शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

'मोदींना घेरलं, त्यांच्या २०१४ मधील प्रतिमेला मोडलं, काँग्रेसनं 'ए ग्रेड' काम केलं!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 18:05 IST

राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे 4-5 दिवस शिल्लक असताना पंतप्रधान पहिली पत्रकार परिषद घेतात ही अभूतपूर्व बाब आहे, असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी लगावला. मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेतली. त्यावरुन राहुल यांनी मोदींना लक्ष्य केलं. आम्ही मोदींच्या खोटेपणाचा पर्दाफाश केल्याचंदेखील राहुल म्हणाले. त्यांनी नवी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. पाच वर्षांत काँग्रेसनं विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम केलं. काँग्रेसची कामगिरी ए ग्रेड होती, असं प्रशस्तीपत्रक त्यांनी स्वत:च्या पक्षाला दिलं. मोदींना घेरण्याचं काम काँग्रेसनं केलं. 2014 मधील मोदींच्या प्रतिमा मोडण्यात काँग्रेसचा महत्त्वाचा वाटा असल्याचंदेखील ते म्हणाले. पंतप्रधान म्हणून मोदींनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेवर त्यांनी सडकून टीका केली.पाच वर्षांत मोदी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेत आहेत. मात्र त्यांनी माझ्यासोबत राफेलच्या मुद्द्यावर वादविवाद करण्याचं आव्हान स्वीकारलं नाही. मी त्यांना वादविवादासाठी उघड आव्हान दिलं होतं. पण त्यांनी हे आव्हान स्वीकारलंच नाही. त्यांनी हे आव्हान का स्वीकारलं नाही, याचं उत्तर त्यांनी पत्रकारांना द्यावं, असं राहुल म्हणाले. मोदी प्रत्येकाला 15 लाख रुपये देणार होते. मात्र त्यांचं आश्वासन खोटं होतं, हे आम्ही जनतेला सांगितलं. आता जनतेला काय वाटतं, याचा कौल 23 मे रोजी मिळेल, असंदेखील ते पुढे म्हणाले. राहुल गांधींनी निवडणूक आयोगावरही सडकून टीका केली. 'या निवडणुकीत निवडणूक आयोग निष्पक्ष नव्हता. पंतप्रधान मोदी प्रचारात काहीही बोलत होते. मात्र तीच विधानं आम्ही केल्यास निवडणूक आयोगाकडून आक्षेप घेतला जात होता. मोदींच्या प्रचार कार्यक्रमानुसार निवडणूक आयोगानं निवडणुकीचा कार्यक्रम आखला होता. मोदी आणि भाजपानं निवडणुकीत सत्ता आणि पैशाचा बेसुमार वापर केला. पण आम्ही सत्य घेऊन लढलो,' अशा शब्दांत राहुल यांनी पंतप्रधानांसह निवडणूक आयोगावर तोफ डागली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसRafale Dealराफेल डील