शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Sachin Vaze: “मुख्यमंत्री महोदय, सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?; चौकशी पूर्ण होऊ द्या, मग...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 14:51 IST

BJP Criticized CM Uddhav Thackeray over Statement on Sachin Vaze in Mansukh Hiren Death Case: वाझेंना मुख्यमंत्री झुकतं माप का देतात? हे प्रश्न जनतेला पडणारच असं त्यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देतोपर्यंत मुख्यमंत्र्यांना वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालणाऱ्या ठाकरे सरकारला भाजपाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच धडा शिकवलावाझेंना वाचवणारे खरे चेहरे कुणाचे, याचीच जनतेला प्रतिक्षा आहे

मुंबई – मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या आकस्मित मृत्यूमुळे हे प्रकरण संशयास्पद झालं आहे, यातच या प्रकरणाची तपास करणारे अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधातच हिरेन यांच्या कुटुंबाने खळबळजनक आरोप केल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. सचिन वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर आरोप केले. (BJP Target CM Uddhav Thackeray over allegations on Sachin Vaze in Mansukh Hiren Death)

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) या प्रकरणावर भाष्य करत विरोधकांना खडेबोल सुनावले होते, सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला होता. त्यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भाजपाने(BJP) ट्विट करत म्हटलंय की, सचिन वाझेंवरील आरोपांची चौकशी सुरू आहे, पण मुख्यमंत्रीच त्यांची वकिली करताहेत, मुख्यमंत्री महोदय, चौकशी पूर्ण होऊ द्या, मग खुशाल बाजू घ्या. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना वाझेंचा इतका कळवळा कशासाठी? वाझेंना मुख्यमंत्री झुकतं माप का देतात? हे प्रश्न जनतेला पडणारच असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालणाऱ्या ठाकरे सरकारला भाजपाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच धडा शिकवला, अकार्यक्षमतेचा कळस गाठणाऱ्या सरकारला भाजपाने हिरेन प्रकरणासह अनेक मुद्द्यांची दखल घ्यायला भाग पाडलं, हिरेन हत्या प्रकरणात बरीच मोठी नावे बाहेर येतील, वाझेंना वाचवणारे खरे चेहरे कुणाचे, याचीच जनतेला प्रतिक्षा आहे असा टोलाही भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

हत्या, आत्महत्या मृत्यू झाल्यानंतर गांभीर्याने दखल घेणे हे काम आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेली आहे. सुसाईड नोटमध्ये काही जणांची नावे आहेत. तपास सुरू झालेला आहे. आधी फाशी मग तपास ही पद्धत नाही होऊ शकत, ही सरकारची पद्धत नाही. त्यांनीही सरकार चालवलेलं आहे. टार्गेट करायचं, धिंडवडे काढायचे मग तपासात आले की तो नाहीच तर मग कोणीही असला तरी कारवाई करणार.  विरोधकांनी नि:पक्षपातीपणाला चष्मा लावावा. कॉल रेकॉर्ड, सीडीआरवरुन लगेच कुणाला फाशी देण्याची भूमिका घ्यायची का? असे असेल तर मग पोलीस पाहिजेतच कशाला? त्यांनीच तपास करावा असे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना सुनावले. हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरण आम्ही गांभीर्यानेच घेतले आहे. पण उगाच कुणाला टार्गेट करायचं, अब्रूचे धिंडवडे काढायचे अन् मग तपासात निर्दोष आढळल्यावर काय करणार असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरणUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाsachin Vazeसचिन वाझे