शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

8-10 जागा मिळवणारेदेखील पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहताहेत- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 14:06 IST

पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

चंदोली: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीवर शरसंधान साधलं आहे. स्वप्न पाहणं चुकीचं नाही. पण अबकी बार मोदी सरकार हे जनतेनं मनाशी ठरवलं आहे, असं मोदी उत्तर प्रदेशातल्या चंदोलीमधल्या जनसभेला संबोधित करताना म्हणाले. ज्यांच्या 8-10, 20-22, 30-35 जागा निवडून येतात, तेदेखील आता पंतप्रधान होण्याची स्वप्नं पाहू लागले आहेत, असा टोला लगावत मोदींनी महाआघाडीतल्या अनेक नेत्यांना लक्ष्य केलं. स्वप्न पाहण्यात काहीही गैर नाही. पण यंदा मोदी सरकारच येणार, हे जनतेनं ठरवलं आहे, असं मोदींनी म्हटलं. देशाला स्थिर सरकार कसं देणार याचं उत्तर अद्याप विरोधकांच्या आघाडीला सापडलेलं नाही, अशा शब्दांत त्यांनी महाआघाडीला लक्ष्य केलं. विरोधकांची महाआघाडी महामिलावट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दहशतवादाच्या मुद्द्यावर सरकारचं धोरण स्पष्ट असल्याचं मोदी म्हणाले. 'देशाच्या जवानांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही. आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारू. भारतात राहून पाकिस्तानचे गुण गाणाऱ्या फुटीरतावाद्यांना आम्ही कठोरपणे हाताळत आहोत,' असं मोदींनी म्हटलं. यावेळी त्यांनी पूर्वांचलमधल्या शेतकऱ्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. 'पूर्वांचलमधल्या शुगर फ्री तांदळाची खूप चर्चा होत आहे. वाराणसीत आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र उभारण्यात आलं आहे. चांगलं बियाणं निवडण्यासाठी, पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना या केंद्राची मदत होईल,' असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019chandauli-pcचंदौलीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा