शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

'...तर आरएसएसने मोदींना पंतप्रधान केलं नसतं'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2019 16:09 IST

राजकीय स्वार्थासाठी पंतप्रधान मोदी मागास जातीचे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मत: मागास किंवा ओबीसी असते तर आसएसएसने त्यांना पंतप्रधान केलं नसतं, असही मायावती यांनी म्हटले.

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यातील मतदान १२ मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील सत्ताधारी आणि विरोधकांमधील शाब्दीक चकमक वाढली आहे. त्यातच आता जातीचे राजकारण तापल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या जातीचा मुद्दा छेडल्यानंतर विरोधकांनी देखील त्यांच्या वक्तव्याला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे.

राजकीय स्वार्थासाठी पंतप्रधान मोदी मागास जातीचे झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मत: मागास किंवा ओबीसी असते तर आसएसएसने त्यांना पंतप्रधान केलं नसतं, असही मायावती यांनी म्हटले. मायावती यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून मोदींवर निशान साधला आहे.

 

मायावती यांनी पहिल्या ट्विटमध्ये म्हटले की, महायुती जातीवादी असल्याचे आरोप पंतप्रधान मोदी करत आहेत. हे आरोप अत्यंत हस्यास्पद असून अपरिपक्वकेचे आहेत. जातीवादाच्या शापाने पिडीत असलेले लोक जातीवाद कसकाय करू शकतात. मोदी जन्मता ओबीसी नसल्यामुळे त्यांना जातीवादाची झळ बसलेली नाही. त्यामुळे अशा खोट्या गोष्टी मोदी बोलत असल्याचे मायावती यांनी नमूद केले.

राजकीय फायद्यासाठी मोदी स्वत:ला मागास जातीचे सांगतात. याचा उल्लेख करून मोदी जातीवादाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मोदी जन्मत: मागास असते तर त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पंतप्रधान होऊच दिले नसते, असा दावा मायावती यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये केला. तसेच कल्याण सिंह यांच्या सारख्या नेत्याला आरएसएसने केवळ मागास जातीचे असल्यामुळे डावलल्याचा आरोपही मायावती यांनी केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकmayawatiमायावतीBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टी