शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोख नेमका कुणाकडे आहे? सहज बोलले की 'घड्याळा'ची वेळ चुकलीय?”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 12:36 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतल्या पलूस तालुक्यातील भिलवडी गावात पाहणी दौरा केला.

मुंबई – गेल्या आठवड्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पुराचा मोठा फटका बसला. या महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. परंतु अद्याप सरकारकडून कुठलीही मदतीची घोषणा करण्यात आली नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेपूरग्रस्त भागाचा दौरा करत आहेत. मागील आठवड्यात त्यांनी कोकण, कोल्हापूरचा दौरा केला आणि आज ते सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगलीतल्या पलूस तालुक्यातील भिलवडी गावात पाहणी दौरा केला. यावेळी पूरगस्तांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानावरून भाजपानं मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला आहे. भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले की, म्हणजे असं झालं की लोकांना मदत केली, पॅकेज घोषित केले की त्यातील पैशातून सरकारमधीलच वसुली होते याची प्रामाणिक कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली आहे का? पूरग्रस्तांसाठी मदत पॅकेजमध्येही कुणी वाझे आहे का? मुख्यमंत्र्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? सहज बोलले की 'घड्याळा'ची वेळ चुकलीय? असा टोला त्यांना लगावला आहे.

मागील काही महिन्यांपासून ठाकरे सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे. अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसुलीचा आरोप केला होता. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून चौकशी सुरु झाली. ईडीनं अनिल देशमुखांची काही संपत्तीही जप्त केली आहे. त्यामुळे याच प्रकरणाचा हवाला देत भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

हजारो कोटीचं पॅकेज जाहीर करून ते नेमके कोठे जाते याची माहिती  कळत नाही,असली थोतांडे मला करता येत नाहीत. कृष्णाकाठच्या पूरग्रस्तांसाठी जे जे करता येईल ते ते प्रामाणिकपणे मी करेन हे माझे जनतेला वचन आहे. तुम्ही सरकारला साथ द्या. आपण कायमस्वरूपी या समस्येवर तोडगा काढू असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. उद्धव ठाकरे यांनी भिलवडी येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला.

पॅकेज जाहीर करून तत्पूर्ती मलमपट्टी करण्याने कोणतीही नैसर्गिक आपत्ती टळू शकत नाही. अनुदान देऊन जर दरवर्षी घरेदारे,संसार माहापुराने उद्ध्वस्त होत असतील,नागरिकांना वारंवार त्याच त्याच समस्येला सामोरे जावे लागत असेल तर कायम स्वरुपी उपाययोजना करण्यासाठी प्राधान्यक्रम द्यावा लागेल. शासकीय अधिकाऱ्यांकडून पुराच्या दहकतेची , नुकसानीची माहिती प्राप्त झाली आहे. दरवर्षी केवळ पाण्याची पातळी मोजत बसण्यापेक्षा कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी शासन कटीबध्द आहे. सरपंच मंडळी कडून निवेदन ही स्वीकारली आहेत.या सगळ्यांचा पूर्ण आढावा घेवून कायमस्वरूपी कोणती उपाययोजना करणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शासन धोरणात्मक निर्णय घेईल असंही मुख्यमंत्री म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेfloodपूरBJPभाजपा