शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Vidhan Sabha Adhiveshan: “मार्शल लावून विरोधकांना आवाराच्या बाहेर काढा”; विधिमंडळात प्रचंड गदारोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 12:15 IST

Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan Live: भास्कर जाधव यांच्या आक्षेपानंतर नवाब मलिक यांनीही अशाप्रकारे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर स्पीकर लावून आंदोलन करणे योग्य नाही असं म्हटलं.

ठळक मुद्देज्या ज्या सदस्यांनी माईकचा वापर केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीजर हे बंद होणार नसेल तर तर आपलं सभागृह थांबवूया. ताबडतोब हा प्रकार थांबवला पाहिजेविरोधकांच्या प्रतिविधानसभा आंदोलनावर सत्ताधारी आमदार भडकले

मुंबई – विधिमंडळ अधिवेशाच्या दुसऱ्या दिवशी भाजपा आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवली होती. या कृतीवरून विधानसभेत शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. विधान भवन परिसरात कुठल्याही संविधानिक कामकाजाशिवाय इतर कामकाज होऊ शकत नाही. विरोधी पक्षांचा आंदोलन करण्याचा अधिकार आहे. परंतु स्पीकर लावून भाषणबाजी करणं यासाठी विधानभवन परिसराचा राजकीय वापर केला जातोय असा आरोप भास्कर जाधव यांनी केला.

भास्कर जाधव यांच्या आक्षेपानंतर नवाब मलिक यांनीही अशाप्रकारे विधिमंडळाच्या पायऱ्यांवर स्पीकर लावून आंदोलन करणे योग्य नाही. तात्काळ  हे स्पीकर जप्त करण्यात यावे अशी मागणी केली. इतकचं नाही तर मंत्री जयंत पाटील यांनी ज्या ज्या सदस्यांनी माईकचा वापर केला त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. विधिमंडळ पायऱ्यांवर प्रतिविधानसभा सुरू आहे. माईक सुरू आहे. जर हे बंद होणार नसेल तर तर आपलं सभागृह थांबवूया. ताबडतोब हा प्रकार थांबवला पाहिजे अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. त्यानंतर तालिका अध्यक्षपदी भास्कर जाधव पुन्हा बसले. तेव्हा तातडीने स्पीकर जप्त करण्याचे आदेश त्यांनी दिली

काय म्हणाले भास्कर जाधव?

विधिमंडळाच्या पायऱ्यांवर प्रतिविधानसभा भरवण्यात येते. स्पीकर लावले जातात. प्रत्येक वेळेला राजकारण केले जाते. आमचं केंद्रात सरकार आहे, आम्ही बोलू तसं वागू. मार्शल लावून या सगळ्यांना आवाराच्या बाहेर काढा असं माझं मत आहे. सभागृहात बसायचं नाही, महाराष्ट्राच्या हिताचे विषय मांडायचे नाही. आम्ही म्हणू ते करू, याला आत टाकू त्याला आता टाकू. ज्या गावच्या बाभळी त्या गावच्या बोरी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करायलाच हवी अशी मागणी त्यांनी केली.

सरकारचा बुरखा फाडू – देवेंद्र फडणवीस

मार्शल पाठवून पत्रकारांवर दंडुकेशाही करण्याचा प्रयत्न केला गेला. आजचं अधिवेशन सुरु करतील. लोकशाहीच्या दोन्ही स्तंभांना कुलूप लावण्याचं काम ठाकरे सरकार करत आहे. सरकारकडून दडपशाहीचा वापर केला जात आहे. ज्यापद्धतीने सरकारने १२ आमदारांचे निलंबन केले. हे सरकार शेतकरी, ओबीसी, मराठा समाजाविरोधात आहे. सरकार विरोधकांच्या प्रश्नाला उत्तर देऊ शकत नाही. खोटारडे आरोप लावून भाजपा आमदारांचे निलंबन केले गेले. प्रतिविधानसभा भरवली असताना माध्यमांचे कॅमेरा जप्त करण्यात आले. या सरकारचा बुरखा फाडण्याचं काम आम्ही करू, जनतेसमोर जाऊन आम्ही सरकारला उघडं पाडू असा इशारा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाBJPभाजपाBhaskar Jadhavभास्कर जाधव