शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

चौकीदाराला चौकीतून हटवण्याची वेळ आली- अखिलेश यादव

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2019 17:05 IST

अखिलेश यादव यांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल

लखनऊ: आता चौकीदाराला चौकीतून हटवण्याची वेळ आली आहे, असं म्हणत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. निवडणुकीआधी हे चौकीदार झाले आहेत. आता एका-एका चौकीदाराची चौकी काढून घेण्याचं काम आम्ही निवडणुकीत करू, अशा शब्दांमध्ये यादव पंतप्रधानांसह भाजपावर बरसले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आज देवबंदमध्ये समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीची संयुक्त सभा झाली. त्यात यादव यांनी भाजपाचा समाचार घेतला. यंदाची निवडणूक इतिहास घडवू शकते. त्यामुळे आपल्याकडे इतिहास लिहिण्याची संधी आहे, असं उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी म्हटलं. सध्या द्वेष पसरवणारे नेते आले आहेत. हे नेते तिरस्कार पसरवण्याशिवाय काहीच करत नाहीत, अशा शब्दांमध्ये यादव यांनी मोदी आणि योगींना लक्ष्य केलं. सपा-बसपा-आरएलडी महाआघाडीला 'सराब' म्हणणाऱ्या मोदींवर त्यांनी तोंडसुख घेतलं. सराब बोलणारी मंडळी सत्तेच्या नशेत असल्याचं प्रत्युत्तर त्यांनी दिलं. देशाला तोडण्याचं काम भाजपानं इंग्रजांपेक्षा जास्त केलं आहे. ही मंडळी धर्माची ठेकेदार झाली आहेत, अशी टीका अखिलेश यांनी केली. द्वेषाच्या भिंती पाडण्याची संधी या निवडणुकीमुळे चालून आली आहे. महाआघाडीच्या माध्यमातून आम्ही देशात बदल घडवू. आम्ही देशाला नवा पंतप्रधान देऊ, असं अखिलेश म्हणाले.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAkhilesh Yadavअखिलेश यादवNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019