहे

मुंबई – मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या आकस्मित मृत्यूमुळे हे प्रकरण संशयास्पद झालं आहे, यातच या प्रकरणाची तपास करणारे अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधातच हिरेन यांच्या कुटुंबाने खळबळजनक आरोप केल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. सचिन वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर आरोप केले. (BJP Target CM Uddhav Thackeray over allegations on Sachin Vaze in Mansukh Hiren Death)

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) या प्रकरणावर भाष्य करत विरोधकांना खडेबोल सुनावले होते, सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला होता. त्यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भाजपाने(BJP) ट्विट करत म्हटलंय की, सचिन वाझेंवरील आरोपांची चौकशी सुरू आहे, पण मुख्यमंत्रीच त्यांची वकिली करताहेत, मुख्यमंत्री महोदय, चौकशी पूर्ण होऊ द्या, मग खुशाल बाजू घ्या. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना वाझेंचा इतका कळवळा कशासाठी? वाझेंना मुख्यमंत्री झुकतं माप का देतात? हे प्रश्न जनतेला पडणारच असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालणाऱ्या ठाकरे सरकारला भाजपाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच धडा शिकवला, अकार्यक्षमतेचा कळस गाठणाऱ्या सरकारला भाजपाने हिरेन प्रकरणासह अनेक मुद्द्यांची दखल घ्यायला भाग पाडलं, हिरेन हत्या प्रकरणात बरीच मोठी नावे बाहेर येतील, वाझेंना वाचवणारे खरे चेहरे कुणाचे, याचीच जनतेला प्रतिक्षा आहे असा टोलाही भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

हत्या, आत्महत्या मृत्यू झाल्यानंतर गांभीर्याने दखल घेणे हे काम आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेली आहे. सुसाईड नोटमध्ये काही जणांची नावे आहेत. तपास सुरू झालेला आहे. आधी फाशी मग तपास ही पद्धत नाही होऊ शकत, ही सरकारची पद्धत नाही. त्यांनीही सरकार चालवलेलं आहे. टार्गेट करायचं, धिंडवडे काढायचे मग तपासात आले की तो नाहीच तर मग कोणीही असला तरी कारवाई करणार.  विरोधकांनी नि:पक्षपातीपणाला चष्मा लावावा. कॉल रेकॉर्ड, सीडीआरवरुन लगेच कुणाला फाशी देण्याची भूमिका घ्यायची का? असे असेल तर मग पोलीस पाहिजेतच कशाला? त्यांनीच तपास करावा असे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना सुनावले. हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरण आम्ही गांभीर्यानेच घेतले आहे. पण उगाच कुणाला टार्गेट करायचं, अब्रूचे धिंडवडे काढायचे अन् मग तपासात निर्दोष आढळल्यावर काय करणार असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरणUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाsachin Vazeसचिन वाझे