शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

...तर निवडणूकच रद्द करा; एक्झिट पोलनंतर आपची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 16:43 IST

दिल्लीत आपला पराभव पत्करावा लागणार असल्याचा एक्झिट पोल्सचा अंदाज

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातलं मतदान संपताच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले. जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला. यानंतर आम आदमी पार्टीनं पुन्हा एकदा ईव्हीएमला लक्ष्य केलं. व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएममधील पडताळणी चुकल्यास निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी आपचे राज्यसभेतील खासदार संजय सिंह यांनी केली. दिल्लीमध्ये आपचं सरकार आहे. मात्र बहुतांश एक्झिट पोल्समध्ये दिल्लीत आपला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. देशाच्या राजधानीत भाजपाला निर्विवाद यश मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यानंतर आपनं एक्झिट पोल्स आणि ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. 'खरा खेळ ईव्हीएमच्या माध्यमातून खेळला जाणार का? पैसे घेऊन एक्झिट पोल केले जातात का? बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, पश्चिम बंगाल. या सगळ्याच राज्यांमध्ये भाजपा विजयी होणार, हे कसं शक्य आहे?'', असे प्रश्न सिंह यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत.संजय सिंह यांनी ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षातील नेत्यांना आवाहन केलं आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या पडताळणीत चूक आढळल्यास सर्व विरोधी पक्षांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी करावी, असं सिंह म्हणाले आहेत. काल सातव्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर विविध वाहिन्यांनी त्यांचे एक्झिट पोल प्रसिद्ध केले. यातील बहुतांश एक्झिट पोल्सनी एनडीएला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. दिल्लीत आपला भोपळाही फोडता येणार नाही, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. तर काही एक्झिट पोल्समध्ये आपला दिल्लीत एक जागा मिळेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९VVPATव्हीव्हीपीएटीexit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीAAPआपBJPभाजपा