शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

'न्याय' देण्यासाठी 72 हजार आणणार कुठून?; राहुल गांधींनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2019 13:09 IST

न्याय योजनेबद्दल विद्यार्थ्यानं विचारलेल्या प्रश्नाला राहुल गांधींचं उत्तर

पुणे: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी तरुण मतदारांशी संवाद साधला. यावेळी राहुल यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. राहुल गांधींनी काही दिवसांपूर्वीच न्याय योजनेची घोषणा केली. मात्र त्यासाठी निधी कुठून आणणार, याचं उत्तर त्यावेळी राहुल यांनी दिलं नव्हतं. त्याबद्दल राहुल यांनी आज भाष्य केलं.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या कुटुंबांना दर वर्षी 72 हजारांची रक्कम दिली जाईल, असं आश्वासन राहुल गांधींनी दिलं आहे. या योजनेसाठी पैसा कुठून आणणार, असा प्रश्न त्यांना एका विद्यार्थ्यानं विचारला. यावर आम्ही नीरव मोदी, अनिल अंबानी, मेहुल चोकसी आणि विजय माल्ल्याकडून पैसे आणून गरिबांना देऊ, असं उत्तर काँग्रेस अध्यक्षांनी दिलं. 'किमान मासिक उत्पन्न 12 हजारांपेक्षा कमी असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी 72 हजारांची आर्थिक मदत दिली जाईल. याचा फायदा देशातील 20 टक्के जनतेला होईल,' असा दावा राहुल यांनी केला होता. या योजनेला काँग्रेसला न्याय (न्यूनतम आय योजना) असं नाव दिलं आहे.राहुल गांधींनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करताना न्याय योजनेचा पुनरुच्चार केला. मात्र या योजनेसाठी पैसा कुठून आणला जाणार, हा प्रश्न अनुत्तरितच होता. आज विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलं. 'नीरव मोदी, मेहुल चोकसी, अनिल अंबानी आणि विजय माल्ल्यासारख्या लोकांकडून पैसा घेऊन आम्ही तो लोकांना देऊ. त्यासाठी मध्यम वर्गावरील कराचा बोजा वाढवणार नाही,' असं राहुल म्हणाले. 'आम्ही या योजनेसाठी आवश्यक तो अभ्यास केलेला आहे. कुठून पैसा आणायचा, तो कोणाला द्यायचा, याचा अभ्यास करण्यात झालेला आहे. आधी प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवण्यात येईल. त्यानंतर देशभरात तिची अंमलबजावणी केली जाईल,' असं त्यांनी सांगितलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Rahul Gandhiराहुल गांधीNirav Modiनीरव मोदीVijay Mallyaविजय मल्ल्याAnil Ambaniअनिल अंबानीcongressकाँग्रेस