शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze: “मुख्यमंत्री महोदय, सचिन वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?; चौकशी पूर्ण होऊ द्या, मग...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 14:51 IST

BJP Criticized CM Uddhav Thackeray over Statement on Sachin Vaze in Mansukh Hiren Death Case: वाझेंना मुख्यमंत्री झुकतं माप का देतात? हे प्रश्न जनतेला पडणारच असं त्यांनी सांगितले आहे.

ठळक मुद्देतोपर्यंत मुख्यमंत्र्यांना वाझेंचा इतका कळवळा कशासाठी?चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालणाऱ्या ठाकरे सरकारला भाजपाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच धडा शिकवलावाझेंना वाचवणारे खरे चेहरे कुणाचे, याचीच जनतेला प्रतिक्षा आहे

मुंबई – मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी सापडली होती, या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या आकस्मित मृत्यूमुळे हे प्रकरण संशयास्पद झालं आहे, यातच या प्रकरणाची तपास करणारे अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधातच हिरेन यांच्या कुटुंबाने खळबळजनक आरोप केल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळंच वळण लागलं. सचिन वाझे यांच्यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही गंभीर आरोप केले. (BJP Target CM Uddhav Thackeray over allegations on Sachin Vaze in Mansukh Hiren Death)

विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) या प्रकरणावर भाष्य करत विरोधकांना खडेबोल सुनावले होते, सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेन आहे का? असा सवाल त्यांनी विरोधकांना विचारला होता. त्यावरून भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. भाजपाने(BJP) ट्विट करत म्हटलंय की, सचिन वाझेंवरील आरोपांची चौकशी सुरू आहे, पण मुख्यमंत्रीच त्यांची वकिली करताहेत, मुख्यमंत्री महोदय, चौकशी पूर्ण होऊ द्या, मग खुशाल बाजू घ्या. तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना वाझेंचा इतका कळवळा कशासाठी? वाझेंना मुख्यमंत्री झुकतं माप का देतात? हे प्रश्न जनतेला पडणारच असं त्यांनी सांगितले आहे.

तसेच चुकीच्या गोष्टींना पाठिशी घालणाऱ्या ठाकरे सरकारला भाजपाने अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगलाच धडा शिकवला, अकार्यक्षमतेचा कळस गाठणाऱ्या सरकारला भाजपाने हिरेन प्रकरणासह अनेक मुद्द्यांची दखल घ्यायला भाग पाडलं, हिरेन हत्या प्रकरणात बरीच मोठी नावे बाहेर येतील, वाझेंना वाचवणारे खरे चेहरे कुणाचे, याचीच जनतेला प्रतिक्षा आहे असा टोलाही भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री?

हत्या, आत्महत्या मृत्यू झाल्यानंतर गांभीर्याने दखल घेणे हे काम आहे. मोहन डेलकर यांनी आत्महत्या केलेली आहे. सुसाईड नोटमध्ये काही जणांची नावे आहेत. तपास सुरू झालेला आहे. आधी फाशी मग तपास ही पद्धत नाही होऊ शकत, ही सरकारची पद्धत नाही. त्यांनीही सरकार चालवलेलं आहे. टार्गेट करायचं, धिंडवडे काढायचे मग तपासात आले की तो नाहीच तर मग कोणीही असला तरी कारवाई करणार.  विरोधकांनी नि:पक्षपातीपणाला चष्मा लावावा. कॉल रेकॉर्ड, सीडीआरवरुन लगेच कुणाला फाशी देण्याची भूमिका घ्यायची का? असे असेल तर मग पोलीस पाहिजेतच कशाला? त्यांनीच तपास करावा असे मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांना सुनावले. हिरेन यांच्या मृत्यूचे प्रकरण आम्ही गांभीर्यानेच घेतले आहे. पण उगाच कुणाला टार्गेट करायचं, अब्रूचे धिंडवडे काढायचे अन् मग तपासात निर्दोष आढळल्यावर काय करणार असा सवालही ठाकरे यांनी केला आहे.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीMansukh Hirenमनसुख हिरणUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाsachin Vazeसचिन वाझे