शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

8-10 जागा मिळवणारेदेखील पंतप्रधान होण्याची स्वप्न पाहताहेत- मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 14:06 IST

पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर निशाणा

चंदोली: लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांच्या महाआघाडीवर शरसंधान साधलं आहे. स्वप्न पाहणं चुकीचं नाही. पण अबकी बार मोदी सरकार हे जनतेनं मनाशी ठरवलं आहे, असं मोदी उत्तर प्रदेशातल्या चंदोलीमधल्या जनसभेला संबोधित करताना म्हणाले. ज्यांच्या 8-10, 20-22, 30-35 जागा निवडून येतात, तेदेखील आता पंतप्रधान होण्याची स्वप्नं पाहू लागले आहेत, असा टोला लगावत मोदींनी महाआघाडीतल्या अनेक नेत्यांना लक्ष्य केलं. स्वप्न पाहण्यात काहीही गैर नाही. पण यंदा मोदी सरकारच येणार, हे जनतेनं ठरवलं आहे, असं मोदींनी म्हटलं. देशाला स्थिर सरकार कसं देणार याचं उत्तर अद्याप विरोधकांच्या आघाडीला सापडलेलं नाही, अशा शब्दांत त्यांनी महाआघाडीला लक्ष्य केलं. विरोधकांची महाआघाडी महामिलावट असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. दहशतवादाच्या मुद्द्यावर सरकारचं धोरण स्पष्ट असल्याचं मोदी म्हणाले. 'देशाच्या जवानांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड होणार नाही. आम्ही दहशतवाद्यांना घरात घुसून मारू. भारतात राहून पाकिस्तानचे गुण गाणाऱ्या फुटीरतावाद्यांना आम्ही कठोरपणे हाताळत आहोत,' असं मोदींनी म्हटलं. यावेळी त्यांनी पूर्वांचलमधल्या शेतकऱ्यांचं तोंडभरुन कौतुक केलं. 'पूर्वांचलमधल्या शुगर फ्री तांदळाची खूप चर्चा होत आहे. वाराणसीत आंतरराष्ट्रीय तांदूळ संशोधन केंद्र उभारण्यात आलं आहे. चांगलं बियाणं निवडण्यासाठी, पिकाची काळजी घेण्यासाठी शेतकऱ्यांना या केंद्राची मदत होईल,' असं मोदी म्हणाले. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019chandauli-pcचंदौलीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा