शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

Maharashtra Vidhan Parishad: आमदार गोपीचंद पडळकरांच्या ‘त्या’ गोष्टीतील गाढव कोण?; तुम्हीच ऐका अन् सांगा...

By प्रविण मरगळे | Updated: March 4, 2021 15:39 IST

Maharashtra Budget Session 2021, BJP MLC Gopichand Padalkar target State government: तर जो फुले, शाहू आंबेडकरांचा विचार तुम्ही महाराष्ट्रात मांडत होता, त्याला जनता नमस्कार करत होते, ते आता जनतेला माहिती आहे असं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

ठळक मुद्देबेरोजगारांच्या बाबतीत घोषणा केल्या जातात मग १२ हजार आदिवासींची पदे रिक्त आहेतफुले शाहू आंबेडकरांची नावं घ्यायची अन पै पाहुण्यांची सत्ता स्थापन करायची त्या लोकांनी याचं उत्तर द्यायला हवीतमराठ्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम ठाकरे सरकार करतंय

मुंबई – विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला, पूजा चव्हाण आत्महत्या, मराठा आरक्षणासह अनेक मुद्द्यावरून पडळकरांनी विधान परिषदेत सरकारवर घणाघात केला, तसेच फुले, शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचं आणि पै पाहुण्यांची सत्ता स्थापन करायची असं सांगत गोपीचंद पडळकरांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकास्त्र सोडलं.(BJP MLC Gopichand Padalkar Target Thackeray Government over various issue)  

विधान परिषदेत गोपीचंद पडळकर म्हणाले की, एका गावात मूर्तीकार होता, मूर्त्या बनवत होता, त्याच्याकडे एक गाढव होता, तो त्या गाढवावर मूर्त्या घेऊन गावोगावी फिरत होता, ओझं वाहणं गाढवाचं काम आहे, ज्यावेळी गाढवाच्या पाठीवर मूर्त्या असायचा तेव्हा गाढव पुढे पुढे जायचं, त्यावेळी गावातील माणसं त्याला नमस्कार करायची, कारण त्या गाढवावर हनुमानाची मूर्ती असायची, गणेशाची मूर्ती असायची, दत्ताची मूर्ती असायची लोकांना ती मूर्ती दिसायची आणि असचं महाराष्ट्रात घडलं, ज्यांनी फुले, शाहू आंबेडकरांचं नाव घेतलं, त्यांना महाराष्ट्रातील लोकांनी नमस्कार केला, त्यांना वाटलं हा नमस्कार मलाच आहे, ते गाढव मालकावर बिनसलं, तेव्हा मालकाने गाढवाला सांगितले, अरे गाढवा, ते तुला नमस्कार करत नाहीत तर तुझ्या पाठीवर ज्या मूर्त्या आहेत त्यांना नमस्कार करत होते, त्यामुळे फुले, शाहू आंबेडकरांचे फोटो लावून जे फिरले त्यांना असं वाटलं की जनता त्यांना नमस्कार करतेय, पण असं नव्हतं, ते तुम्हाला नमस्कार करत नव्हते, तर जो फुले, शाहू आंबेडकरांचा विचार तुम्ही महाराष्ट्रात मांडत होता, त्याला जनता नमस्कार करत होते, ते आता जनतेला माहिती आहे असं सांगत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.

तसेच जर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर हे राज्य चालतं, पण पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठाची आर्थिक परिस्थिती बिघडली, ६०० पैकी ३०० कोटींपर्यंत ठेवी कमी झाल्या, ज्या फुलेंच्या नावावर तुम्ही राज्यात जागर घालतायेत, त्या विद्यापीठाची अवस्था अशी करून ठेवली आहे. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचा भत्ता गोठवला, त्यांची बाजू तुम्ही घेत  नाही, नुसतं भाषणात फुले शाहू आंबेडकरांचे नाव घ्यायचं पण असं चालणार नाही, विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत, मागासवर्गीयांच्या भरतीतील आरक्षण कायमचं बंद केलं, ही तुमची विचारसरणी कुठली? बेरोजगारांच्या बाबतीत घोषणा केल्या जातात मग १२ हजार आदिवासींची पदे रिक्त आहेत, महाराष्ट्रातील अनेक जाती लाभांपासून वंचित आहे, मग फुले शाहू आंबेडकरांची नावं घ्यायची अन पै पाहुण्यांची सत्ता स्थापन करायची त्या लोकांनी याचं उत्तर द्यायला हवीत असंही गोपीचंद पडळकरांनी सांगितले.  

दरम्यान, भाजपा(BJP) सरकारच्या काळात मराठा आरक्षणाला(Maratha Reservation) सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, हा राजकारणाचा विषय नाही, मराठ्यांच्या भावनांशी खेळण्याचं काम ठाकरे सरकार करतंय, या माध्यमातून सामाजिक समीकरण बिघडवली जात आहे, त्याकडे सरकार दुर्लक्ष करतंय, सुप्रीम कोर्टात जेव्हा सुनावणी सुरू होती, तेव्हा वकिलांकडे कागदपत्रे पुरवली नसल्याचं समोर आलं, मराठा आरक्षणासाठी वेळकाढूपणा केला जातोय असं सांगत पडळकरांनी मराठा आरक्षणावरून सरकारवर टीका केली.  

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरBJPभाजपाMaratha Reservationमराठा आरक्षण