शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंग यांनी स्वत:च्या बचावासाठी सनसनाटी निर्माण करण्यासाठी लेटरचा वापर केला : नवाब मलिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:10 IST

Maharashtra Minister Nawab Malik Criticize Former Commissioner police Mumbai Param bir Singh letter bomb Sachin Vaze and Anil Deshmukh 100 crore : महाराष्ट्रात आमदार फोडता येत नाही म्हणून त्यासाठी सरकारला बदनाम करुन केंद्राचा वापर करत हे सरकार बदलता येते का हा प्रयत्न भाजप करत असल्याचा मलिक यांचा आरोप

ठळक मुद्देआमदार फोडता येत नाही म्हणून बदनाम करून केंद्राचा वापर, मलिक यांचं वक्तव्यपरमबीर सिंग यांचे आरोप स्वतःला वाचवण्यासाठी निर्माण केलेले, मलिक यांचं वक्तव्य

"परमबीर सिंग टीआरपी घोटाळ्याबाबतीत पुढे पुढे होते मात्र मागील दोन महिने ते गार पडले होते. त्यांच्यावर कोणता दबाव होता हे आम्हाला माहीत नाही. पण आजच्या घडीला परमबीर सिंग लेटर लिहितात तेव्हा लेटरमध्ये ते दोन मुद्दे उपस्थित करत आहेत. त्यामध्ये गृहमंत्र्यांनी टार्गेट दिले होते असा खोटा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी स्वतः पुरावे निर्माण करुन सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला," असे म्हणत नवाब मलिक यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. "दुसरा मुद्दा डेलकर आत्महत्या प्रकरणात गृहमंत्री भाजपच्या नेत्यांना फसवण्याचा प्रकार करा असा आदेश मला देत होते असे म्हटले आहे. यात स्पष्ट प्रश्न आहे मोहन डेलकर यांची आत्महत्या मुंबईमध्ये झाल्यानंतर गुन्हा मुंबईत होणार की दादरा नगर हवेलीमध्ये होणार याचं उत्तर जनतेला अपेक्षित आहे," असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले. Maharashtra Minister Nawab Malik Criticize Former Commissioner police Mumbai Param bir Singh"परमबीर सिंग यांचे आरोप स्वतःला वाचवण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. दोन - तीन दिवस फडणवीस माध्यमांशी संवाद साधून लोकांची दिशाभूल करत आहेत. ते स्पष्टपणे उघडे पडले आहेत. हिंदीमध्ये संवाद साधून फडणवीस यांनी सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. त्या पत्रकार परिषदेत रश्मी शुक्लांची बाजू ते मांडत होते. बेकायदेशीररित्या फोन टॅप करणे हा गुन्हा आहे. फडणवीस ज्या रिपोर्टचा संदर्भ देत होते. त्यामध्ये ८० टक्के पोलिसांची बदली झालेली नाही आणि ज्या रिपोर्टचा संदर्भ देत होते की, गृहमंत्री पैसे घेत होते परंतु गृहमंत्री ही नावे अंतिम करत नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतात त्याआधी ते निर्णय जस्टीफायसाठी गृहमंत्र्यांकडे येतो तो निर्णय करत असताना एसीएस होम, डीजी त्याकाळातील सुबोध जस्वाल या समितीमध्ये असताना त्यांनी ज्या शिफारशी केल्या त्यांच्या बदल्या झाल्या आहेत," असंही मलिक यांनी स्पष्ट केलं. 

खालच्या अधिकार्‍यांच्या बदल्यांची शिफारस पोलीस एस्टाब्लीशमेंट बोर्ड याचे अध्यक्ष ज्यांनी ही नोट पाठवली आहे, ते स्वतः त्याचे अध्यक्ष असताना जी नावे पाठवली त्या बदल्या झाल्या आहेत. फडणवीस यांना सत्तेशिवाय रहाता येत नाहीय असा थेट आरोपही त्यांनी केला आहे.आमदार फोडता येत नाही म्हणून बदनाम करून केंद्राचा वापरभाजपने या देशात कर्नाटकचे सरकार पाडले. उत्तराखंडमध्ये सरकार बदल केला. ईशान्य भारतात सरकार बदल केला. मध्यप्रदेशमध्ये सरकार बदलले. त्यांना महाराष्ट्रात आमदार फोडता येत नाही म्हणून त्यासाठी महाविकास आघाडी सरकारला बदनाम करुन केंद्राचा वापर करत हे सरकार बदलता येते का हा प्रयत्न भाजप करत आहे. परंतु आमच्याकडे पूर्ण बहुमत आहे त्यामुळे कुठलंही सरकार बहुमतात आहे तोपर्यंत सत्तेपासून कुणी दूर करु शकत नाही. जोपर्यंत सरकार फ्लोअर वर बहुमत सिद्ध करु शकत नाही तोपर्यंत कुठलंही सरकार सत्तेपासून दूर करता येत नाही. ते अधिकार राज्यपाल किंवा केंद्र सरकारला नसल्याचेही मलिक म्हणाले.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रnawab malikनवाब मलिकParam Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखsachin Vazeसचिन वाझे