शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

"ममता बॅनर्जी बांगलादेशी, इस्लामिक दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर करतात काम; देशाला सर्वात मोठा धोका"

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 09:28 IST

Mamta Banerjee And Anand Swaroop Shukla : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर उत्तर प्रदेश सरकारमधील संसदीय कार्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी जोरदार टीका केली आहे.

नवी दिल्ली - पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापू लागलं आहे. निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी पक्ष तृणमूल काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोपप्रत्यारोपांच्या फैरी रंगू लागल्या आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याच दरम्यान उत्तर प्रदेश सरकारमधील संसदीय कार्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. "ममता बॅनर्जी बांगलादेशी, इस्लामिक दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर काम करतात. देशाला त्यांच्यापासून सर्वात मोठा धोका" असल्याचं म्हटलं आहे. 

आनंद स्वरुप शुक्ला यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. "ममता बॅनर्जी या पूर्णत: बांगलादेशी झाल्या आहेत, इस्लामिक दहशतवाद्यांच्या इशाऱ्यावर सध्या काम करतात. देशाला त्यांच्यापासून सर्वात मोठा धोका आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी यांना बांगलादेशमध्ये आश्रय घ्यावा लागेल" असं शुक्ला यांनी म्हटलं आहे. रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ममता बॅनर्जींवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू; तृणमूलच्या खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य

ममता बॅनर्जी यांनी देखील भाजपावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. अशातच तृणमूल काँग्रेसच्या एका खासदारानं भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू असल्याचं म्हणत जोरदार टीका केली आहे. तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि बशीरहाटवरून लोकसभेवर निवडून गेलेल्या खासदार नुसरत जहाँ यांनी एक वादग्रस्त वक्तव्य करत भाजपा हा कोरोनापेक्षा अधिका घातक विषाणू असल्याचं म्हटलं. भाजपा ही हिंदू आणि मुस्लीम यांदा दंगा घडवून आणतं. जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील, असंही त्या म्हणाल्या. 

"जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील"

नुसरत जहाँ या उत्तर २४ परगनाच्या मुस्लीम बहुल भागामध्ये प्रचारासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांनी भाजपाची तुलना कोरोना विषाणूशी केली. "तुम्ही सर्व डोळे उघडून ठेवा. भाजपासारखा धोकादायक विषाणू फिरत आहे. हा पक्ष धर्मांमध्ये भेदबाव आणि व्यक्ती व्यक्तींमध्ये भांडणं लावतो. जर भाजपा सत्तेत आली तर मुस्लिमांचे उलटे दिवस सुरू होतील," असं नुसरत जहाँ म्हणाल्या. 

नुसरत जहाँ यांच्या वक्तव्यावर भाजपा आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ममता बॅनर्जी आणि त्यांच्या पक्षावर मुस्लीम तुष्टीकरणाचा आरोप केला. "पश्चिम बंगालमध्ये लसीकरणावरून सर्वात वाईट राजकारण करण्यात येत आहे. सर्वप्रथम ममता बॅनर्जींच्या मंत्रिमंडळातील मंत्री सिद्धीकुला चौधरी यांनी लसीची वाहतूक करणारा ट्रक थांबवला. आता दुसरीकडे तृणमूलच्या नेत्या प्रचारादरम्यान भाजपाची तुलना कोरोनाशी करत आहेत. परंतु ममता बॅनर्जी का शांत आहेत?," असा सवाल अमित मालवीय यांनी केला. 

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीwest bengalपश्चिम बंगालBJPभाजपाBangladeshबांगलादेशPoliticsराजकारणterroristदहशतवादी