शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

"देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात गुन्हे कमी; शिक्षेच्या प्रमाणातही वाढ झाल्याचं उघड"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 06:52 IST

Home Minister Anil deshmukh News: २०१९ मध्ये बलात्काराचे राजस्थानमध्ये ५,९९७, उत्तर प्रदेशमध्ये ३,०६५, मध्य प्रदेशमध्ये २,४८५ आणि महाराष्ट्रात २,२९९ असे गुन्हे नोंदविण्यात आले.

मुंबई : देशाचा गुन्हे दर वाढत असताना महाराष्ट्रातील गुन्ह्यांचा दर २०१८-१९ च्या तुलनेत तेवढाच राहिला असून महाराष्ट्र आठव्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रापेक्षा केरळ, तेलंगणा, मध्य प्रदेश, हरयाणा, राजस्थान या राज्यांचा गुन्हे दर अधिक असल्याचा दावा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

राज्यात गुन्हे सिद्ध होण्याचे तसेच शिक्षेचे प्रमाण वाढले असून २०१८ मध्ये हा दर ४१.४१ होता तो २०१९ मध्ये ४९ टक्के झाला आहे. त्यामध्ये राज्य अकराव्या क्रमांकावर आहे. कर्नाटक (३६.६), मध्य प्रदेश (४७), गुजरात (४५.६), तेलंगणा (४२.५) असे प्रमाण आहे.२०१९ मध्ये खुनासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये देशाचा गुन्हे दर २.२ होता, तर महाराष्ट्राचा गुन्हे दर केवळ १.७ असून महाराष्ट्र राज्य २५ व्या क्रमांकावर होते. तर खुनाचा प्रयत्न संदर्भातील गुन्ह्यांबाबत महाराष्ट्राचा १७ वा क्रमांक आहे. देशात २०१९ मध्ये अवैध हत्यार बाळगण्याच्या प्रकरणात महाराष्ट्राचा ९ वा क्रमांक आहे. राज्यात केवळ ९१० गुन्ह्यांची नोंद आहे. उत्तर प्रदेश (२५,५२४), मध्य प्रदेश (३,८४७), बिहार (२,९७६), राजस्थान (२,०९५) गुन्हे नोंद आहेत.परिचितांकडूनच होतात महिलांवर लैंगिक अत्याचार२०१९ मध्ये बलात्काराचे राजस्थानमध्ये ५,९९७, उत्तर प्रदेशमध्ये ३,०६५, मध्य प्रदेशमध्ये २,४८५ आणि महाराष्ट्रात २,२९९ असे गुन्हे नोंदविण्यात आले. त्यापैकी २,२७४ गुन्हेगार हे पीडितांचे परिचित, नातेवाईक, मित्र, शेजारी आहेत; तर केवळ २५ जण अनोळखी आहेत.त्यामध्ये महाराष्ट्राचा गुन्हे दर ३.०९ असून महाराष्ट्र २२ व्या क्रमांकावर आहे. इतर राज्यांचा गुन्हे दर केरळ (११.६), हिमाचल प्रदेश (१०), हरयाणा (१०.९), झारखंड (७.७) व मध्य प्रदेश (६.२) असा आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAnil Deshmukhअनिल देशमुख