शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

अब की बार किसकी सरकार? दिल्लीतला 'हा' मतदारसंघ ठरवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 14:07 IST

मतदारसंघात तीन पक्षांमध्ये टक्कर

नवी दिल्ली: दिल्लीतल्या चांदनी चौक मतदारसंघाला देशाचा मूड अतिशय उत्तमपणे समजतो असं मानलं जातं. गेल्या 15 लोकसभा निवडणुकांचा विचार केल्यास बहुतांश वेळा चांदनी चौकमध्ये जिंकणाऱ्या पक्षानंच केंद्रात सत्ता स्थापन केली आहे. इतिहासावर नजर टाकल्यास केवळ दोनवेळाच चांदनी चौकवासीयांचा अंदाज चुकला आहे. यंदा चांदनी चौकमध्ये तिहेरी लढत आहे. या ठिकाणी आम आदमा पार्टी, काँग्रेस आणि भाजपामध्ये कडवी टक्कर पाहायला मिळत आहे. चांदनी चौक दिल्लीतला सर्वात लहान मतदारसंघ आहे. या ठिकाणी 15 लाख 61 हजार 828 मतदार आहेत. या मतदारसंघात भाजपाकडून डॉ. हर्षवर्धन, काँग्रेसकडून जयप्रकाश अग्रवाल आणि आपकडून पंकज गुप्ता मैदानात आहेत. चांदनी चौकचा निवडणूक इतिहास मोठा रंजक आहे. या मतदारसंघातून 9 वेळा काँग्रेसचे, 4 वेळा भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर प्रत्येकी एक-एकदा जनसंघ आणि जनता पार्टीचे उमेदवार विजयी झाले आहेत. चांदनी चौक मतदारसंघ 1956 मध्ये अस्तित्वात आला. 1957 मध्ये मतदारसंघात पहिल्यांदा निवडणूक झाली. यावेळी चांदनी चौकवासीयांनी देशातील मतदारांची नस अचूक ओळखली. त्यावेळी काँग्रेसचे राधा रमन या मतदारसंघातून विजयी झाले होते आणि देशातही काँग्रेसचं सरकार आलं. 2014 मध्ये देशात मोदी सरकार आलं. त्यावेळी या मतदारसंघातून भाजपाचे डॉ. हर्षवर्धन विजयी झाले. त्यामुळे यंदा चांदनी चौक कोणाला कौल देणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकDelhi Lok Sabha Election 2019दिल्ली लोकसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेसAAPआप