शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

...तर हिटलरनेही आत्महत्या केली असती, ममतांनी साधला मोदींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2019 4:49 PM

लोकशाहीत प्रत्येकाला एकमेकांवर चिखलफेक करण्याचा अधिकार असतो.

नवी दिल्ली- लोकशाहीत प्रत्येकाला एकमेकांवर चिखलफेक करण्याचा अधिकार असतो. प्रचार रॅली आणि सभेदरम्यान नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. त्यातच अनेक नेते एकमेकांवर टीका करताना पातळीही सोडतात. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही मोदींवर निशाणा साधला आहे. त्या व्यक्तीचं राजकारण हे हिंसा आणि दंगलींनी रंगलेलं आहे. मोदी ज्या पद्धतीनं काम करतात, कदाचित ते पाहिल्यावर एडॉल्फ हिटलरनेही आत्महत्या केली असती, असंही ममता म्हणाल्या आहेत.भाजपासारख्या देशातील सर्वात मोठ्या पक्षाशी लढण्याचा काँग्रेस दावा करत आहे. परंतु काँग्रेस मनोमन पराभूत झालेली आहे. मोदींचा सामना करण्याचा काँग्रेस नेत्यांमध्ये दम नाही. मोदी हे समाज सत्तावादीविरोधी असल्याचंही ममता म्हणाल्या आहेत. त्यांची काम करण्याची पद्धत कोणालाही आवडत नाही. त्यांच्या भीतीपायीच भाजपामधला कोणताही नेता त्यांच्याविरोधात बोलत नाही. काँग्रेस पक्ष कमकुवत असल्यानंच भाजपा वाढत चालला आहे. राहुल गांधींना सरकार बनवण्यासाठी इतर पक्षांचा पाठिंबा लागणार आहे. त्यामुळे एकदा का मोदी सत्तेतून बाहेर गेले, तर नव्या भारताचं निर्माण करता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्ता व राजकारणातून हद्दपार करा तसेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी, असे उद्गार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूलच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी सोमवारी काढले होते.येथील प्रचारसभेत त्या म्हणाल्या होत्या, मोदी यांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीतील साडेचार वर्षे विदेश दौरे करण्यातच घालविले. त्यांना देशातील शेतकरी, मध्यमवर्गाकडे लक्ष देण्यास अजिबात वेळ नव्हता. निवडणुका तोंडावर आल्यानंतर मोदी आता प्रत्येकाला धमकावत आहेत आणि सर्रास खोटा प्रचार करत आहेत. धडधडीत खोटे बोलण्याच्या स्पर्धेत मोदी नक्कीच प्रथम क्रमांक पटकावतील. त्या पुढे म्हणाल्या, मोदी यांनी खोटे बोलू नये म्हणून आता जनतेनेच त्यांच्या तोंडाला चिकटपट्टी लावायला हवी. देशाच्या भल्यासाठी त्यांना केवळ पंतप्रधानपदावरूनच नव्हेतर, राजकारणातूनही हद्दपार करायला हवे.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जी