"महाविकास आघाडीला पुढील २५ वर्षे धोका नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 08:45 AM2021-03-31T08:45:23+5:302021-03-31T08:46:26+5:30

राज्यातील आमची महाविकास आघाडी आणि सरकार भक्कम आहे. पुढील २० ते २५ वर्षे तरी आम्हाला धोका नाही. अर्थात, सर्वांनाच पक्ष विस्ताराचा अधिकार आहे, शिवाय आम्ही कायमचे एकत्र राहणार आहोत, असेही नाही.

Mahavikas Aghadi is not in danger for next 25 years: Hasan Mushrif | "महाविकास आघाडीला पुढील २५ वर्षे धोका नाही"

"महाविकास आघाडीला पुढील २५ वर्षे धोका नाही"

googlenewsNext

अहमदनगर : राज्यातील आमची महाविकास आघाडी आणि सरकार भक्कम आहे. पुढील २० ते २५ वर्षे तरी आम्हाला धोका नाही. अर्थात, सर्वांनाच पक्ष विस्ताराचा अधिकार आहे, शिवाय आम्ही कायमचे एकत्र राहणार आहोत, असेही नाही. तीन पक्षांच्या नेत्यांचे एकमत आहे, तोपर्यंत आघाडी कायम राहील. मात्र, यात मतभेद निर्माण होतील असे कोणी वागू आणि बोलू नये, असे ग्रामविकासमंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी 
संवाद साधला. सध्या राज्यातील महाविकास आघाडीत वाझे प्रकरण, रश्मी शुक्ला, परमबीर सिंग प्रकरणावरून अस्वस्थता आहे. याबाबत मुश्रीफ म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सज्जन आणि सोज्वळ व्यक्तिमत्त्व आहे. अधिकाऱ्यांना ओळखण्यात कमी पडलो, असे खुद्द ठाकरे यांनीच सांगितले. आम्ही अनुभवी मंत्र्यांना सल्ला देऊच; पण तो ऐकायचा की नाही, कशाच्या आधारे आपले मत बनवायचे, हा त्यांचाच अधिकार असेल.

Web Title: Mahavikas Aghadi is not in danger for next 25 years: Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.