शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

26 तारखेला शपथ घेणार मोदी? तारखेमागे अनोखं गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2019 19:56 IST

मोदी 26 तारखेला शपथ घेणार असल्याची जोरदार चर्चा

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक आहे. या पार्श्वभूमीवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचं बैठकांचं सत्र सुरू आहे. भाजपाला धक्का बसल्यास संधी साधण्याची रणनीती विरोधी पक्षांनी आखली आहे. तर भाजपानं एनडीएतील सहकाऱ्यांसोबत मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची तयारी सुरू केली आहे. आज भाजपानं दिल्लीत एनडीएतील घटक पक्षांच्या नेत्यांसाठी डिनरचं आयोजन केलं आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीचा मुहूर्त ठरल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. यानंतर तिसऱ्याच दिवशी म्हणजेच 26 मे रोजी मोदी शपथ घेऊ शकतात. 8 हा आकडा मोदींसाठी शुभ आहे. 26 या तारखेतील दोन अंकांची बेरीज 8 होते. त्यामुळे मोदी 26 तारखेला शपथ घेतील, अशी चर्चा दिल्लीत आहे. 2014 मध्येही मोदींनी 26 तारखेलाच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी 16 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला होता. भाजपानं आज एनडीएमधील घटक पक्षांची बैठक घेतली. या बैठकीत आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. रविवारी मतदानाचा शेवटचा टप्पा संपल्यानंतर आलेल्या विविध एक्झिट पोल्सनी भाजपाच सत्ता स्थापन करेल, असा अंदाज वर्तवला. तेव्हापासून भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपानं मित्र पक्षांसाठी आज डिनरचं आयोजन केलं आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा