शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
4
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
5
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
6
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
7
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
8
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
9
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
10
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
11
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
12
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
13
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
14
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
15
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
16
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
17
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
18
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
19
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

"मला निदान मंत्री तरी बनवा"; राजीव गांधींनी मोतीलाल व्होरांना थेट मुख्यमंत्री केले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 17:02 IST

Motilal Vora Passed Away: मोतीलाल व्होरा यांच्या बाबत राजकीय करिअरला एक कलाटणी देणारा किस्सा घडला होता. मोतीलाल व्होरा मुख्यमंत्री होण्याआधी अर्जुन सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या व्होरा यांचे आज निधन झाले.

भोपाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे २ वेळा मुख्यमंत्री राहिलेले मोतीलाल व्होरा यांचे ९३ व्या वर्षी निधन झाले. रविवारीच त्यांनी वाढदिवस साजरा केला होता. मोतीलाला व्होरा हे गांधी परिवाराचे जवळच्या नेत्यांपैकी एक होते. मोठ्या काळापासून ते पक्षाचे भांडार प्रमुख देखील राहिले आहेत. व्होरा हे छत्तीसगडहून राज्यसभा सदस्य होते. ते दोनदा मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत. 

मोतीलाल व्होरा यांच्या बाबत राजकीय करिअरला एक कलाटणी देणारा किस्सा घडला होता. मोतीलाल व्होरा मुख्यमंत्री होण्याआधी अर्जुन सिंह यांच्या सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. पहिल्यांदा ते १३ मार्च १९८५ ते १३ फेब्रुवारी १९८८ पर्यंत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले होते. दुसऱ्यांदा ते २५ जानेवारी १९८९ ला मुख्यमंत्री झाले होते. यावेळी त्यांचा कार्यकाळ ११ महिन्यांचा होता. ८ डिसेंबर १९८९ ला त्यांना खुर्ची सोडावी लागली होती. २०१९ मध्ये व्होरा यांना काँग्रेसचे अंतरिम अध्यक्ष बनविण्याची चर्चा होती. 

मुख्यमंत्र्याची खूर्ची...१९८५ मध्ये विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर अर्जुन सिंह यांनी ९ मार्च १९८५ ला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर ते १० मार्चला राजीव गांधी यांच्याकडे मंत्रिमंडळाची यादी घेऊन गेले. परंतू राजीव गांधी यांच्या मनात काहीतरी वेगळेच सुरु होते. त्यांना मध्य प्रदेशच्या राजकारणात अर्जुन सिंह नको होते. राजीव यांनी यादी घेऊन आलेल्या अर्जुन सिंहांना दोन वाक्यांत वनवासात जाण्याचे आदेश दिले. ''तुमच्या पसंतीचा मुख्यमंत्री सुचवा आणि १४ मार्चला पंजाबला पोहोचा.'', असा तो आदेश होता. या आदेशामुळे अर्जुन सिंह यांना मोठा धक्का बसला होता. त्यांनी त्याच अवस्थेच राजीव गांधींना मोतीलाल व्होरा यांचे नाव सुचविले होते. 

तिथूनच सिंह यांनी त्यांचा मुलगा अजय सिंह याला फोन करत मोतीलाल व्होरा यांना तातडीने विशेष विमानाने घेऊन दिल्लीला ये, असे सांगितले. अजय सिंह विषेश विमानाने व्होरा यांना घेऊन दिल्लीला रवाना झाले. व्होरा यांना काहीच कलत नव्हते. ते अजय सिंह यांना निदान मंत्री तरी बनवा अशी विनंती करत होते. अशातच विमान दिल्ली विमानतळावर लँड झाले. पंतप्रधान असलेले राजीव गांधी तेव्हा रशियाच्या दौऱ्यावर निघाले होते. विमानतळावरच दोघांची भेट झाली. व्होरा यांना पाहताच राजीव गांधी म्हणाले, तुम्ही मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहात. जबाबदारी स्वीकारा. यावेळी तिथे अर्जुन सिंह आणि दिग्विजय सिंह उपस्थित होते. 

भलेही व्होरा मुख्यमंत्री झाले परंतू त्यांच्या मंत्रिमंडळात अर्जुन सिंह यांचेच समर्थक अधिक होते. पुढे तीन वर्षांनी सिंह वनवास संपवून परतले तेव्हा व्होरा यांना मुख्यमंत्रीपदाची खूर्ची सोडावी लागली. यानंतर ते राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात आरोग्य मंत्री झाले होते. 

टॅग्स :congressकाँग्रेसMadhya Pradeshमध्य प्रदेशChief Ministerमुख्यमंत्रीDigvijaya Singhदिग्विजय सिंहRajiv Gandhiराजीव गांधी