शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

काँग्रेसचा हात देशासोबत की देशद्रोह्यांसोबत?; पंतप्रधान मोदींचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2019 13:00 IST

कलम 124-अ रद्द करण्याच्या आश्वासनावरुन काँग्रेसवर हल्लाबोल

इटानगर: सत्तेत आल्यास देशद्रोहाचं कलम रद्द करण्याचं आश्वासन देणाऱ्या काँग्रेसवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निशाणा साधला आहे. देशातील फुटिरतावाद्यांना प्रोत्साहन देण्याचा काँग्रेसचा मानस आहे. तिरंगा जाळणाऱ्या, जय हिंदऐवजी भारत तेरे तुकडे होंगे अशा घोषणा देणाऱ्यांबद्दल काँग्रेसला सहानुभूती वाटते. त्यामुळेच काँग्रेसचा हात देशासोबत आहे की देशद्रोह्यांसोबत, असा प्रश्न विचारावासा वाटतो, असं मोदींनी म्हटलं. यावेळी त्यांना महाआघाडीच्या उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्याचं आवाहन उपस्थितांना केलं. ते अरुणाचल प्रदेशात आयोजित करण्यात आलेल्या एका जनसभेत बोलत होते. काल काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. सत्तेत आल्यास भारतीय दंड संहितेतलं देशद्रोहाचं कलम (124-अ) रद्द करण्याचं वचन काँग्रेसनं जाहीरनाम्यातून दिलं. त्यावरुन मोदींनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. 'आम्ही देशद्रोह्यांना कठोर शिक्षा देण्याची भूमिका मांडतो. मात्र काँग्रेसला हे कलमच रद्द करायचं आहे. त्यामुळे काँग्रेसचा हात नेमका कोणासोबत आहे? देशासोबत की देशद्रोह्यांसोबत?', असा सवाल मोदींनी विचारला. यावेळी मोदींनी गेल्या 5 वर्षांत झालेल्या विकासकामांची माहिती दिली. 'आम्ही गॅस देण्याचं आश्वासन दिलं नव्हतं. मात्र उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत 7 कोटींहून अधिक सिलिंडर दिले. आम्ही आरोग्या क्षेत्रासाठी मोठमोठ्या घोषणा केल्या नव्हत्या. मात्र आयुष्यमान भारत योजना लागू केली. त्यातून गरिबांना मोफत उपचार मिळत आहेत,' असं मोदींनी म्हटलं. मी जे काम हाती घेतो, ते पूर्ण करतोच, असंदेखील पंतप्रधान म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली. काँग्रेसचा जाहीरनामा खोट्या आश्वासनांनी भरलेला आहे, असं मोदींनी म्हटलं. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNarendra Modiनरेंद्र मोदीseditionदेशद्रोहcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधी