शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

"मला निदान मंत्री तरी बनवा"; राजीव गांधींनी मोतीलाल व्होरांना थेट मुख्यमंत्री केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 17:02 IST

Motilal Vora Passed Away: मोतीलाल व्होरा यांच्या बाबत राजकीय करिअरला एक कलाटणी देणारा किस्सा घडला होता. मोतीलाल व्होरा मुख्यमंत्री होण्याआधी अर्जुन सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्होरा यांचे आज निधन झाले.

भोपाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे २ वेळा मुख्यमंत्री राहिलेले मोतीलाल व्होरा यांचे ९३ व्या वर्षी निधन झाले. रविवारीच त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. मोतीलाला व्होरा हे गांधी परिवाराचे जवळच्या नेत्यांपैकी एक होते. मोठ्या काळापासून ते पक्षाचे भांडार प्रमुख देखील राहिले आहेत. व्होरा हे छत्तीसगडहून राज्यसभा सदस्य होते. ते दोनदा मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. 

मोतीलाल व्होरा यांच्या बाबत राजकीय करिअरला एक कलाटणी देणारा किस्सा घडला होता. मोतीलाल व्होरा मुख्यमंत्री होण्याआधी अर्जुन सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. पहिल्यांदा ते १३ मार्च १९८५ ते १३ फेब्रुवारी १९८८ पर्यंत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. दुसऱ्यांदा ते २५ जानेवारी १९८९ ला मुख्यमंत्री झाले होते. यावेळी त्यांचा कार्यकाळ ११ महिन्यांचा होता. ८ डिसेंबर १९८९ ला त्यांना खुर्ची सोडावी लागली होती. २०१९ मध्ये व्होरा यांना काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष बनविण्याची चर्चा होती. 

मुख्यमंत्र्याची खूर्ची...१९८५ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अर्जुन सिंह यांनी ९ मार्च १९८५ ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर ते १० मार्चला राजीव गांधी यांच्याकडे मंत्रिमंडळाची यादी घेऊन गेले. परंतू राजीव गांधी यांच्या मनात काहीतरी वेगळेच सुरु होते. त्यांना मध्य प्रदेशच्या राजकारणात अर्जुन सिंह नको होते. राजीव यांनी यादी घेऊन आलेल्या अर्जुन सिंहांना दोन वाक्यांत वनवासात जाण्याचे आदेश दिले. ''तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री सुचवा आणि १४ मार्चला पंजाबला पोहोचा.'', असा तो आदेश होता. या आदेशामुळे अर्जुन सिंह यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी त्याच अवस्थेच राजीव गांधींना मोतीलाल व्होरा यांचे नाव सुचविले होते. 

तिथूनच सिंह यांनी त्यांचा मुलगा अजय सिंह याला फोन करत मोतीलाल व्होरा यांना तातडीने विशेष विमानाने घेऊन दिल्लीला ये, असे सांगितले. अजय सिंह विषेश विमानाने व्होरा यांना घेऊन दिल्लीला रवाना झाले. व्होरा यांना काहीच कलत नव्हते. ते अजय सिंह यांना निदान मंत्री तरी बनवा अशी विनंती करत होते. अशातच विमान दिल्ली विमानतळावर लँड झाले. पंतप्रधान असलेले राजीव गांधी तेव्हा रशियाच्या दौऱ्यावर निघाले होते. विमानतळावरच दोघांची भेट झाली. व्होरा यांना पाहताच राजीव गांधी म्हणाले, तुम्ही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहात. जबाबदारी स्वीकारा. यावेळी तिथे अर्जुन सिंह आणि दिग्विजय सिंह उपस्थित होते. 

भलेही व्होरा मुख्यमंत्री झाले परंतू त्यांच्या मंत्रिमंडळात अर्जुन सिंह यांचेच समर्थक अधिक होते. पुढे तीन वर्षांनी सिंह वनवास संपवून परतले तेव्हा व्होरा यांना मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडावी लागली. यानंतर ते राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री झाले होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीDigvijaya Singhदिग्विजय सिंहRajiv Gandhiराजीव गांधी